शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

बेरोजगारीचा सामना करण्यासाठी व्हावा राष्ट्रीय युवा आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:51 IST

देशातील कोट्यवधी तरुण रोजगारासाठी भटकंती करीत आहेत. अशा परिस्थितीत तरुणांना बेरोजगारीपासून दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर राष्ट्रीय युवा आयोगाचे गठन करावे, अशी मागणी युवा चेतना संघटना दिल्लीचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांनी केली. नागपूर दौऱ्यावर आलेले असताना सिंह यांनी शनिवारी ‘लोकमत’कार्यालयात विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.

ठळक मुद्देयुवा चेतना संघटनेचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील कोट्यवधी तरुण रोजगारासाठी भटकंती करीत आहेत. अशा परिस्थितीत तरुणांना बेरोजगारीपासून दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर राष्ट्रीय युवा आयोगाचे गठन करावे, अशी मागणी युवा चेतना संघटना दिल्लीचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांनी केली. नागपूर दौऱ्यावर आलेले असताना सिंह यांनी शनिवारी ‘लोकमत’कार्यालयात विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.रोहित कुमार सिंह म्हणाले, राष्ट्रीय युवा आयोगाच्या धर्तीवर राज्यातही युवा आयोग तयार व्हायला हवेत; सोबतच बेरोजगारांना कमीतकमी व्याजदरावर कर्ज पुरवठा करावयास हवा. तरुणांना रोजगार देण्यासाठी केंद्र सरकारच्या हातात सूत्र असावे असेयुवकांबाबतचे धोरण तयार व्हावयास हवे. सध्या देशात बहुतांश राज्यात बेरोजगारी भत्ता देण्यात येत नाही. अशास्थितीत केंद्र सरकारतर्फे हा भत्ता ठरवून राज्य शासनाने त्यावर अंमलबजावणी करण्यावर भर दिला पाहिजे. त्यांनी राजकारणात वाढत्या घराणेशाही विरुद्ध आवाज बुलंद करण्यावर भर दिला. ते म्हणाले, राजकीय घराणेशाहीत सर्व राजकीय पक्ष सामील आहेत. यामुळे सर्व देश पीडित आहे. या घराणेशाही विरुद्ध युवा चेतना संघटना वातावरण तयार करीत आहे. देशाच्या सध्याच्या स्थितीसाठी त्यांनी आधीचे शासन जबाबदार असल्याचे सांगितले.सरकारी शाळात शिकावीत नेत्यांची मुलेरोहित कुमार सिंह म्हणाले, मागील काही वर्षांत सरकारी शाळांबाबतचे आकर्षण कमी झाले आहे. या शाळा गरिबांच्या मुलांसाठी आहेत, अशी धारणा झाली आहे. ही धारणा बदलविण्यासाठी शासनात सहभागी नेते आणि अधिकाऱ्यांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये शिकविण्यासाठी सुरुवात करावी लागेल. देशातील बेरोजगारीसाठी सध्याचे शैक्षणिक धोरण जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या वेतनासाठी एकजूट होणाऱ्या देशातील नेत्यांनी चांगले शैक्षणिक धोरण, युवकांबाबतचे धोरण तयार करण्यावर भर द्यावयास हवा. शिक्षणाचे भारतीयकरण होणे गरजेचे आहे.१५ राज्यांत काम करीत आहे युवा चेतनारोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, सध्या युवा चेतना संघटना देशातील १५ राज्यांत राष्ट्रीय विचारधारेसाठी काम करीत आहे. महाराष्ट्रात लवकरच संघटनेचे काम सुरू होणार आहे. संघटनेचे मुख्य कार्यालय दिल्लीत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरLokmat Bhavanलोकमत भवन