शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काँग्रेससोबत आघाडीमुळे विदर्भात राष्ट्रवादीची प्रगती झाली नाही, प्रफुल्ल पटेलांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 10:29 IST

पटेल यांनी आघाडीची खंत व्यक्त करताना राष्ट्रवादीने २००४ मध्ये हातची संधी सोडल्याचीही भावना व्यक्त केली.

ठळक मुद्देसंधी मिळाली तेव्हा हट्टही धरला नाही

नागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रगती होऊ शकली नाही. आघाडी असल्याने जेव्हा जेव्हा निवडणुकीत जागा वाटपाची वेळ यायची, तेव्हा तेव्हा काँग्रेसचा विद्यमान आमदार असल्याने राष्ट्रवादीला जागा मिळू शकल्या नाहीत. त्याचा विदर्भातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही परिणाम झाला. त्यामुळे विदर्भात राष्ट्रवादीच्या प्रगतीला काँग्रेसची आघाडी अडचणीची ठरल्याची खंत राज्यसभेचे नवनियुक्त खासदार व माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

पटेल यांची राज्यसभेत निवड झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते आदी उपस्थित होते. याप्रसंगी पटेल यांनी आघाडीची खंत व्यक्त करताना राष्ट्रवादीने २००४ मध्ये हातची संधी सोडल्याचीही भावना व्यक्त केली. २००४ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी राष्ट्रवादीला मिळाली होती. विदर्भात ११, तर राज्यात काँग्रेसपेक्षा जास्त आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले होते. तरीही काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरला. तेव्हाच जर राष्ट्रवादीने हट्ट धरला असता आणि मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असता, तर विदर्भातील चित्र वेगळे दिसले असते, असेही ते म्हणाले.

- मनपात राष्ट्रवादीचे मिशन ट्वेंटी

या कार्यक्रमात नागपुरातील कार्यकर्त्यांनी निधी संदर्भातील खंत व्यक्त केली. तेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, निधीला कमी पडू देणार नाहीत. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मिशन ट्वेंटी ठेवा. तरच मनपात राष्ट्रवादीशिवाय पर्याय राहणार नाही, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसPraful Patelप्रफुल्ल पटेल