शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

देशातील वन समृद्ध करण्याची गरज : सिद्धांत दास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:15 IST

वनांचे उत्पादन केवळ काष्ठ उत्पादन नसून अकाष्ठ उत्पादनही असून, वनांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी देशातील वन समृद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वन महासंचालक तथा केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व हवामान बदल यांचे विशेष सचिव सिद्धांत दास यांनी केले.

ठळक मुद्देकमांड कंट्रोल रुमला दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनांचे उत्पादन केवळ काष्ठ उत्पादन नसून अकाष्ठ उत्पादनही असून, वनांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी देशातील वन समृद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वन महासंचालक तथा केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व हवामान बदल यांचे विशेष सचिव सिद्धांत दास यांनी केले.सोमवारी सिद्धांत दास यांनी नागपुरातील वन मुख्यालयाचा दौरा केला. यावेळी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) उमेशकुमार अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सूचना व तांत्रिक) प्रवीण श्रीवास्तव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर (संवर्धन), अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शेषराव पाटील, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. एस. रेड्डी, अशोक गिरीपुंजे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दास यांनी सांगितले की, वनांची उत्पादनक्षमता केवळ लाकूड नसून यात जंगलातून मिळणारी वनौषधी आणि इतर सामुग्रीसुद्धा आहे. या सर्व उत्पादनांमुळे वन समृद्ध होऊ शकते. त्यांनी वन मुख्यालयातील ‘कमांड कंट्रोल रुम’ला भेट देऊन स्तुती केली. यासोबतच जंगलाची सातत्याने देखभाल करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) अग्रवाल यांनी वन विभागाच्या सर्व नव्या उपक्रमांची माहिती दिली. राज्यात वनासोबत बांबूचे क्षेत्र वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीवास्तव यांनी विभागाच्या अ‍ॅपची माहिती देऊन सादरीकरण केले. शैलेश टेंभुर्णीकर यांनी वन अधिकार कायद्यावर सादरीकरण केले. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

 

टॅग्स :forest departmentवनविभागnagpurनागपूर