शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

रिपब्लिकन जनतेला एका मंचावर आणण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागासवर्गीयांच्या समस्या आणि अडचणी समजून घेऊन त्यांच्या विकासाला प्राथमिकता देण्याची गरज आहे. यासाठी सर्वांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागासवर्गीयांच्या समस्या आणि अडचणी समजून घेऊन त्यांच्या विकासाला प्राथमिकता देण्याची गरज आहे. यासाठी सर्वांना एका मंचावर आणणे हे महत्वाचे असल्याचे मत रिपब्लिकन आघाडी कार्यकर्ता संमेलनात व्यक्त झाले. टेका सिद्धार्थ नगर येथील राजाभाऊ खोब्रागड़े सभागृहात ‘रिपब्लिकन भारताच्या निर्मितीसाठी रिपब्लिकन जनतेचे एकसंघ आंदोलन’ या विषयावर झालेल्या मेळाव्यात ही भावना व्यक्त करण्यात आली.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन विचारवंत विनायक जामगडे होते. ते म्हणाले, मागील काही वर्षांपासून संविधानात असलेल्या मागासवर्गियांच्या तरतुदी संपविण्याचा प्रयत्न होत आहे. देश संविधानाच्या माध्यमातूनच चालणार आहे. त्यामुळेच संविधनाच्या रक्षणासाठी सर्वांची एकजूट आवश्यक आहे. हे होण्यासाठी रिपब्लिकन विचाराच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजाची शक्ती वाढवायला हवी.

यावेळी आघाडीचे संजय पाटील यांनीही सर्वांना एकत्र येण्याचे आणि संघटनात्मक शक्ती वाढविण्याचे आवाहन केले. छाया खोब्रागडे, मेघराज काटकर, विजय बागुल, भूपेश थुलकर, जावेद अन्सारी पाशा, प्रवीण खोब्रागडे, सागर डबरासे, असलम खान मुल्ला, राहुल प्रधान, देशक खोब्रागडे, सिद्धार्थ पाटील, राहुल मून आदींसह अनेकांनी सहभाग घेतला.