शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

Nashik Bus Accident : मृत चालकाला दोषी ठरवून मालकासह आरटीओला अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 13:29 IST

ट्रॅव्हल्स अपघाताच्या प्राथमिक चौकशीतील निष्कर्ष; विधिज्ञ म्हणतात, अपघात नव्हे संगनमताने केलेले कृत्य

नागपूर : यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सचा नाशिक येथे अपघात झाला. यात १२ जणांचा जळून कोळसा झाला, तर ४३ जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले. या घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल आला असून, त्यात मृत बस चालकाला दोषी ठरविण्यात आले आहे. तर मालक आणि आरटीओ विभागाला अभय देण्यात आले आहे. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशीची गरज असल्याचे विधिज्ञांचे म्हणणे आहे.

नाशिक येथील अपघाताच्या घटनेनंतर बसच्या सुरक्षा साधनांची तपासणी करणारी आरटीओची यंत्रणाही याकडे दुर्लक्ष करीत होती, हे उघड झाले. अपघाताच्या घटनेनंतर नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक प्रवीण शहाजी देवरे यांनी एमएच २९ एडब्ल्यू ३१ या खासगी बसचा चालक ब्रह्मदत्त सोगाजी मनवर (अपघातात मृत) याच्यावर पूर्ण ठपका ठेवला. वाहन बेदरकारपणे चालविले, प्रवाशांच्या मरणास कारणीभूत, गंभीर दुखापतीस कारणीभूत असल्याने त्याच्यावर भादंवि ३०४ अ, २७९, ३३६, ३३७, ३३८, ४२७ तसेच मोटरवाहन कायदा कलम १८४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

- बसमधील त्रुटींची चौकशी आवश्यक

खासगी बसमधील सुरक्षा तपासणी ही आरटीओची जबाबदारी आहे. अपघात झालेल्या बसमध्ये नेमक्या काय त्रुटी होत्या, याची चौकशी होणे गरजेची आहे. क्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवासी यवतमाळहून नाशिकपर्यंत घेऊन जात असतानाही बसला कुठेही थांबविण्यात आले नाही. बसमध्ये ‘स्पीड गव्हर्नर’ बसविले होते का, आग विझविणारी यंत्रणा होती काय, याचीही खातरजमा झाली नाही. विशेष म्हणजे, बस चालक जिवंत नाही. त्याच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे ठोस अशी कारवाई होणार नसल्याचे दिसून येत आहे.

सर्वांवर गुन्हा दाखल व्हायला हवा

या अपघातात चालकासोबत खासगी बसचे संचालक आणि आरटीओ अधिकारी यांची अक्षम्य चूक आहे. हा केवळ निष्काळजीपणाने झालेल्या अपघातातील मृत्यू नसून सदोष मनुष्यवधाअंतर्गत मोडणारा गुन्हा आहे. यात आरटीओचे जबाबदार अधिकारी, वाहतूक पोलीस शाखेतील अधिकारी, खासगी बस संचालक यांनी संगमनताने घडवून आणलेले कृत्य आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल व्हायला हवा.

- अॅड. जयसिंह चव्हाण

- वर्धेत संस्था चालकाला बस अपघातात शिक्षा

वर्धा येथे एका संस्थेच्या बसचा अपघात झाला. त्यात चालकासोबत संस्था चालकावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होता. याच धर्तीवर खासगी बस अपघातात कारवाई होणे आवश्यक आहे.

- ॲड. इम्रान देशमुख

- आरटीओ तपासणी नसल्याने सुरक्षेला धोका

निकषाप्रमाणे खासगी बसेसची तपासणी होत नाही. रात्रकालिन बसेस ताशी १०० पेक्षा अधिक वेगाने धावतात. प्रवासी सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. हाच प्रकार १२ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने संबंधित यंत्रणेसह संचालकावरही गुन्हा नोंद होणे आवश्यक आहे.

- ॲड. अमित बदनोरे, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ, यवतमाळ.

- बस तपासणीची यंत्रणाच बदलणे गरजेचे

वारंवार होणाऱ्या खासगी बसच्या अपघाताला गंभीरतेने घ्यायला हवे. बस तपासणीची यंत्रणाच बदलणे गरजेचे आहे. जो पर्यंत एखाद्या अपघातात अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात नाही तोपर्यंत यंत्रणा सुधरणार नाही.

- राजू वाघ, सदस्य राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद, परिवहन मंत्रालय

- निष्काळजीपणा झाला म्हणूनच अपघात

बसमधील आपत्कालिन स्थितीत सुखरूप बाहेर पडणे सहज शक्य आहे. या अपघातात निष्काळजीपणा झाला म्हणूनच मृत्यूची संख्या वाढली. दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

- रवींद्र कासखेडीकर, सचिव जनआक्रोश, नागपूर

टॅग्स :AccidentअपघातRto officeआरटीओ ऑफीसYavatmalयवतमाळNashikनाशिक