शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रीचा उपवास करत असाल तर, हे जरूर वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 21:07 IST

Nagpur News नऊ दिवस उपवास करणाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि उपवासाच्या फराळात सात्त्विकता असावी, याबाबत आरोग्यतज्ज्ञांनी काही टिप्स दिलेल्या आहेत.

ठळक मुद्देपाणी, दूध, फळांचा रस घ्या साबुदाणा, बटाटे अन् जादा तैलीय पदार्थ टाळा

 

नागपूर : शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होताच, देवीच्या नऊ रूपांच्या आराधनेत भक्त मंडळी तल्लीन झाली आहे. देवीच्या आराधनेचे विविध पैलू आहेत. कुणी गरबा नृत्याद्वारे देवीला आपला भाव समर्पित करतात, तर कुणी दुर्गासप्तशती पाठ करतात, तर कुणी उपवासाद्वारे मातेपुढे आपली भक्ती व्यक्त करतात. एकूणच, नवरात्रोत्सवाचे हे पर्व भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचे असते आणि या काळात शक्तीचे उत्सर्जन वातावरणात होत असलेले आपण बघतो. नऊ दिवस उपवास करणाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि उपवासाच्या फराळात सात्त्विकता असावी, याबाबत आरोग्यतज्ज्ञांनी काही टिप्स दिलेल्या आहेत. त्या अशा...

उपवासाला काय खावे?

नवरात्रोत्सवाच्या उपवासात दूध, दही, ताक, ताजी फळे, ताज्या फळांचा रस, पनीर, शेंगदाणे, बदाम, अक्राेड, पिस्ता, मखाना, लवकी आदी कच्च्या भाज्या, शिंगाड्याचे थालीपीठ आदी खाणे योग्य आहे. ड्रायफ्रूट्समधील ओमेगा फॅटी ॲसिड थ्री हृदयासाठी अतिलाभकारक असते. त्यामुळे, ड्रायफूट्स कधीही उत्तम ठरतात. यासोबतच नारळपाणी, छाछ, कच्ची केळे आदींचे सेवन उत्तम ठरेल.

उपवासाला काय खाऊ नये?

साबुदाणा व साबुदाण्याचे पदार्थ, भगर, बटाटे, शिळी फळे, विक्रती ज्यूस, तळलेले पदार्थ आदी पदार्थ खाऊ नये. हे पदार्थ शरीरासाठी घातक असतात. यामुळे, शुगर वाढते आणि कार्बोहायड्रेडचे प्रमाण वाढते. पॅकेज्ड स्नॅक्समध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते घेऊ नये.

डेटॉक्स डायटसाठी काय करावे, काय करू नये?

नियमित पांढऱ्या मिठाऐवजी सेंदामीठ घ्यावे. याचे अनेक लाभ आहेत. उपवास आहे म्हणून दीर्घकाळपर्यंत उपाशी राहण्यापेक्षा दूध, दही, फळांचा रस घेत राहावे. पोट शांत ठेवण्यासाठी दही, काकडी, फळे घेत राहावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी पाणी पित राहावे.

उपवास करताना शरीरातील पाण्याचे संतुलन राखा

उपवास करणे ही प्रक्रिया भक्तिपूर्ण असते आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्यही आहे. मात्र, उपवास करताना अतिवाद टाळावा. बराच काळपर्यंत उपवास केल्याने कमजोरी, ॲनिमिया, थकवा, डोकेदुखी वाढू शकते. त्यासाठी पाणी, कमी फॅट्स असणारे दूध, नारळपाणी, फळांचा रस घ्यावा. तैलीय पदार्थ टाळावे आणि उपवासाच्या वेळी अतिपरिश्रम असणारी कामे टाळणे योग्य ठरेल. साखरेचे पदार्थ टाळावे.

- डॉ. स्वाती अवस्थी, आहार विशेषज्ञ 

...............

टॅग्स :Navratriनवरात्री