शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

राष्ट्रीय पक्षीदिन; टायगर कॅपिटलमध्ये माेरांच्या अस्तित्वावर संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 21:15 IST

Nagpur News एकेकाळी नागपूरच्या परिसरात माेरांच्या वास्तव्यामुळे ‘पिकाॅक कॅपिटल’ म्हणूनही ओळख मिळावी या मागणीने जाेर धरला हाेता. मात्र त्यांच्या अधिवासावर आलेल्या अनेक संकटामुळे राष्ट्रीय पक्ष्याच्या अस्तित्वावरच संकट आले आहे.

ठळक मुद्देकधीतरी १० हजारावर गणना प्रदूषण, अधिवासात ढवळाढवळ ठरते कारण

निशांत वानखेडे

नागपूर : उपराजधानीचे क्षेत्र तसे टायगर कॅपिटल म्हणून प्रसिद्ध आहेच पण एकेकाळी नागपूरच्या परिसरात माेरांच्या वास्तव्यामुळे ‘पिकाॅक कॅपिटल’ म्हणूनही ओळख मिळावी या मागणीने जाेर धरला हाेता. मात्र त्यांच्या अधिवासावर आलेल्या अनेक संकटामुळे राष्ट्रीय पक्ष्याच्या अस्तित्वावरच संकट आले आहे.

अनेक प्रकारच्या जैवविविधतेने संपन्न असलेल्या संत्रानगरीचे वातावरण राष्ट्रीय पक्ष्यासाठीही पाेषक ठरले हाेते. दाेनतीन वर्षात या सुंदर पक्ष्याची संख्या १० हजारावर गेली हाेती. एका अंदाजानुसार अंबाझरीच्या ७५० हेक्टर परिसरात २००० च्यावर माेर आहेत. याशिवाय गाेरेवाडा परिसरात २०००, राजभवन परिसरात १०० च्यावर, नारा नारी भागात ३०० ते ३५० च्यावर माेर आहेत. याशिवाय अमरावती राेडवर कृषी विद्यापीठाचा परिसर, दिघाेरी, पारडी, साेनेगाव, साेमलवाडा, मिहान या परिसरात माेरांचे अस्तित्व हाेते. यासह उमरेड राेडवर माेठ्या प्रमाणात माेरांचा अधिवास हाेता. मात्र आता ते दिसेनासे झाले आहेत.

मानद वन्यजीव सदस्य अविनाश लाेंढे यांनी सांगितले, अमरावती राेडवरील गावांमध्ये माेठ्या प्रमाणात माेरांची शिकार हाेत असल्याचे दिसून आले आहे. बाजारगाव, कळमेश्वर भागातही शिकारीचे प्रमाण वाढले आहेत. उमरेड राेडचे चाैपदरीकरण करण्याच्या कामात माेठ्या प्रमाणात वृक्षताेड झाली व येथे राहणाऱ्या माेरांचा अधिवास नष्ट झाला. शिवाय या भागात खदानीची संख्या वाढली असून अवैध उत्खननाचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे माेरांच्या अधिवासात ढवळाढवळ वाढली असल्याने कधीकाळ मुबलक प्रमाणात दिसणारे माेर दिसेनासे झाले आहेत. दुसरीकडे अंबाझरी किंवा गाेरेवाडा जंगलात सायकल ट्रॅकिंग व इतर गाेष्टींमुळे मानवी डिस्टर्बन्स वाढला असल्याने माेरांनी नागपूरपासून दूर जाण्याचे ठरविले की काय, अशी स्थिती झाली आहे.

जैवविविधता टिकवायची असेल तर अधिवासाचा हाेणारा र्हास आणि डिर्स्टबन्स थांबविणे गरजेचे आहे. विकासकामांना विराेध नाही पण पर्यावरणाची हानी हाेणार नाही, याची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कधीकाळ माेरांची संख्या माेठ्या प्रमाणात हाेती व पिकाॅक कॅपिटल व्हावी, असे वाटत हाेते. मात्र आता माेर कुठे दिसेनासे झाले आहेत.

- अविनाश लाेंढे, मानद वन्यजीव संरक्षक

टॅग्स :wildlifeवन्यजीव