शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

राष्ट्रीय पक्षीदिन; टायगर कॅपिटलमध्ये माेरांच्या अस्तित्वावर संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 21:15 IST

Nagpur News एकेकाळी नागपूरच्या परिसरात माेरांच्या वास्तव्यामुळे ‘पिकाॅक कॅपिटल’ म्हणूनही ओळख मिळावी या मागणीने जाेर धरला हाेता. मात्र त्यांच्या अधिवासावर आलेल्या अनेक संकटामुळे राष्ट्रीय पक्ष्याच्या अस्तित्वावरच संकट आले आहे.

ठळक मुद्देकधीतरी १० हजारावर गणना प्रदूषण, अधिवासात ढवळाढवळ ठरते कारण

निशांत वानखेडे

नागपूर : उपराजधानीचे क्षेत्र तसे टायगर कॅपिटल म्हणून प्रसिद्ध आहेच पण एकेकाळी नागपूरच्या परिसरात माेरांच्या वास्तव्यामुळे ‘पिकाॅक कॅपिटल’ म्हणूनही ओळख मिळावी या मागणीने जाेर धरला हाेता. मात्र त्यांच्या अधिवासावर आलेल्या अनेक संकटामुळे राष्ट्रीय पक्ष्याच्या अस्तित्वावरच संकट आले आहे.

अनेक प्रकारच्या जैवविविधतेने संपन्न असलेल्या संत्रानगरीचे वातावरण राष्ट्रीय पक्ष्यासाठीही पाेषक ठरले हाेते. दाेनतीन वर्षात या सुंदर पक्ष्याची संख्या १० हजारावर गेली हाेती. एका अंदाजानुसार अंबाझरीच्या ७५० हेक्टर परिसरात २००० च्यावर माेर आहेत. याशिवाय गाेरेवाडा परिसरात २०००, राजभवन परिसरात १०० च्यावर, नारा नारी भागात ३०० ते ३५० च्यावर माेर आहेत. याशिवाय अमरावती राेडवर कृषी विद्यापीठाचा परिसर, दिघाेरी, पारडी, साेनेगाव, साेमलवाडा, मिहान या परिसरात माेरांचे अस्तित्व हाेते. यासह उमरेड राेडवर माेठ्या प्रमाणात माेरांचा अधिवास हाेता. मात्र आता ते दिसेनासे झाले आहेत.

मानद वन्यजीव सदस्य अविनाश लाेंढे यांनी सांगितले, अमरावती राेडवरील गावांमध्ये माेठ्या प्रमाणात माेरांची शिकार हाेत असल्याचे दिसून आले आहे. बाजारगाव, कळमेश्वर भागातही शिकारीचे प्रमाण वाढले आहेत. उमरेड राेडचे चाैपदरीकरण करण्याच्या कामात माेठ्या प्रमाणात वृक्षताेड झाली व येथे राहणाऱ्या माेरांचा अधिवास नष्ट झाला. शिवाय या भागात खदानीची संख्या वाढली असून अवैध उत्खननाचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे माेरांच्या अधिवासात ढवळाढवळ वाढली असल्याने कधीकाळ मुबलक प्रमाणात दिसणारे माेर दिसेनासे झाले आहेत. दुसरीकडे अंबाझरी किंवा गाेरेवाडा जंगलात सायकल ट्रॅकिंग व इतर गाेष्टींमुळे मानवी डिस्टर्बन्स वाढला असल्याने माेरांनी नागपूरपासून दूर जाण्याचे ठरविले की काय, अशी स्थिती झाली आहे.

जैवविविधता टिकवायची असेल तर अधिवासाचा हाेणारा र्हास आणि डिर्स्टबन्स थांबविणे गरजेचे आहे. विकासकामांना विराेध नाही पण पर्यावरणाची हानी हाेणार नाही, याची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कधीकाळ माेरांची संख्या माेठ्या प्रमाणात हाेती व पिकाॅक कॅपिटल व्हावी, असे वाटत हाेते. मात्र आता माेर कुठे दिसेनासे झाले आहेत.

- अविनाश लाेंढे, मानद वन्यजीव संरक्षक

टॅग्स :wildlifeवन्यजीव