शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

जागतिक संत्रा महोत्सवामुळे शेतकऱ्यांना मिळणार नवसंजीवनी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 21:53 IST

लोकमतच्या पुढाकाराने आणि शासन व प्रशासनाच्या सहभागाने आयोजित जागतिक संत्रा महोत्सवामुळे नागपूरचा संत्रा हा जागतिक पातळीवर पोहोचेल. त्याची चांगली मार्केटिंग होईल आणि त्याचा सर्वाधिक लाभ हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे या महोत्सवाबाबत अधिकाऱ्यांसह संत्रा उत्पादक संघ व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी वनामती येथे आयोजित बैठकीत अधिकारी व संत्रा उत्पादकांमध्ये चर्चा झाली आणि संत्रा महोत्सवाबाबत अनेक महत्त्वाच्या सूचनाही आल्या.

ठळक मुद्देअधिकारी-उत्पादकांमध्ये उत्साह : बैठकीत अनेक महत्त्वाच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमतच्या पुढाकाराने आणि शासन व प्रशासनाच्या सहभागाने आयोजित जागतिक संत्रा महोत्सवामुळे नागपूरचा संत्रा हा जागतिक पातळीवर पोहोचेल. त्याची चांगली मार्केटिंग होईल आणि त्याचा सर्वाधिक लाभ हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे या महोत्सवाबाबत अधिकाऱ्यांसह संत्रा उत्पादक संघ व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी वनामती येथे आयोजित बैठकीत अधिकारी व संत्रा उत्पादकांमध्ये चर्चा झाली आणि संत्रा महोत्सवाबाबत अनेक महत्त्वाच्या सूचनाही आल्या.जागतिक संत्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अप्पर आयुक्त व वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी वनामती येथे कृषी अधिकारी आणि संत्रा उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत महाऑरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे, विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, नागपूर संत्रा, फ्रुट, फ्लॉवर, व्हेजिटेबल उत्पादन सहकारी संस्था काटोलचे सचिव आणि ऑर्गेनिक शेतीचे पुरस्कर्ते मनोज जवंजाळ, सुधीर जगताप, मिलिंद राऊत, रणजित चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.१८ ते २१ जानेवारी दरम्यान नागपुरतील रेशिमबाग मैदानावर जागतिक संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. यंदा शासन व प्रशासन यात पूर्णपणे सहभगी आहे. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात बैठक घेऊन सर्व कृषी विभागासह सर्व विभागांना या महोत्सवाच्या तयारीसंदंर्भात आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. याअंतर्गत कृषी विभागातर्फे संत्रा उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांची दुसरी बैठक वनामती येथे पार पडली. यात चांगली चर्चा झाली. अनेकांनी आपले विचार मांडले. संत्रा महोत्सवात देश विदेशातील तज्ञांचे मार्गदर्शन होईल. भव्य प्रदर्शन राहील. मनोरंजनासह प्रबोधनही होईल. एकूणच संत्र्याचे जास्तीत जास्त मार्केटिंग करून तो लोकांपर्यंत जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. तेव्हा यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी जनजागृती केली जाईल. शेतकऱ्यांना महोत्सवापर्यंत आणले जाईल, असा प्रयत्न करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला. लोकमतचे आतिष वानखेडे यांनी संत्रा महोत्सवाचे प्रेझेंटेशन सादर केले.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरFarmerशेतकरी