शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नीटमध्ये योग्य उत्तराला चुकीचे ठरवले : विद्यार्थ्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:26 IST

गेल्या नीट परीक्षेमध्ये एका योग्य उत्तराला चुकीचे ठरविण्यात आले. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे पाच गुणांचे नुकसान झाले असा दावा गिरीश भिवगडे या विद्यार्थ्याने केला आहे. यासंदर्भात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्दे हायकोर्टात रिट याचिका दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या नीट परीक्षेमध्ये एका योग्य उत्तराला चुकीचे ठरविण्यात आले. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे पाच गुणांचे नुकसान झाले असा दावा गिरीश भिवगडे या विद्यार्थ्याने केला आहे. यासंदर्भात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.गेल्या ५ मे रोजी नीट परीक्षा झाली. ३ जून रोजी उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली. त्यात प्रश्नपत्रिका पी-५ मधील १५२ व्या प्रश्नाचे उत्तर पर्याय-१ असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर ५ जून रोजी सुधारित उत्तरपत्रिका जाहीर करून पर्याय-४ योग्य उत्तर असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, निकाल जाहीर झाला व याचिकाकर्त्याला ७२० पैकी ४६५ गुण मिळाले. रसायनशास्त्राच्या अनुभवी शिक्षकांनुसार, पर्याय-१ हेच योग्य उत्तर आहे. त्यामुळे हे उत्तर नमूद करणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ गुण (उत्तराचे ४ व चुकीच्या उत्तरासाठी कापलेला १ गुण) मिळणे आवश्यक आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. यासंदर्भात नीट सेलकडे तक्रार करूनही काहीच दिलासा मिळाला नाही असेदेखील याचिकेत नमूद करण्यात आले आहे.केंद्र सरकारला नोटीसप्रकरणावर मंगळवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव, नीट सेलचे वरिष्ठ संचालक, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे संचालक व राज्य सीईटी सेल यांना नोटीस बजावून यावर २६ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर तर, राज्य सीईटी सेलतर्फे अ‍ॅड. नहुश खुबाळकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयStudentविद्यार्थी