शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

किशोरवयीन मुलांशी घरात सकारात्मक संवाद आवश्यक : डॉ. गावंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 21:24 IST

हार्मोनल बदलांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक बदल होत असतात. त्या बदलांना प्रतिसाद म्हणून किशोरवयीन मुले वाईट गोष्टींकडे आणि व्यसनांकडे आकर्षित होऊ शकतात तसेच लैंगिक आकर्षणातून अनेक चुका करतात. या प्रश्नावर केवळ घरात साधला जाणारा सकारात्मक संवाद हेच उत्तर आहे, असे मत पेडिकॉनचे माध्यम समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देहार्मोनल बदलांमुळे होतात शारीरिक, मानसिक व भावनिक बदल

आॅनलाईन लोकमतनागपूर : हार्मोनल बदलांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक बदल होत असतात. त्या बदलांना प्रतिसाद म्हणून किशोरवयीन मुले वाईट गोष्टींकडे आणि व्यसनांकडे आकर्षित होऊ शकतात तसेच लैंगिक आकर्षणातून अनेक चुका करतात. या प्रश्नावर केवळ घरात साधला जाणारा सकारात्मक संवाद हेच उत्तर आहे, असे मत पेडिकॉनचे माध्यम समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, घरात सकारात्मक संवाद साधत असताना एकमेकाना ‘स्पेस’ व वरिष्ठांना योग्य आदर मिळायला हवा. हे सगळं किशोरवयीन मुले न्याहाळत असतात. जर घरातील वातावरण सकारात्मक असेल तर हॉर्मोनल बदलांमुळे होणाऱ्या समस्यांवर मात करता येते. मुलींविषयी अधिक माहिती देताना डॉ. गावंडे म्हणाले, १२ ते १४ या वयोगटात मुलींचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होत असतो. त्यामुळे या वयातील मुलींना समजावून सांगणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे गरजेचे असते. या वयोगटातील मुलींमध्ये मासिक पाळी अनियमितता, वजन वाढणे अशा समस्या उद्भवतात. पण, त्यावर योग्य वेळी उपाय करणेही गरजेचे असते.१०० पैकी ४० बालकांना बालदमा- डॉ. देशमुखबालदम्यासंबंधी इनहेलरपेक्षा तोंडाद्वारे घेण्याच्या गोळ्या जास्त प्रभावी आहे; असा पालकांमध्ये गैरसमज आहे. मात्र, अनेक वर्षाची संशोधने व वैद्यकीय अभिप्रायांनी हे सिद्ध झाले आहे की, मुखाद्वारे घेण्याच्या औषधांपेक्षा इनहेलर अर्थात श्वासाद्वारे घेण्याची औषधे अधिक सुरिक्षत, प्रभावी आणि सोपी असतात, अशी माहिती डॉ. संजय देशमुख यांनी दिली. डॉ. देशमुख म्हणाले की, वाफेद्वारे, प्रेशरपंपद्वारे आणि पार्टिकल कॅप्सुल अशी तीन प्रकारची इनहेलर असतात. त्यापैकी कुठल्याही इनहेलरचे दुष्परिणाम नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रदूषणामुळे बालदम्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगत त्यांनी १०० पैकी ४० बालकांना बालदमा असल्याची माहिती दिली. मात्र, बालदमा शंभर टक्के बरा होतो, असा विश्वास दाखवत डॉक्टर देशमुखांनी प्रदूषण आणि अ‍ॅलर्जीपासून बालकांचे रक्षण करण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर