शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रच्या मिशनला लागले विदर्भात ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 09:52 IST

महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहीम हाती घेतली आहे.‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ या नावाने मिशनची सुरुवात झाली आहे. परंतु या मिशनला विदर्भातच ग्रहण लागले आहे.

ठळक मुद्देमेडिकल सोडल्यास सर्वांचे लक्ष्य अपूर्णमेयो, उपजिल्हा रुग्णालय, एनजीओ हॉस्पिटल अपयशी

सुमेध वाघमारे।आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहीम हाती घेतली आहे.‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ या नावाने मिशनची सुरुवात झाली आहे. परंतु या मिशनला विदर्भातच ग्रहण लागले आहे. नागपूरचे मेडिकल सोडल्यास मेयो, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व सहा एनजीओ रुग्णालयांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे दिलेले लक्ष्यच गाठता आले नाही. विशेष म्हणजे, शासकीय रुग्णालयांना या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्याची मदत दिली जाते, तर एनजीओ हॉस्पिटल्सना प्रति रुग्ण हजार रुपये व इतरही शासकीय सोयी पुरविल्या जातात. त्यानंतरही हे रुग्णालय अपयशी ठरल्याने ‘ राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमा’ला शस्त्रक्रियेची गरज असल्याचे चित्र आहे.दरवर्षी मोतीबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्याची सरासरी काढल्यास त्याची टक्केवारी ७२ टक्के आहे. एकट्या महाराष्ट्रत १७ लाख मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यातील सुमारे पाच लाख रुग्णांवर तातडीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. याला घेऊन ‘राष्टÑीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत’ दरवर्षी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व एनजीओ हॉस्पिटल्सना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिल्या जाते. त्यानुसार या कार्यक्रमांतर्गत २०१६-१७ या वर्षाकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) २,५०० मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. केवळ याच रुग्णालयाने लक्ष्य पूर्ण केले. एवढेच नव्हे तर त्यापेक्षा जास्त २,६६१ शस्त्रक्रिया केल्या.मेयोचे केवळ ५५ टक्केच लक्ष्यइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) २००० मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. परंतु ५५ टक्केच लक्ष्य पूर्ण करीत १०९९ शस्त्रक्रिया केल्या. उपजिल्हा रुग्णालय कामठी, उपजिल्हा रुग्णालय रामटेक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे डागा हॉस्पिटल (ओटी) व शासकीय आयुर्वेदिक कॉलेज व रुग्णालय मिळून ३,८२५ शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. परंतु या सर्वांना मिळूनही लक्ष्य पूर्ण करता आले नाही. २,९४६ शस्त्रक्रियाच केल्या.एनजीओ हॉस्पिटलही उदासीनसार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या  एनजीओ हॉस्पिटलच्या यादीत डॉ. महात्मे आय कॅम्प नागपूरला ३६२५ मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. परंतु यां हॉस्पिटलने केवळ ३२ टक्के म्हणजे ११७६ शस्त्रक्रिया केल्या. एन.के. हॉस्पिटल व लता मंगेशकर हॉस्पिटलला १८०० शस्त्रक्रियेचे लक्ष्य होते. या दोन्ही हॉस्पिटलने ७७ टक्के म्हणजे १३८७ शस्त्रक्रिया केल्या. सूरज आय इन्स्टिट्यूटला १२०० शस्त्रक्रियेचे लक्ष्य देण्यात आले होते या इस्पितळाने फक्त २० टक्केच लक्ष्य पूर्ण करीत २४१ शस्त्रक्रिया केल्या. योगीराज हॉस्पिटल, रामटेकला ५५० शस्त्रक्रियेचे लक्ष्य देण्यात आले होते. या हॉस्पिटलने सर्वात कमी म्हणजे ९८ शस्त्रक्रिया केल्या. एस.व्ही. मिशन खापरीला ६०० शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले असताना १२७ शस्त्रक्रिया तर इव्हिस्टा आय केअर हॉस्पिटलला ६०० शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले असताना १२६ शस्त्रक्रिया केल्या.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Healthआरोग्य