शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

नीटमध्ये योग्य उत्तराला चुकीचे ठरवले : विद्यार्थ्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:26 IST

गेल्या नीट परीक्षेमध्ये एका योग्य उत्तराला चुकीचे ठरविण्यात आले. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे पाच गुणांचे नुकसान झाले असा दावा गिरीश भिवगडे या विद्यार्थ्याने केला आहे. यासंदर्भात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्दे हायकोर्टात रिट याचिका दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या नीट परीक्षेमध्ये एका योग्य उत्तराला चुकीचे ठरविण्यात आले. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे पाच गुणांचे नुकसान झाले असा दावा गिरीश भिवगडे या विद्यार्थ्याने केला आहे. यासंदर्भात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.गेल्या ५ मे रोजी नीट परीक्षा झाली. ३ जून रोजी उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली. त्यात प्रश्नपत्रिका पी-५ मधील १५२ व्या प्रश्नाचे उत्तर पर्याय-१ असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर ५ जून रोजी सुधारित उत्तरपत्रिका जाहीर करून पर्याय-४ योग्य उत्तर असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, निकाल जाहीर झाला व याचिकाकर्त्याला ७२० पैकी ४६५ गुण मिळाले. रसायनशास्त्राच्या अनुभवी शिक्षकांनुसार, पर्याय-१ हेच योग्य उत्तर आहे. त्यामुळे हे उत्तर नमूद करणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ गुण (उत्तराचे ४ व चुकीच्या उत्तरासाठी कापलेला १ गुण) मिळणे आवश्यक आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. यासंदर्भात नीट सेलकडे तक्रार करूनही काहीच दिलासा मिळाला नाही असेदेखील याचिकेत नमूद करण्यात आले आहे.केंद्र सरकारला नोटीसप्रकरणावर मंगळवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव, नीट सेलचे वरिष्ठ संचालक, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे संचालक व राज्य सीईटी सेल यांना नोटीस बजावून यावर २६ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर तर, राज्य सीईटी सेलतर्फे अ‍ॅड. नहुश खुबाळकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयStudentविद्यार्थी