शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

निपाह व्हायरस : राज्यभरात ‘अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:36 IST

केरळच्या कोझिकोड शहरात निपाह नावाच्या जीवघेण्या व्हायरसने नऊ जणांचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या रोगाला घेऊन सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मंगळवारी या व्हायरसला घेऊन सावधगिरी बाळगण्याचे परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी दिली.

ठळक मुद्दे केरळमध्ये नऊ जणांचा बळी : आरोग्य विभागाने काढले खबरदारीचे पत्रक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळच्या कोझिकोड शहरात निपाह नावाच्या जीवघेण्या व्हायरसने नऊ जणांचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या रोगाला घेऊन सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मंगळवारी या व्हायरसला घेऊन सावधगिरी बाळगण्याचे परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी दिली.केरळमध्ये या व्हायरसचा (विषाणू) इन्फेक्शनची लागण झालेल्या अन्य २५ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका परिचारिकेचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याला गंभीरतेने घेत मुंबई येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यालयात रात्री ११ वाजेपर्यंत बैठक सुरू होती. ‘लोकमत’शी बोलताना आरोग्य विभागाचे संचालक डॉ. कांबळे म्हणाले, सध्या तरी या ‘व्हायरस’चे रुग्ण महाराष्टÑात आढळून आलेले नाहीत. याच्यावर लस उपलब्ध नाही. परंतु सावधगिरी बाळगण्यासाठी आवश्यक उपाययोजनेच्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. उद्या, मंगळवारी यावर परित्रक काढून सर्व आरोग्य अधिकाºयांना ते पाठविण्यात येईल. काय आहे निपाह?निपाह व्हायरस संसर्गजन्य आजार आहे. हा व्हायरस प्राण्यांकडून मानवी शरीरात संक्रमित होतो. सध्या यावर लस उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) पहिल्या १० जीवघेण्या आजारात या निपाह व्हायरसचा समावेश आहे. या आजाराची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ७० टक्के असते.लक्षणेताप, डोके दुखणे, अशक्तपणा, श्वसनाचे आजार, मानसिक गोंधळ उडणे आदी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे दोन दिवस कायम राहिल्यास रुग्ण कोमात जाण्याची शक्यता असते. यावर उपचार नसल्याने आजारी डुक्कर, वटवाघूळ यांच्याशी संपर्क टाळण्याचा सल्ला केरळमध्ये देण्यात येत आहे. फळ खाणारे वटवाघूळ विषाणूचे वाहकउपलब्ध माहितीनुसार, या विषाणूची लागण होऊन मृत्यू झालेल्यांच्या घरात वटवाघूळांनी चावा घेतलेले आंबे आढळून आले. यामुळे फळ खाणारे वटवाघूळ या विषाणूचे नैसर्गिक वाहक असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर