शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

देशासाठी नवीन वर्ष अस्थिरतेचे

By admin | Updated: December 30, 2014 00:52 IST

हर्षल-नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांची त्रयी ही २०१५ या वर्षात अस्थिरता निर्माण करणार असून, येणारे वर्ष देशासाठी अस्थिरता व अशांततेचे राहणार आहे, असे भाकीत आंतरराष्ट्रीय

हर्षल-नेपच्यून-प्लुटो आणणार अशांतता : ज्योतिषाचार्य अनिल वैद्य यांचे भाकीत नागपूर : हर्षल-नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांची त्रयी ही २०१५ या वर्षात अस्थिरता निर्माण करणार असून, येणारे वर्ष देशासाठी अस्थिरता व अशांततेचे राहणार आहे, असे भाकीत आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी वर्तविले आहे. ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांच्यानुसार भारताच्या मकर राशीकडून तृतीय आणि नवम स्थानातून २०१५ या वर्षातील ग्रहणे होत असल्यामुळे, या वर्षात होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये गोंधळ निर्माण होईल. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय खेळाडूंना अपयश संभवते. विश्व क्रिकेट स्पर्धेत धोनी ब्रिगेडने सावध राहणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या खेळाडूंना यावर्षी निवृत्ती घ्यावी लागेल. यावर्षी होणाऱ्या ग्रहणाचा परिणाम म्हणजे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस होण्याचे ग्रह संकेत आहेत. सीमाप्रश्न पुन्हा चर्चेत येईल. ३७० कलमावरून काश्मीरमध्ये तणाव निर्माण होईल. विदर्भात वेगळ्या विदर्भाची मागणी वाढेल. पाकिस्तान, चीनच्या सीमा अशांत राहतील. ग्रहणाच्या जवळपास देशाची अंतर्गत शांतता बिघडण्याचे ग्रहसंकेत मेदिनीय ज्योतिष दर्शवीत आहे, असेही आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. सायन पद्धतीने प्लुटोचे भ्रमण मकर राशीतून चालू राहणार आहे. याचा परिणाम उद्योगधंदे, कामगार, श्रमजीव संघटना, राजकीय क्रांती, मोठ्या व्यक्तींचे स्फोटक, अपघाती मृत्यू तसेच मोठे उद्योग बंद पडण्याची शक्यता जास्त राहणार आहे. कन्या राशीतील राहूमुळे जो निसर्ग कुंडलीच्या षष्ठ स्थानातून भ्रमण करीत आहे. त्यामुळे संसर्गजन्य विकार वाढतील. पोलीस, सेना यांना हे वर्ष त्रासदायक राहणार आहे. मीनेतील केतूच्या भ्रमणामुळे विमानसेवा किंवा अंतराळ यान यांच्या सेवेत खंड पडेल. उपग्रहाच्या सेवेत बिघाड होईल, असे भाकीतही डॉ. वैद्य यांनी केले आहे. भारताच्या मकर राशीतून शनिचे भ्रमण लाभस्थानातून होत आहे. यामुळे देशातील सामान्य जनतेच्या दृष्टीने अनुकूल बदल होतील. गरीब जनतेसाठी नवे कायदे, घटना अस्तित्वात येतील. परंतु लाभस्थानात शनि असल्यामुळे देशाच्या उत्पन्नात घट होईल. वर्षाच्या पूर्वार्धात कर्केच्या गुरूमुळे शिक्षण व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल. अभ्यासक्रमात मोठे बदल होतील. विमा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धार्मिक पक्ष किंवा धार्मिक व्यक्तींना महत्त्व प्राप्त होईल, असे ग्रहसंकेत असल्याचे डॉ. वैद्य यांचे म्हणणे आहे. २०१५ च्या ग्रहस्थितीनुसार डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होईल. धार्मिक कलह रोखण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील. प्रसार माध्यमांसाठी काही मार्गदर्शक सूत्रे अमलात येण्याची शक्यता आहे. तसेच नेटवर्कच्या काही साईटस्वर बंदी घालण्याचे ग्रहसंकेत असल्याचेही डॉ. वैद्य यांनी सांगितले आहे.(प्रतिनिधी)