शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पॉवर प्लांटच्या राखेपासून बनतोय खापरीचा नवीन पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 22:35 IST

नागपूर व चंद्रपुरात कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प आहे. यातून मोठ्या संख्येने राख म्हणजेच फ्लाय अ‍ॅश निघते. या राखेचे नियोजन करणे अवघड आहे. प्रकल्पाच्या परिसरात फ्लाय अ‍ॅश ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. अशावेळी शासनस्तरावर फ्लाय अ‍ॅशचे नियोजन करण्याचे धोरण यशस्वी ठरत आहे. फ्लाय अ‍ॅशचा औद्योगिक तसेच रस्ते व पुलाच्या निर्मितीतही उपयोग होत आहे. वर्धा रोडवरील खापरी येथे निर्माण होत असलेल्या चार पदरी पुलासाठी मोठ्या प्रमाणात फ्लाय अ‍ॅशचा उपयोग करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर दिसताहेत राखेचे ढिगारे : निर्माण खर्चातही कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर व चंद्रपुरात कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प आहे. यातून मोठ्या संख्येने राख म्हणजेच फ्लाय अ‍ॅश निघते. या राखेचे नियोजन करणे अवघड आहे. प्रकल्पाच्या परिसरात फ्लाय अ‍ॅश ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. अशावेळी शासनस्तरावर फ्लाय अ‍ॅशचे नियोजन करण्याचे धोरण यशस्वी ठरत आहे. फ्लाय अ‍ॅशचा औद्योगिक तसेच रस्ते व पुलाच्या निर्मितीतही उपयोग होत आहे. वर्धा रोडवरील खापरी येथे निर्माण होत असलेल्या चार पदरी पुलासाठी मोठ्या प्रमाणात फ्लाय अ‍ॅशचा उपयोग करण्यात आला आहे.खापरी रेल्वे फ्लायओव्हरच्या दोन्ही मार्गासाठी फ्लाय अ‍ॅश मागविण्यात आली आहे. फ्लायओव्हरच्या कन्स्ट्रक्शन साईडच्या रिटेनिंग वॉलच्या मधात फ्लाय अ‍ॅश टाकण्यात आली आहे. त्यामुळे येथे राखेच्या टेकड्या दिसून येत आहेत. फ्लाय अ‍ॅशमध्ये सिमेंटिंग मटेरियल मिळवून रस्त्याच्या निर्मितीत वापर केला जात आहे. रस्तेनिर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेत फ्लाय अ‍ॅशचा वापर होत आहे.केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, फ्लाय अ‍ॅशच्या उपयोगामुळे बोल्डर, दगड, मातीची आवश्यकता राहिलेली नाही. विद्युतनिर्मिती प्रकल्पातून नि:शुल्क फ्लाय अ‍ॅश मिळत असल्याने पुलाच्या निर्मितीचा खर्चही कमी येत आहेथर्ड पार्टी इन्स्पेक्शनची रेल्वेने ठेवली अटएनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खापरीच्या नव्या पुलाचे निर्माणकार्य ५० टक्के पूर्ण झाले आहे. रेल्वे पोर्शनमध्ये निर्माण कार्यासाठी मध्य रेल्वेला तीन महिन्यापूर्वी पूर्व ब्लॉक मागितला होता. परंतु आतापर्यंत ब्लॉक मिळालेला नाही. उलट रेल्वेकडून थर्ड पार्टी इन्स्पेक्शनची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एनएचएआय थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून त्याचा अहवाल रेल्वेला देईल. अहवालाच्या आधारावर रेल्वेद्वारे ब्लॉक दिल्यानंतर पुलाचे निर्माणकार्य येणाऱ्या जुलै-ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूर