शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

काँग्रेससोबत आघाडीमुळे विदर्भात राष्ट्रवादीची प्रगती झाली नाही, प्रफुल्ल पटेलांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 10:29 IST

पटेल यांनी आघाडीची खंत व्यक्त करताना राष्ट्रवादीने २००४ मध्ये हातची संधी सोडल्याचीही भावना व्यक्त केली.

ठळक मुद्देसंधी मिळाली तेव्हा हट्टही धरला नाही

नागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रगती होऊ शकली नाही. आघाडी असल्याने जेव्हा जेव्हा निवडणुकीत जागा वाटपाची वेळ यायची, तेव्हा तेव्हा काँग्रेसचा विद्यमान आमदार असल्याने राष्ट्रवादीला जागा मिळू शकल्या नाहीत. त्याचा विदर्भातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही परिणाम झाला. त्यामुळे विदर्भात राष्ट्रवादीच्या प्रगतीला काँग्रेसची आघाडी अडचणीची ठरल्याची खंत राज्यसभेचे नवनियुक्त खासदार व माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

पटेल यांची राज्यसभेत निवड झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते आदी उपस्थित होते. याप्रसंगी पटेल यांनी आघाडीची खंत व्यक्त करताना राष्ट्रवादीने २००४ मध्ये हातची संधी सोडल्याचीही भावना व्यक्त केली. २००४ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी राष्ट्रवादीला मिळाली होती. विदर्भात ११, तर राज्यात काँग्रेसपेक्षा जास्त आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले होते. तरीही काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरला. तेव्हाच जर राष्ट्रवादीने हट्ट धरला असता आणि मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असता, तर विदर्भातील चित्र वेगळे दिसले असते, असेही ते म्हणाले.

- मनपात राष्ट्रवादीचे मिशन ट्वेंटी

या कार्यक्रमात नागपुरातील कार्यकर्त्यांनी निधी संदर्भातील खंत व्यक्त केली. तेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, निधीला कमी पडू देणार नाहीत. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मिशन ट्वेंटी ठेवा. तरच मनपात राष्ट्रवादीशिवाय पर्याय राहणार नाही, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसPraful Patelप्रफुल्ल पटेल