शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

काँग्रेससोबत आघाडीमुळे विदर्भात राष्ट्रवादीची प्रगती झाली नाही, प्रफुल्ल पटेलांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 10:29 IST

पटेल यांनी आघाडीची खंत व्यक्त करताना राष्ट्रवादीने २००४ मध्ये हातची संधी सोडल्याचीही भावना व्यक्त केली.

ठळक मुद्देसंधी मिळाली तेव्हा हट्टही धरला नाही

नागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रगती होऊ शकली नाही. आघाडी असल्याने जेव्हा जेव्हा निवडणुकीत जागा वाटपाची वेळ यायची, तेव्हा तेव्हा काँग्रेसचा विद्यमान आमदार असल्याने राष्ट्रवादीला जागा मिळू शकल्या नाहीत. त्याचा विदर्भातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही परिणाम झाला. त्यामुळे विदर्भात राष्ट्रवादीच्या प्रगतीला काँग्रेसची आघाडी अडचणीची ठरल्याची खंत राज्यसभेचे नवनियुक्त खासदार व माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

पटेल यांची राज्यसभेत निवड झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते आदी उपस्थित होते. याप्रसंगी पटेल यांनी आघाडीची खंत व्यक्त करताना राष्ट्रवादीने २००४ मध्ये हातची संधी सोडल्याचीही भावना व्यक्त केली. २००४ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी राष्ट्रवादीला मिळाली होती. विदर्भात ११, तर राज्यात काँग्रेसपेक्षा जास्त आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले होते. तरीही काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरला. तेव्हाच जर राष्ट्रवादीने हट्ट धरला असता आणि मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असता, तर विदर्भातील चित्र वेगळे दिसले असते, असेही ते म्हणाले.

- मनपात राष्ट्रवादीचे मिशन ट्वेंटी

या कार्यक्रमात नागपुरातील कार्यकर्त्यांनी निधी संदर्भातील खंत व्यक्त केली. तेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, निधीला कमी पडू देणार नाहीत. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मिशन ट्वेंटी ठेवा. तरच मनपात राष्ट्रवादीशिवाय पर्याय राहणार नाही, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसPraful Patelप्रफुल्ल पटेल