शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नकारात्मक सरकारी मानसिकता हीच समस्या - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 04:54 IST

मागील पाच वर्षांत मी १७ लाख कोटींच्या कामांचे वाटप केले आहे, तर या वर्षी कमीत कमी पाच लाख कोटींचा टप्पा गाठायचा आहे.

नागपूर - मागील पाच वर्षांत मी १७ लाख कोटींच्या कामांचे वाटप केले आहे, तर या वर्षी कमीत कमी पाच लाख कोटींचा टप्पा गाठायचा आहे. मात्र सरकारी मानसिकता घेऊन व नकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारे लोक हीच मोठी समस्या आहे. निर्णय करण्याची प्रशासनातील लोकांची हिंमत नाही, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.नागपुरातील ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) हीरक महोत्सवी वर्षाचे रविवारी उद्घाटन झाले. या वेळी ते बोलत होते. आपल्या देशात अनेक गोष्टींच्या कच्च्या मालाचे उत्पादन होत असतानादेखील ४० लाख कोटींच्या मालाची आयात करण्यात येते. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आयात घडवून निर्यात वाढवावी लागेल, असे गडकरी म्हणाले. हीरक महोत्सवी वर्षानिमित्त ‘सिमेन्स सेंटर आॅफ एक्सेलन्स’ची स्थापना करण्यात येणार आहे. यात १२ जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा उभारण्यात येतील. विविध तांत्रिक महाविद्यालयांतील ५ ते १० हजार विद्यार्थ्यांना दर वर्षाला प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार यांनी दिली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर