शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पाला विकासात्मक योजनांचे स्वरूप

By admin | Updated: July 14, 2014 02:54 IST

यंदाच्या अर्थसंकल्पात संपुआ सरकारच्याच योजना असल्याचे दावे करण्यात

देवेंद्र फडणवीस : केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषणनागपूर : यंदाच्या अर्थसंकल्पात संपुआ सरकारच्याच योजना असल्याचे दावे करण्यात येत आहेत. काही अंशी हे नक्की खरे आहे. परंतु योजना जरी त्याच असल्या तरी त्यांचे स्वरूप नक्कीच बदलले आहे व विकासाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. श्रीराम अर्बन को-आॅप. बँक लि. व लघु उद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विक्रम साठे स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आयटी पार्क येथील कालिदास सभागृहात झालेल्या या व्याख्यानात देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांसमोर केंद्रीय अर्थसंकल्प-२०१४ चे सखोल विश्लेषण केले.यंदाचा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोर बरीच आव्हाने होती. वाढती वित्तीय तूट, करंट अकाऊंट डेफिसिट, महागाईचा वाढता दर, रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक ही त्यातील महत्त्वाची आव्हाने होती. अर्थसंकल्पात या बाबींना स्पर्श करण्यात आला परंतु सोबतच भविष्यातील विकासात्मक फायदा लक्षात घेऊन नवनवीन योजनांची घोषणा करण्यात आली. विकास होईल तर रोजगार निर्मिती होईल, गरीब व्यक्ती सक्षम होईल व त्याची क्रयशक्ती वाढेल. पर्यायाने अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. प्रा. भगवतींच्या याच विचारांची झलक यंदाच्या अर्थसंकल्पात दिसत आहे, असे फडणवीस म्हणाले.नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात जनतेला ‘अच्छे दिन’चे आश्वासन दिले होते. मोदी यांचे ‘व्हिजन’ या अर्थसंकल्पातून समोर आले आहे. विमा व संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्के केल्यामुळे जास्त प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.महागाई कमी करण्यासाठी, अन्नसुरक्षा, उच्चशिक्षण, प्राथमिक शिक्षण, सामाजिक समस्या, वंचितांचा विकास, तंत्रज्ञान इत्यादींसंदर्भात अर्थसंकल्पातील विकासात्मक योजना भविष्यात किती फायदेशीर ठरू शकतात या गोष्टींचे देवेंद्र फडणवीस यांनी विश्लेषण केले. यावेळी श्रीराम अर्बन को-आॅप. बँकेचे अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर, उपाध्यक्ष अभिराम देशमुख, लघु उद्योग भारतीचे विश्राम जामदार प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)