शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

पॉवर प्लांटच्या राखेपासून बनतोय खापरीचा नवीन पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 22:35 IST

नागपूर व चंद्रपुरात कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प आहे. यातून मोठ्या संख्येने राख म्हणजेच फ्लाय अ‍ॅश निघते. या राखेचे नियोजन करणे अवघड आहे. प्रकल्पाच्या परिसरात फ्लाय अ‍ॅश ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. अशावेळी शासनस्तरावर फ्लाय अ‍ॅशचे नियोजन करण्याचे धोरण यशस्वी ठरत आहे. फ्लाय अ‍ॅशचा औद्योगिक तसेच रस्ते व पुलाच्या निर्मितीतही उपयोग होत आहे. वर्धा रोडवरील खापरी येथे निर्माण होत असलेल्या चार पदरी पुलासाठी मोठ्या प्रमाणात फ्लाय अ‍ॅशचा उपयोग करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर दिसताहेत राखेचे ढिगारे : निर्माण खर्चातही कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर व चंद्रपुरात कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प आहे. यातून मोठ्या संख्येने राख म्हणजेच फ्लाय अ‍ॅश निघते. या राखेचे नियोजन करणे अवघड आहे. प्रकल्पाच्या परिसरात फ्लाय अ‍ॅश ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. अशावेळी शासनस्तरावर फ्लाय अ‍ॅशचे नियोजन करण्याचे धोरण यशस्वी ठरत आहे. फ्लाय अ‍ॅशचा औद्योगिक तसेच रस्ते व पुलाच्या निर्मितीतही उपयोग होत आहे. वर्धा रोडवरील खापरी येथे निर्माण होत असलेल्या चार पदरी पुलासाठी मोठ्या प्रमाणात फ्लाय अ‍ॅशचा उपयोग करण्यात आला आहे.खापरी रेल्वे फ्लायओव्हरच्या दोन्ही मार्गासाठी फ्लाय अ‍ॅश मागविण्यात आली आहे. फ्लायओव्हरच्या कन्स्ट्रक्शन साईडच्या रिटेनिंग वॉलच्या मधात फ्लाय अ‍ॅश टाकण्यात आली आहे. त्यामुळे येथे राखेच्या टेकड्या दिसून येत आहेत. फ्लाय अ‍ॅशमध्ये सिमेंटिंग मटेरियल मिळवून रस्त्याच्या निर्मितीत वापर केला जात आहे. रस्तेनिर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेत फ्लाय अ‍ॅशचा वापर होत आहे.केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, फ्लाय अ‍ॅशच्या उपयोगामुळे बोल्डर, दगड, मातीची आवश्यकता राहिलेली नाही. विद्युतनिर्मिती प्रकल्पातून नि:शुल्क फ्लाय अ‍ॅश मिळत असल्याने पुलाच्या निर्मितीचा खर्चही कमी येत आहेथर्ड पार्टी इन्स्पेक्शनची रेल्वेने ठेवली अटएनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खापरीच्या नव्या पुलाचे निर्माणकार्य ५० टक्के पूर्ण झाले आहे. रेल्वे पोर्शनमध्ये निर्माण कार्यासाठी मध्य रेल्वेला तीन महिन्यापूर्वी पूर्व ब्लॉक मागितला होता. परंतु आतापर्यंत ब्लॉक मिळालेला नाही. उलट रेल्वेकडून थर्ड पार्टी इन्स्पेक्शनची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एनएचएआय थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून त्याचा अहवाल रेल्वेला देईल. अहवालाच्या आधारावर रेल्वेद्वारे ब्लॉक दिल्यानंतर पुलाचे निर्माणकार्य येणाऱ्या जुलै-ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूर