शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

शेतकऱ्यांना देणार ‘नीम युरिया’

By admin | Updated: March 15, 2015 02:31 IST

युरियाचा शेतातील अतिवापर थांबविणे आणि युरिया आयातीसाठी खर्च होणाऱ्या विदेश चलनात बचत करणे यासाठी पुढच्या काळात ...

नागपूर : युरियाचा शेतातील अतिवापर थांबविणे आणि युरिया आयातीसाठी खर्च होणाऱ्या विदेश चलनात बचत करणे यासाठी पुढच्या काळात युरियाऐवजी ‘नीमकोटेड युरिया’ शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती केंद्रीय खते व रसायन खात्याचे राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारने युरियावरील अनुदानात वाढ केल्याने खताचे दर वाढणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात युरियाचा वापर होत असल्याने जमिनीची प्रत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. दुसरीकडे वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी खत आयात करावे लागत असल्याने विदेशी चलन खर्च होत आहे. हे टाळण्यासाठी युरियाला पर्याय म्हणून नीमकोटेड युरियाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा युरिया वाहून किंवा हवेमुळे उडून जात नाही. त्यामुळे मात्राही कमी प्रमाणात लागेल. केंद्र सरकारने यावर्षी ४५ टक्के उत्पादनाचे लक्ष्य निर्धारित केले होते. पण पंतप्रधान कार्यालयाने त्यात वाढ करून ते ७५ टक्के केले आहे. पुढच्या वर्षी १०० टक्के नीमकोटेड युरियाचे उत्पादनाचे लक्ष्य आहे,असे अहिर म्हणाले. देशात दरवर्षी ३१ मिलियन टन युरियाची गरज असून देशांतर्गत कारखान्यात २२ मि. टन युरियाची निर्मिती होते. वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी उर्वरित युरिया हा आयात केला जातो. त्याचप्रमाणे देशांतर्गत प्रति टन युरिया उत्पादन खर्च २० हजार रुपये होत असून तो ५,६०० रुपये प्रति टन विकला जातो. उर्वरित रकमेचे अनुदान दिले जाते. नीमकोटेड युरियामुळे अनुदान आणि आयात खर्चात काही प्रमाणात बचत होईल, असा विश्वास अहिर यांनी व्यक्त केला. युरियाचा वापर रासायनिक उद्योगात केला जातो. पाकिस्तान, बांगला देश आणि श्रीलंकेतही त्याची तस्करी केली जाते. या सर्व गैरप्रकारावर यामुळे पायबंद बसेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.वनौषधी केंद्रगोरगरीब नागरिकांना सवलतीच्या दरात औषध उपलब्ध व्हावे यासाठी देशात पहिल्या टप्प्यात ३ हजार व पुढच्या पाच वर्षांत ५० हजार वनौषधी केंद्रेसुरू करण्याचा केंद्र सरकाचा मानस आहे. सध्या देशात १७८ केंद्रे आहेत; त्यापैकी ९८ सुरूआहेत. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात व त्यानंतर दोन वर्षांत जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात एक केंद्र सुरू केले जाईल. केंद्र सुरू करण्यासाठी पात्र ठरणाऱ्यांना अडीच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राचे भूमिअधिग्रहण विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच तयार करण्यात आले आहे. विरोधकांनी केलेल्या अनेक सूचनांचा समावेश सुधारित विधेयकात करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेला संजय फांजे व अशोक धोटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)