शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

आगामी निवडणुकात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र लढावे; उद्धव ठाकरेनंतर शरद पवारांचंही मत

By कमलेश वानखेडे | Updated: July 15, 2022 17:53 IST

राज्यात पूरपरिस्थीत आहे. प्रशासन ठप्प पडले आहे. फक्त दोनच मंत्री गेले १०-१२ दिवसांपासून कामावर आहेत, राज्याची परिस्थिती बघता हे नुकसानदायक आहे, असा टोलाही पवार यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला.

कमलेश वानखेडे

नागपूर :  नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी शक्य तिथे युती करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी देखील या भूमिकेचे समर्थन केले आहे.

हे तिनही पक्ष एकत्र लढले तर लोकांना अपेक्षित असलेला निकाल मिळेल. माझंही तेच मत आहे. याबाबत आम्ही पक्ष पातळीवर चर्चा केली आहे, असे पवार यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पण याबाबत काँग्रेस सोबत व  शिवसेने सोबतही चर्चा केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. 

शरद पवार हे एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. त्यांनी पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, संसदेत बोलताना एखाद्या विषयावर  सरकारकडे मागणी केली आणि मान्य झाली नाही तर विरोधक सभात्याग करतात. बाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरधरणे देतात. आता केंद्र सरकारने एक परिपत्रक काढून या अधिकारावरील बंदी आणली आहे.  हे करताना देशातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतलं होतं का, असा सवाल करीत याबाबत उद्या दिल्लीत बैठक होईल आणि आमची दिशा ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेले १०-१२ दिवस दोन मंत्रीच कामावर

राज्यात पूरपरिस्थीत आहे. प्रशासन ठप्प पडले आहे. फक्त दोनच मंत्री गेले १०-१२ दिवसांपासून कामावर आहेत, राज्याची परिस्थिती बघता हे नुकसानदायक आहे, असा टोलाही पवार यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला. नव्या सरकारने काही नवीन केले असते तर मी अभिनंदन केले असते. पण आधीचे निर्णय रद्द करणे आणि हे दाखवणे की काहीतरी मोठे केले, असे सुरू आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. शिंदे सीएम नाहीच, खरे सीएम फडणावीसच आहेत, या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, राऊत हे या दोघांबरोबर काम करून आहेत, त्यामुळे त्यांना कोणाची काय कुवत आहे ते माहिती आहे. ५० पैकी एकही आमदार हरला तर राजीनामा देईन या शिंदे यांच्या वक्तव्यावर आपल्याला आता काहीही म्हणायचे नाही, असे सांगत त्यांनी या मुद्यावर बोलणे टाळले.

सत्तेचा गैरवापर टीकत नाही, श्रीलंकेने दाखवून दिले

श्रीलंकेत सत्ता केंद्रीत झाली होती. सत्तेचा पाहिजे तसा वापर केला जात होता. आज लोक राष्ट्रपतींच्या घरात घुसुन संघर्ष करीत आहेत. लाखो लोक रस्त्यावर आहेत. सत्तेचा गैरवापर हा फार काळ टीकत नसतो, हे श्रीलंकेने दाखवून दिले आहे, असे सांगत पवार यांनी पक्षाच्य कार्यकर्त्यांना एकसंघ राहून शक्तिशाली संघटन उभारण्याचे आवाहन कार्यकारिणीच्या बैठकीत केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस