शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

राष्ट्रीय सुरक्षा दिवस; शून्य अपघाताचे ध्येय गाठणे सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 07:00 IST

राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा ४ मार्च रोजी साजरा केला जातो. यानिमित्त सुरक्षा सप्ताहांतर्गत ४ ते ११ मार्चदरम्यान कारखान्यांमध्ये सुरक्षिततेच्या जागृतीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. या माध्यमातून अपघाताचे ध्येय गाठणे सोपे आहे.

ठळक मुद्देकारखान्यांमध्ये सुरक्षिततेसाठी जनजागृती आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा ४ मार्च रोजी साजरा केला जातो. यानिमित्त सुरक्षा सप्ताहांतर्गत ४ ते ११ मार्चदरम्यान कारखान्यांमध्ये सुरक्षिततेच्या जागृतीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. या माध्यमातून अपघाताचे ध्येय गाठणे सोपे आहे.कारखान्यांशी निगडित विविध बाबींपैकी ‘कामगारांची सुरक्षितता’ याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अपघात कोणताही असो, तो दु:ख देणाराच आहे. या अपघातरूपी दु:खातून बाहेर पडण्याचा मार्ग भगवान बुद्ध यांचा ‘आर्य अष्टंगिक मार्ग’ आहे. हा मार्ग सुरक्षिततेकडे नेणारा आहे. कारखाना अपघातमुक्त असावा, अशी कारखानदारांची भूमिका असणे, कारखान्याची दोषमुक्त यंत्रसामग्री, जागरूक यंत्रणा, सुरक्षा धोरण निश्चित करणे, यंत्र अथवा प्रक्रियेपासून काहीही इजा होणार नाही, हा समज काढून टाकणे आवश्यक आहे.यंत्र, रसायनांचे धोकादायक दृष्टिकोन ठेवून काम करणे, त्या वस्तुस्थितीची सतत जाणीव ठेवणे म्हणजे सम्यक दृष्टी आहे. खोटे बोलणे, शिवीगाळ करणे, कठोर बोलणे, व्यर्थ बडबड या बाबी कारखान्यातील वातावरण अस्थिर, असुरक्षित करतात. कारखानदाराने धोकादायक स्थितीची माहिती देणे, व्यवस्थापन, कामगारांत मित्रत्वाचे संभाषण, वैचारिक देवाणघेवाण ही कारखान्यात सुरक्षिततेचे वातावरण राहण्यास मदत करते. इतरांना आपल्यामुळे त्रास, इजा होईल अशा वागण्यापासून स्वत:ला अलिप्त ठेवणे, मालमत्ता अथवा यंत्रसाग्रीची हानी होईल, अशा कृतीपासून दूर राहणे, शॉर्टकट पद्धती न वापरता निर्धारित कार्यप्रणालीचा वापर करणे, व्यवस्थापनाने सुरक्षा कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी सतत प्रयत्नशील राहणे, हा सम्यक कर्मान्त आहे. वेळ, श्रम वाचविण्यासाठी चुकीच्या पद्धतीने यंत्राच्या हाताळणीपासून कामगारांनी दूर राहणे आवश्यक आहे. कारखानदाराने सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून केवळ नफा वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवणे धोकादायक आहे.

राष्ट्रीय संपत्तीचे जतन संवर्धनकारखान्यात काम करताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गॉगल, हातमोजे, सेफ्टी शूज, गमबूट, जॅकेट, टोपी अशी सुरक्षिततेची साधने पुरविली जातात. त्यांचा वापर कसा करायचा हेही प्रात्यक्षिकांसह दाखविले जाते, तरीसुद्धा ओव्हर स्मार्टपणामुळे अपघात होण्याची संख्या काही कमी नाही. कामगारांना कामासंबंधी प्रशिक्षित केलेले असते. मंत्रालयात लागलेली आग, त्यात गमवावा लागलेला जीव, राष्ट्रध्वजाला धक्का लागू नये, म्हणून कर्मचाऱ्यांनी केलेला प्रयत्न; मात्र हेळसांडपणा, हलगर्जीपणा करून केवळ स्वत:चे, संस्थेचे, कुटुंबाचेच नव्हे तर राष्ट्राचेसुद्धा नुकसान होते, याचा विसर पडता कामा नये. राष्ट्रीय संपत्तीचे जतन, संवर्धन महत्त्वाचे आहे..सुरक्षेबाबत आचरण गरजेचेराष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाबाबत सर्व कामगारांना शपथ दिली जाते. ‘मी माझा देश मोठा करीन. माझ्याकडून कोणताही, कसल्याही प्रकारचा अपघात होणार नाही. मी माझे काम उच्च लेखून कसल्याही प्रकारची हेळसांड न करता लक्षपूर्वक करीन आणि स्वत:बरोबर इतरांच्या जीवितांची दक्षता घेईन. अशी शपथ फक्त नावापुरती नको. तिचे आचरण केले तर अनेक अपघात टळणार आहेत शिवाय असंघटित कामगारांचे जीवन सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. तरच समृद्ध राष्ट्रनिर्माण होईल, हे खरेच आहे.सुरक्षितता जोपासणे आवश्यकसचोटीने कारखाना चालविणे आवश्यक आहे. जनजागृती, प्रशिक्षण, सुरक्षा व्यवस्था, नियमांची वारंवार उजळणी, संयंत्रांची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. कामावर असताना अमली पदार्थांचे सेवन आपली सतर्कता नष्ट करते. कामाच्या ठिकाणी सभोवतालच्या असुरक्षित परिस्थितीबाबत जागरूक असल्यास अपघात टाळता येऊ शकतात व त्यातूनच सुरक्षितता जोपासली जाते.चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, एमआयए हिंगणा असोसिएशन.

 

 

टॅग्स :fireआग