शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शाळा सिद्धीच्या कामात हयगय : ३३२ शाळा कारवाईच्या रडारवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:13 IST

शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळांना स्वयंमूल्यमापनाचे काम करायचे आहे. या कामात ३३२ शाळांकडून हयगय होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला शासनाने फटकारले आहे. या उपक्रमात नागपूर जिल्हा टॉपटेनच्याही बाहेर गेला आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळांना फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत स्वयंमूल्यमापनाचे काम नाही केल्यास खासगी शाळांची आरटीईची मान्यता रद्द करण्याचा तर सरकारी शाळेतील शिक्षकांचे वेतन रोखण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या मान्यता रद्द करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळांना स्वयंमूल्यमापनाचे काम करायचे आहे. या कामात ३३२ शाळांकडून हयगय होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला शासनाने फटकारले आहे. या उपक्रमात नागपूर जिल्हा टॉपटेनच्याही बाहेर गेला आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळांना फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत स्वयंमूल्यमापनाचे काम नाही केल्यास खासगी शाळांची आरटीईची मान्यता रद्द करण्याचा तर सरकारी शाळेतील शिक्षकांचे वेतन रोखण्याचा इशारा दिला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ४०७३ पैकी ३७४१ शाळांचे स्वयंमूल्यमापनाचे काम पूर्ण झाले आहे. तर ३३२ शाळांचे मूल्यमापनाचे काम अद्यापपर्यंत झालेले नाही. महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक सत्र २०१८-१९ या वर्षासाठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. तसेच शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने देशभरात शाळा सिद्धी तर महाराष्ट्रात समृद्ध शाळा नावाने शाळांना स्वयंमूल्यमापन करणे आवश्यक आहे. शाळांची ही उदासीनता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास बाधक ठरत आहे. शाळेच्या भौतिक, गुणवत्ता व इतर सर्व उत्थानासाठी असलेल्या प्रश्नांचे समाधान करणाऱ्या शाळांना शाळा सिद्धीमध्ये श्रेणी दिली जाते. यात नागपूर जिल्हा माघारला आहे. राज्यामध्ये नागपूर जिल्हा प्रथम दहाच्या बाहेर असून, अद्याप जिल्ह्यातील ३३२ शाळांनी आपली माहिती सादर केली नाही. गेल्यावर्षी जिल्ह्यातील १००९ शाळांना शाळा सिध्दीमध्ये ‘अ’श्रेणी प्राप्त केली होती.गटशिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्षनागपूर, हिंगणा व पारशिवनी हे तालुके माघारले आहे. येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. शिक्षण विभागाने या गटशिक्षणाधिकाऱ्यांना तालुक्याची जबाबदारी सोपविलेल्या निर्धारकांची नावे मागविण्यात आली होती. मात्र, आजवर त्यांनी निर्धारक (जबाबदार) अधिकाऱ्यांची नावे दिली नाही.

 

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर