शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Nashik Bus Accident : मृत चालकाला दोषी ठरवून मालकासह आरटीओला अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 13:29 IST

ट्रॅव्हल्स अपघाताच्या प्राथमिक चौकशीतील निष्कर्ष; विधिज्ञ म्हणतात, अपघात नव्हे संगनमताने केलेले कृत्य

नागपूर : यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सचा नाशिक येथे अपघात झाला. यात १२ जणांचा जळून कोळसा झाला, तर ४३ जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले. या घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल आला असून, त्यात मृत बस चालकाला दोषी ठरविण्यात आले आहे. तर मालक आणि आरटीओ विभागाला अभय देण्यात आले आहे. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशीची गरज असल्याचे विधिज्ञांचे म्हणणे आहे.

नाशिक येथील अपघाताच्या घटनेनंतर बसच्या सुरक्षा साधनांची तपासणी करणारी आरटीओची यंत्रणाही याकडे दुर्लक्ष करीत होती, हे उघड झाले. अपघाताच्या घटनेनंतर नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक प्रवीण शहाजी देवरे यांनी एमएच २९ एडब्ल्यू ३१ या खासगी बसचा चालक ब्रह्मदत्त सोगाजी मनवर (अपघातात मृत) याच्यावर पूर्ण ठपका ठेवला. वाहन बेदरकारपणे चालविले, प्रवाशांच्या मरणास कारणीभूत, गंभीर दुखापतीस कारणीभूत असल्याने त्याच्यावर भादंवि ३०४ अ, २७९, ३३६, ३३७, ३३८, ४२७ तसेच मोटरवाहन कायदा कलम १८४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

- बसमधील त्रुटींची चौकशी आवश्यक

खासगी बसमधील सुरक्षा तपासणी ही आरटीओची जबाबदारी आहे. अपघात झालेल्या बसमध्ये नेमक्या काय त्रुटी होत्या, याची चौकशी होणे गरजेची आहे. क्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवासी यवतमाळहून नाशिकपर्यंत घेऊन जात असतानाही बसला कुठेही थांबविण्यात आले नाही. बसमध्ये ‘स्पीड गव्हर्नर’ बसविले होते का, आग विझविणारी यंत्रणा होती काय, याचीही खातरजमा झाली नाही. विशेष म्हणजे, बस चालक जिवंत नाही. त्याच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे ठोस अशी कारवाई होणार नसल्याचे दिसून येत आहे.

सर्वांवर गुन्हा दाखल व्हायला हवा

या अपघातात चालकासोबत खासगी बसचे संचालक आणि आरटीओ अधिकारी यांची अक्षम्य चूक आहे. हा केवळ निष्काळजीपणाने झालेल्या अपघातातील मृत्यू नसून सदोष मनुष्यवधाअंतर्गत मोडणारा गुन्हा आहे. यात आरटीओचे जबाबदार अधिकारी, वाहतूक पोलीस शाखेतील अधिकारी, खासगी बस संचालक यांनी संगमनताने घडवून आणलेले कृत्य आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल व्हायला हवा.

- अॅड. जयसिंह चव्हाण

- वर्धेत संस्था चालकाला बस अपघातात शिक्षा

वर्धा येथे एका संस्थेच्या बसचा अपघात झाला. त्यात चालकासोबत संस्था चालकावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होता. याच धर्तीवर खासगी बस अपघातात कारवाई होणे आवश्यक आहे.

- ॲड. इम्रान देशमुख

- आरटीओ तपासणी नसल्याने सुरक्षेला धोका

निकषाप्रमाणे खासगी बसेसची तपासणी होत नाही. रात्रकालिन बसेस ताशी १०० पेक्षा अधिक वेगाने धावतात. प्रवासी सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. हाच प्रकार १२ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने संबंधित यंत्रणेसह संचालकावरही गुन्हा नोंद होणे आवश्यक आहे.

- ॲड. अमित बदनोरे, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ, यवतमाळ.

- बस तपासणीची यंत्रणाच बदलणे गरजेचे

वारंवार होणाऱ्या खासगी बसच्या अपघाताला गंभीरतेने घ्यायला हवे. बस तपासणीची यंत्रणाच बदलणे गरजेचे आहे. जो पर्यंत एखाद्या अपघातात अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात नाही तोपर्यंत यंत्रणा सुधरणार नाही.

- राजू वाघ, सदस्य राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद, परिवहन मंत्रालय

- निष्काळजीपणा झाला म्हणूनच अपघात

बसमधील आपत्कालिन स्थितीत सुखरूप बाहेर पडणे सहज शक्य आहे. या अपघातात निष्काळजीपणा झाला म्हणूनच मृत्यूची संख्या वाढली. दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

- रवींद्र कासखेडीकर, सचिव जनआक्रोश, नागपूर

टॅग्स :AccidentअपघातRto officeआरटीओ ऑफीसYavatmalयवतमाळNashikनाशिक