शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

किशोरवयीन मुलांशी घरात सकारात्मक संवाद आवश्यक : डॉ. गावंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 21:24 IST

हार्मोनल बदलांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक बदल होत असतात. त्या बदलांना प्रतिसाद म्हणून किशोरवयीन मुले वाईट गोष्टींकडे आणि व्यसनांकडे आकर्षित होऊ शकतात तसेच लैंगिक आकर्षणातून अनेक चुका करतात. या प्रश्नावर केवळ घरात साधला जाणारा सकारात्मक संवाद हेच उत्तर आहे, असे मत पेडिकॉनचे माध्यम समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देहार्मोनल बदलांमुळे होतात शारीरिक, मानसिक व भावनिक बदल

आॅनलाईन लोकमतनागपूर : हार्मोनल बदलांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक बदल होत असतात. त्या बदलांना प्रतिसाद म्हणून किशोरवयीन मुले वाईट गोष्टींकडे आणि व्यसनांकडे आकर्षित होऊ शकतात तसेच लैंगिक आकर्षणातून अनेक चुका करतात. या प्रश्नावर केवळ घरात साधला जाणारा सकारात्मक संवाद हेच उत्तर आहे, असे मत पेडिकॉनचे माध्यम समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, घरात सकारात्मक संवाद साधत असताना एकमेकाना ‘स्पेस’ व वरिष्ठांना योग्य आदर मिळायला हवा. हे सगळं किशोरवयीन मुले न्याहाळत असतात. जर घरातील वातावरण सकारात्मक असेल तर हॉर्मोनल बदलांमुळे होणाऱ्या समस्यांवर मात करता येते. मुलींविषयी अधिक माहिती देताना डॉ. गावंडे म्हणाले, १२ ते १४ या वयोगटात मुलींचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होत असतो. त्यामुळे या वयातील मुलींना समजावून सांगणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे गरजेचे असते. या वयोगटातील मुलींमध्ये मासिक पाळी अनियमितता, वजन वाढणे अशा समस्या उद्भवतात. पण, त्यावर योग्य वेळी उपाय करणेही गरजेचे असते.१०० पैकी ४० बालकांना बालदमा- डॉ. देशमुखबालदम्यासंबंधी इनहेलरपेक्षा तोंडाद्वारे घेण्याच्या गोळ्या जास्त प्रभावी आहे; असा पालकांमध्ये गैरसमज आहे. मात्र, अनेक वर्षाची संशोधने व वैद्यकीय अभिप्रायांनी हे सिद्ध झाले आहे की, मुखाद्वारे घेण्याच्या औषधांपेक्षा इनहेलर अर्थात श्वासाद्वारे घेण्याची औषधे अधिक सुरिक्षत, प्रभावी आणि सोपी असतात, अशी माहिती डॉ. संजय देशमुख यांनी दिली. डॉ. देशमुख म्हणाले की, वाफेद्वारे, प्रेशरपंपद्वारे आणि पार्टिकल कॅप्सुल अशी तीन प्रकारची इनहेलर असतात. त्यापैकी कुठल्याही इनहेलरचे दुष्परिणाम नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रदूषणामुळे बालदम्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगत त्यांनी १०० पैकी ४० बालकांना बालदमा असल्याची माहिती दिली. मात्र, बालदमा शंभर टक्के बरा होतो, असा विश्वास दाखवत डॉक्टर देशमुखांनी प्रदूषण आणि अ‍ॅलर्जीपासून बालकांचे रक्षण करण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर