शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

नवरात्रीचा उपवास करत असाल तर, हे जरूर वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 21:07 IST

Nagpur News नऊ दिवस उपवास करणाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि उपवासाच्या फराळात सात्त्विकता असावी, याबाबत आरोग्यतज्ज्ञांनी काही टिप्स दिलेल्या आहेत.

ठळक मुद्देपाणी, दूध, फळांचा रस घ्या साबुदाणा, बटाटे अन् जादा तैलीय पदार्थ टाळा

 

नागपूर : शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होताच, देवीच्या नऊ रूपांच्या आराधनेत भक्त मंडळी तल्लीन झाली आहे. देवीच्या आराधनेचे विविध पैलू आहेत. कुणी गरबा नृत्याद्वारे देवीला आपला भाव समर्पित करतात, तर कुणी दुर्गासप्तशती पाठ करतात, तर कुणी उपवासाद्वारे मातेपुढे आपली भक्ती व्यक्त करतात. एकूणच, नवरात्रोत्सवाचे हे पर्व भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचे असते आणि या काळात शक्तीचे उत्सर्जन वातावरणात होत असलेले आपण बघतो. नऊ दिवस उपवास करणाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि उपवासाच्या फराळात सात्त्विकता असावी, याबाबत आरोग्यतज्ज्ञांनी काही टिप्स दिलेल्या आहेत. त्या अशा...

उपवासाला काय खावे?

नवरात्रोत्सवाच्या उपवासात दूध, दही, ताक, ताजी फळे, ताज्या फळांचा रस, पनीर, शेंगदाणे, बदाम, अक्राेड, पिस्ता, मखाना, लवकी आदी कच्च्या भाज्या, शिंगाड्याचे थालीपीठ आदी खाणे योग्य आहे. ड्रायफ्रूट्समधील ओमेगा फॅटी ॲसिड थ्री हृदयासाठी अतिलाभकारक असते. त्यामुळे, ड्रायफूट्स कधीही उत्तम ठरतात. यासोबतच नारळपाणी, छाछ, कच्ची केळे आदींचे सेवन उत्तम ठरेल.

उपवासाला काय खाऊ नये?

साबुदाणा व साबुदाण्याचे पदार्थ, भगर, बटाटे, शिळी फळे, विक्रती ज्यूस, तळलेले पदार्थ आदी पदार्थ खाऊ नये. हे पदार्थ शरीरासाठी घातक असतात. यामुळे, शुगर वाढते आणि कार्बोहायड्रेडचे प्रमाण वाढते. पॅकेज्ड स्नॅक्समध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते घेऊ नये.

डेटॉक्स डायटसाठी काय करावे, काय करू नये?

नियमित पांढऱ्या मिठाऐवजी सेंदामीठ घ्यावे. याचे अनेक लाभ आहेत. उपवास आहे म्हणून दीर्घकाळपर्यंत उपाशी राहण्यापेक्षा दूध, दही, फळांचा रस घेत राहावे. पोट शांत ठेवण्यासाठी दही, काकडी, फळे घेत राहावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी पाणी पित राहावे.

उपवास करताना शरीरातील पाण्याचे संतुलन राखा

उपवास करणे ही प्रक्रिया भक्तिपूर्ण असते आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्यही आहे. मात्र, उपवास करताना अतिवाद टाळावा. बराच काळपर्यंत उपवास केल्याने कमजोरी, ॲनिमिया, थकवा, डोकेदुखी वाढू शकते. त्यासाठी पाणी, कमी फॅट्स असणारे दूध, नारळपाणी, फळांचा रस घ्यावा. तैलीय पदार्थ टाळावे आणि उपवासाच्या वेळी अतिपरिश्रम असणारी कामे टाळणे योग्य ठरेल. साखरेचे पदार्थ टाळावे.

- डॉ. स्वाती अवस्थी, आहार विशेषज्ञ 

...............

टॅग्स :Navratriनवरात्री