शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

नवरात्रीचा उपवास करत असाल तर, हे जरूर वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 21:07 IST

Nagpur News नऊ दिवस उपवास करणाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि उपवासाच्या फराळात सात्त्विकता असावी, याबाबत आरोग्यतज्ज्ञांनी काही टिप्स दिलेल्या आहेत.

ठळक मुद्देपाणी, दूध, फळांचा रस घ्या साबुदाणा, बटाटे अन् जादा तैलीय पदार्थ टाळा

 

नागपूर : शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होताच, देवीच्या नऊ रूपांच्या आराधनेत भक्त मंडळी तल्लीन झाली आहे. देवीच्या आराधनेचे विविध पैलू आहेत. कुणी गरबा नृत्याद्वारे देवीला आपला भाव समर्पित करतात, तर कुणी दुर्गासप्तशती पाठ करतात, तर कुणी उपवासाद्वारे मातेपुढे आपली भक्ती व्यक्त करतात. एकूणच, नवरात्रोत्सवाचे हे पर्व भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचे असते आणि या काळात शक्तीचे उत्सर्जन वातावरणात होत असलेले आपण बघतो. नऊ दिवस उपवास करणाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि उपवासाच्या फराळात सात्त्विकता असावी, याबाबत आरोग्यतज्ज्ञांनी काही टिप्स दिलेल्या आहेत. त्या अशा...

उपवासाला काय खावे?

नवरात्रोत्सवाच्या उपवासात दूध, दही, ताक, ताजी फळे, ताज्या फळांचा रस, पनीर, शेंगदाणे, बदाम, अक्राेड, पिस्ता, मखाना, लवकी आदी कच्च्या भाज्या, शिंगाड्याचे थालीपीठ आदी खाणे योग्य आहे. ड्रायफ्रूट्समधील ओमेगा फॅटी ॲसिड थ्री हृदयासाठी अतिलाभकारक असते. त्यामुळे, ड्रायफूट्स कधीही उत्तम ठरतात. यासोबतच नारळपाणी, छाछ, कच्ची केळे आदींचे सेवन उत्तम ठरेल.

उपवासाला काय खाऊ नये?

साबुदाणा व साबुदाण्याचे पदार्थ, भगर, बटाटे, शिळी फळे, विक्रती ज्यूस, तळलेले पदार्थ आदी पदार्थ खाऊ नये. हे पदार्थ शरीरासाठी घातक असतात. यामुळे, शुगर वाढते आणि कार्बोहायड्रेडचे प्रमाण वाढते. पॅकेज्ड स्नॅक्समध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते घेऊ नये.

डेटॉक्स डायटसाठी काय करावे, काय करू नये?

नियमित पांढऱ्या मिठाऐवजी सेंदामीठ घ्यावे. याचे अनेक लाभ आहेत. उपवास आहे म्हणून दीर्घकाळपर्यंत उपाशी राहण्यापेक्षा दूध, दही, फळांचा रस घेत राहावे. पोट शांत ठेवण्यासाठी दही, काकडी, फळे घेत राहावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी पाणी पित राहावे.

उपवास करताना शरीरातील पाण्याचे संतुलन राखा

उपवास करणे ही प्रक्रिया भक्तिपूर्ण असते आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्यही आहे. मात्र, उपवास करताना अतिवाद टाळावा. बराच काळपर्यंत उपवास केल्याने कमजोरी, ॲनिमिया, थकवा, डोकेदुखी वाढू शकते. त्यासाठी पाणी, कमी फॅट्स असणारे दूध, नारळपाणी, फळांचा रस घ्यावा. तैलीय पदार्थ टाळावे आणि उपवासाच्या वेळी अतिपरिश्रम असणारी कामे टाळणे योग्य ठरेल. साखरेचे पदार्थ टाळावे.

- डॉ. स्वाती अवस्थी, आहार विशेषज्ञ 

...............

टॅग्स :Navratriनवरात्री