शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

देशातील वन समृद्ध करण्याची गरज : सिद्धांत दास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:15 IST

वनांचे उत्पादन केवळ काष्ठ उत्पादन नसून अकाष्ठ उत्पादनही असून, वनांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी देशातील वन समृद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वन महासंचालक तथा केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व हवामान बदल यांचे विशेष सचिव सिद्धांत दास यांनी केले.

ठळक मुद्देकमांड कंट्रोल रुमला दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनांचे उत्पादन केवळ काष्ठ उत्पादन नसून अकाष्ठ उत्पादनही असून, वनांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी देशातील वन समृद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वन महासंचालक तथा केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व हवामान बदल यांचे विशेष सचिव सिद्धांत दास यांनी केले.सोमवारी सिद्धांत दास यांनी नागपुरातील वन मुख्यालयाचा दौरा केला. यावेळी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) उमेशकुमार अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सूचना व तांत्रिक) प्रवीण श्रीवास्तव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर (संवर्धन), अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शेषराव पाटील, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. एस. रेड्डी, अशोक गिरीपुंजे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दास यांनी सांगितले की, वनांची उत्पादनक्षमता केवळ लाकूड नसून यात जंगलातून मिळणारी वनौषधी आणि इतर सामुग्रीसुद्धा आहे. या सर्व उत्पादनांमुळे वन समृद्ध होऊ शकते. त्यांनी वन मुख्यालयातील ‘कमांड कंट्रोल रुम’ला भेट देऊन स्तुती केली. यासोबतच जंगलाची सातत्याने देखभाल करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) अग्रवाल यांनी वन विभागाच्या सर्व नव्या उपक्रमांची माहिती दिली. राज्यात वनासोबत बांबूचे क्षेत्र वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीवास्तव यांनी विभागाच्या अ‍ॅपची माहिती देऊन सादरीकरण केले. शैलेश टेंभुर्णीकर यांनी वन अधिकार कायद्यावर सादरीकरण केले. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

 

टॅग्स :forest departmentवनविभागnagpurनागपूर