शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

आगामी निवडणुकात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र लढावे; उद्धव ठाकरेनंतर शरद पवारांचंही मत

By कमलेश वानखेडे | Updated: July 15, 2022 17:53 IST

राज्यात पूरपरिस्थीत आहे. प्रशासन ठप्प पडले आहे. फक्त दोनच मंत्री गेले १०-१२ दिवसांपासून कामावर आहेत, राज्याची परिस्थिती बघता हे नुकसानदायक आहे, असा टोलाही पवार यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला.

कमलेश वानखेडे

नागपूर :  नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी शक्य तिथे युती करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी देखील या भूमिकेचे समर्थन केले आहे.

हे तिनही पक्ष एकत्र लढले तर लोकांना अपेक्षित असलेला निकाल मिळेल. माझंही तेच मत आहे. याबाबत आम्ही पक्ष पातळीवर चर्चा केली आहे, असे पवार यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पण याबाबत काँग्रेस सोबत व  शिवसेने सोबतही चर्चा केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. 

शरद पवार हे एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. त्यांनी पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, संसदेत बोलताना एखाद्या विषयावर  सरकारकडे मागणी केली आणि मान्य झाली नाही तर विरोधक सभात्याग करतात. बाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरधरणे देतात. आता केंद्र सरकारने एक परिपत्रक काढून या अधिकारावरील बंदी आणली आहे.  हे करताना देशातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतलं होतं का, असा सवाल करीत याबाबत उद्या दिल्लीत बैठक होईल आणि आमची दिशा ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेले १०-१२ दिवस दोन मंत्रीच कामावर

राज्यात पूरपरिस्थीत आहे. प्रशासन ठप्प पडले आहे. फक्त दोनच मंत्री गेले १०-१२ दिवसांपासून कामावर आहेत, राज्याची परिस्थिती बघता हे नुकसानदायक आहे, असा टोलाही पवार यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला. नव्या सरकारने काही नवीन केले असते तर मी अभिनंदन केले असते. पण आधीचे निर्णय रद्द करणे आणि हे दाखवणे की काहीतरी मोठे केले, असे सुरू आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. शिंदे सीएम नाहीच, खरे सीएम फडणावीसच आहेत, या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, राऊत हे या दोघांबरोबर काम करून आहेत, त्यामुळे त्यांना कोणाची काय कुवत आहे ते माहिती आहे. ५० पैकी एकही आमदार हरला तर राजीनामा देईन या शिंदे यांच्या वक्तव्यावर आपल्याला आता काहीही म्हणायचे नाही, असे सांगत त्यांनी या मुद्यावर बोलणे टाळले.

सत्तेचा गैरवापर टीकत नाही, श्रीलंकेने दाखवून दिले

श्रीलंकेत सत्ता केंद्रीत झाली होती. सत्तेचा पाहिजे तसा वापर केला जात होता. आज लोक राष्ट्रपतींच्या घरात घुसुन संघर्ष करीत आहेत. लाखो लोक रस्त्यावर आहेत. सत्तेचा गैरवापर हा फार काळ टीकत नसतो, हे श्रीलंकेने दाखवून दिले आहे, असे सांगत पवार यांनी पक्षाच्य कार्यकर्त्यांना एकसंघ राहून शक्तिशाली संघटन उभारण्याचे आवाहन कार्यकारिणीच्या बैठकीत केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस