शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ७ आॅगस्टला मुंबईत महाअधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:46 IST

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन ७ आॅगस्टला मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट क्लब आॅफ इंडिया डोम येथे आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देओबीसी समाजाचा अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात समावेश करा यासह २४ मागण्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन ७ आॅगस्टला मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट क्लब आॅफ इंडिया डोम येथे आयोजित करण्यात आले आहे.यात ओबीसी समाजाची जातनिहाय गणना करून केंद्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी. मंडल आयोग नच्चीपन समिती व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, ओबीसी घटकातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. ओबीसींना लावण्यात आलेली क्रिमिलेअरची घटनाबाह्य अट रद्द करण्यात यावी, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना संयुक्त भारतरत्न प्रदान करण्यात यावा, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा देण्यात यावा, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे, तहसीलपासून न्यायिक स्तरावरील भरतीत आरक्षण लागू करावे, ओबीसी समाजाचा अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात समावेश करण्यात यावा यासह विविध प्रकारच्या २४ मागण्यांसाठी महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा देशातील ओबीसी समाजासाठी कार्यरत असणाºया विविध ओबीसी संघटनांचा एक महासंघ आहे. या महासंघाचे पहिले अधिवेशन नागपुरात ७ आॅगस्ट २०१६ रोजी झाले होते. या अधिवेशनामुळे महाराष्ट्र शासनाला नॉन क्रिमिलेअरची मर्यादा साडेचार लाखाहून सहा लाख करण्याचा निर्णय घ्यावा लागला होेता. ८ डिसेंबर २०१६ रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनावर एक लाखापेक्षा मोठा मोर्चा काढण्यात आला होता. परिणामी महाराष्ट्र सरकारला ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी लागली. ८ आॅगस्ट २०१७ च्या महाअधिव्ोशनानंतर नॉन क्रिमिलेअरची मर्यादा ८ लाख करण्यात आली. देशातील सर्व ओबीसी समाजाच्या एकत्रीकरणाचे हे फलित आहे. तसेच केंद्र सरकारने नागपुरात ५०० विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला मान्यता दिली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाअधिवेशनाचे उद्घाटन होणार असून यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी दिली. या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केले आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर