शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

निपाह व्हायरस : राज्यभरात ‘अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:36 IST

केरळच्या कोझिकोड शहरात निपाह नावाच्या जीवघेण्या व्हायरसने नऊ जणांचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या रोगाला घेऊन सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मंगळवारी या व्हायरसला घेऊन सावधगिरी बाळगण्याचे परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी दिली.

ठळक मुद्दे केरळमध्ये नऊ जणांचा बळी : आरोग्य विभागाने काढले खबरदारीचे पत्रक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळच्या कोझिकोड शहरात निपाह नावाच्या जीवघेण्या व्हायरसने नऊ जणांचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या रोगाला घेऊन सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मंगळवारी या व्हायरसला घेऊन सावधगिरी बाळगण्याचे परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी दिली.केरळमध्ये या व्हायरसचा (विषाणू) इन्फेक्शनची लागण झालेल्या अन्य २५ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका परिचारिकेचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याला गंभीरतेने घेत मुंबई येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यालयात रात्री ११ वाजेपर्यंत बैठक सुरू होती. ‘लोकमत’शी बोलताना आरोग्य विभागाचे संचालक डॉ. कांबळे म्हणाले, सध्या तरी या ‘व्हायरस’चे रुग्ण महाराष्टÑात आढळून आलेले नाहीत. याच्यावर लस उपलब्ध नाही. परंतु सावधगिरी बाळगण्यासाठी आवश्यक उपाययोजनेच्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. उद्या, मंगळवारी यावर परित्रक काढून सर्व आरोग्य अधिकाºयांना ते पाठविण्यात येईल. काय आहे निपाह?निपाह व्हायरस संसर्गजन्य आजार आहे. हा व्हायरस प्राण्यांकडून मानवी शरीरात संक्रमित होतो. सध्या यावर लस उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) पहिल्या १० जीवघेण्या आजारात या निपाह व्हायरसचा समावेश आहे. या आजाराची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ७० टक्के असते.लक्षणेताप, डोके दुखणे, अशक्तपणा, श्वसनाचे आजार, मानसिक गोंधळ उडणे आदी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे दोन दिवस कायम राहिल्यास रुग्ण कोमात जाण्याची शक्यता असते. यावर उपचार नसल्याने आजारी डुक्कर, वटवाघूळ यांच्याशी संपर्क टाळण्याचा सल्ला केरळमध्ये देण्यात येत आहे. फळ खाणारे वटवाघूळ विषाणूचे वाहकउपलब्ध माहितीनुसार, या विषाणूची लागण होऊन मृत्यू झालेल्यांच्या घरात वटवाघूळांनी चावा घेतलेले आंबे आढळून आले. यामुळे फळ खाणारे वटवाघूळ या विषाणूचे नैसर्गिक वाहक असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर