शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

त्यासाठी निसर्गात कलाकृती शोधावी लागेल : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 23:49 IST

मानवी हव्यासापायी निसर्गाचे नको तेवढे नुकसान झाले आहे. शहरे प्रदूषित झाली आहेत, जंगले नष्ट होत आहेत व प्राणीही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. या दु्ष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर मनोहर सप्रे यांच्याप्रमाणे निसर्गात कलाकृती शोधावी लागेल. सप्रे यांनी कलेमध्ये समाजाची भागीदारी करून घेतली व तुटलेल्या फांद्यात कला शोधून जंगलाकडे नव्या दृष्टीने पाहणे शिकविले, असे गौरवोद्गार लोकमतचे ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी काढले.

ठळक मुद्देमनोहर सप्रे यांना उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवी हव्यासापायी निसर्गाचे नको तेवढे नुकसान झाले आहे. शहरे प्रदूषित झाली आहेत, जंगले नष्ट होत आहेत व प्राणीही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. या दु्ष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर मनोहर सप्रे यांच्याप्रमाणे निसर्गात कलाकृती शोधावी लागेल. सप्रे यांनी कलेमध्ये समाजाची भागीदारी करून घेतली व तुटलेल्या फांद्यात कला शोधून जंगलाकडे नव्या दृष्टीने पाहणे शिकविले, असे गौरवोद्गार लोकमतचे ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी काढले.वनराई फाऊंडेशन तसेच महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणारा स्व. उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी द्वादशीवार बोलत होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, पोलीस महानिरीक्षक (अ‍ॅन्टी नक्षल स्क्वॉड) सुरेश शेलार, बी.के. सिंग, प्रकाश ठोंबरे, गोपाळराव ठोसर, वनराईचे गिरीश गांधी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी द्वादशीवार यांनी सप्रे यांचा कलात्मक परिचय करून दिला. हा सत्कार व्यंगचित्रकार, काष्ठशिल्पकार किंवा कलाकाराचा नाही तर विद्वानाचा आहे. व्यंगचित्रकार म्हणून लोकांचे अंतर्मन वाचणाची कुवत त्यांच्यात आहे. त्यांनी झाडापासून तुटून पडलेल्या निराकार लाकडांमध्ये कलात्मक आकार शोधला व तो पाहण्याची दृष्टी दिली. ही कला इतकी वर्षे निष्ठेने जपली आणि तरुणांपर्यंत पोहचविल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रदूषणावरही चिंता व्यक्त केली. प्रदूषण रोखण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागणार आहे. तीन वर्षात ५० वाघ आणि २६३ बिबटे मारले गेले. हे रुबाबदार प्राणी कसे जगतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वनखात्याच्या धोरणात मूलभूत बदल करणे आवश्यक असल्याचे आवाहन द्वादशीवार यांनी केले.यावेळी नितीन काकोडकर यांनी मनोहर सप्रे यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या. २० वर्षापूर्वी पर्यावरण तज्ज्ञांनी २००० सालापर्यंत वाघ नाहिसे होतील, असे भाकीत केले होते. मात्र असे झाले नाही. उलट वाघांची संख्या वाढल्याचे सांगत यासाठी वनविभागाला श्रेय द्यायला हवे, असे मनोगत मांडले. वाघांची वाढ आणि त्यांचे मृत्यू हे निसर्गाचे चक्र असल्याचेही ते म्हणाले. सत्काराला उत्तर देत मनोगत मांडताना मनोहर सप्रे यांनी निसर्गाशी चाललेल्या मानवी स्पर्धेबाबत चिंता व्यक्त केली.आपण निसर्गापासून पूर्णपणे तुटलो आहोत व शहरी लोकांना दररोज ही शोकांतिका सोसावी लागते. मानव प्राण्याला जगण्यासाठी निसर्गाजवळ सर्व काही आहे, पण माणूसच अतृप्त आहे. नैसर्गिक साधनांचा बेमालूम वापर, जमेल तेवढी लूट केली जात आहे. माणसांचा चंगळवाद हा व्यसनाप्रमाणे झाला असून त्यातून बाहेर पडणे आता कठीण झाले आहे. न्यूनतम साधनातून महत्तम आनंद कसा घ्यावा, हे आदिमानव किंवा बालकांकडून शिकता येते. वडीलधारे मात्र या बालकांना निसर्गापासून तोडत असल्याची खंत त्यांनी मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन वनराईचे विश्वस्त अजय पाटील यांनी केले तर नीलेश खांडेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Vanraiवनराईnagpurनागपूर