शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आगामी निवडणुकात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र लढावे; उद्धव ठाकरेनंतर शरद पवारांचंही मत

By कमलेश वानखेडे | Updated: July 15, 2022 17:53 IST

राज्यात पूरपरिस्थीत आहे. प्रशासन ठप्प पडले आहे. फक्त दोनच मंत्री गेले १०-१२ दिवसांपासून कामावर आहेत, राज्याची परिस्थिती बघता हे नुकसानदायक आहे, असा टोलाही पवार यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला.

कमलेश वानखेडे

नागपूर :  नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी शक्य तिथे युती करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी देखील या भूमिकेचे समर्थन केले आहे.

हे तिनही पक्ष एकत्र लढले तर लोकांना अपेक्षित असलेला निकाल मिळेल. माझंही तेच मत आहे. याबाबत आम्ही पक्ष पातळीवर चर्चा केली आहे, असे पवार यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पण याबाबत काँग्रेस सोबत व  शिवसेने सोबतही चर्चा केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. 

शरद पवार हे एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. त्यांनी पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, संसदेत बोलताना एखाद्या विषयावर  सरकारकडे मागणी केली आणि मान्य झाली नाही तर विरोधक सभात्याग करतात. बाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरधरणे देतात. आता केंद्र सरकारने एक परिपत्रक काढून या अधिकारावरील बंदी आणली आहे.  हे करताना देशातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतलं होतं का, असा सवाल करीत याबाबत उद्या दिल्लीत बैठक होईल आणि आमची दिशा ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेले १०-१२ दिवस दोन मंत्रीच कामावर

राज्यात पूरपरिस्थीत आहे. प्रशासन ठप्प पडले आहे. फक्त दोनच मंत्री गेले १०-१२ दिवसांपासून कामावर आहेत, राज्याची परिस्थिती बघता हे नुकसानदायक आहे, असा टोलाही पवार यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला. नव्या सरकारने काही नवीन केले असते तर मी अभिनंदन केले असते. पण आधीचे निर्णय रद्द करणे आणि हे दाखवणे की काहीतरी मोठे केले, असे सुरू आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. शिंदे सीएम नाहीच, खरे सीएम फडणावीसच आहेत, या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, राऊत हे या दोघांबरोबर काम करून आहेत, त्यामुळे त्यांना कोणाची काय कुवत आहे ते माहिती आहे. ५० पैकी एकही आमदार हरला तर राजीनामा देईन या शिंदे यांच्या वक्तव्यावर आपल्याला आता काहीही म्हणायचे नाही, असे सांगत त्यांनी या मुद्यावर बोलणे टाळले.

सत्तेचा गैरवापर टीकत नाही, श्रीलंकेने दाखवून दिले

श्रीलंकेत सत्ता केंद्रीत झाली होती. सत्तेचा पाहिजे तसा वापर केला जात होता. आज लोक राष्ट्रपतींच्या घरात घुसुन संघर्ष करीत आहेत. लाखो लोक रस्त्यावर आहेत. सत्तेचा गैरवापर हा फार काळ टीकत नसतो, हे श्रीलंकेने दाखवून दिले आहे, असे सांगत पवार यांनी पक्षाच्य कार्यकर्त्यांना एकसंघ राहून शक्तिशाली संघटन उभारण्याचे आवाहन कार्यकारिणीच्या बैठकीत केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस