शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Nashik Bus Accident : मृत चालकाला दोषी ठरवून मालकासह आरटीओला अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 13:29 IST

ट्रॅव्हल्स अपघाताच्या प्राथमिक चौकशीतील निष्कर्ष; विधिज्ञ म्हणतात, अपघात नव्हे संगनमताने केलेले कृत्य

नागपूर : यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सचा नाशिक येथे अपघात झाला. यात १२ जणांचा जळून कोळसा झाला, तर ४३ जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले. या घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल आला असून, त्यात मृत बस चालकाला दोषी ठरविण्यात आले आहे. तर मालक आणि आरटीओ विभागाला अभय देण्यात आले आहे. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशीची गरज असल्याचे विधिज्ञांचे म्हणणे आहे.

नाशिक येथील अपघाताच्या घटनेनंतर बसच्या सुरक्षा साधनांची तपासणी करणारी आरटीओची यंत्रणाही याकडे दुर्लक्ष करीत होती, हे उघड झाले. अपघाताच्या घटनेनंतर नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक प्रवीण शहाजी देवरे यांनी एमएच २९ एडब्ल्यू ३१ या खासगी बसचा चालक ब्रह्मदत्त सोगाजी मनवर (अपघातात मृत) याच्यावर पूर्ण ठपका ठेवला. वाहन बेदरकारपणे चालविले, प्रवाशांच्या मरणास कारणीभूत, गंभीर दुखापतीस कारणीभूत असल्याने त्याच्यावर भादंवि ३०४ अ, २७९, ३३६, ३३७, ३३८, ४२७ तसेच मोटरवाहन कायदा कलम १८४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

- बसमधील त्रुटींची चौकशी आवश्यक

खासगी बसमधील सुरक्षा तपासणी ही आरटीओची जबाबदारी आहे. अपघात झालेल्या बसमध्ये नेमक्या काय त्रुटी होत्या, याची चौकशी होणे गरजेची आहे. क्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवासी यवतमाळहून नाशिकपर्यंत घेऊन जात असतानाही बसला कुठेही थांबविण्यात आले नाही. बसमध्ये ‘स्पीड गव्हर्नर’ बसविले होते का, आग विझविणारी यंत्रणा होती काय, याचीही खातरजमा झाली नाही. विशेष म्हणजे, बस चालक जिवंत नाही. त्याच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे ठोस अशी कारवाई होणार नसल्याचे दिसून येत आहे.

सर्वांवर गुन्हा दाखल व्हायला हवा

या अपघातात चालकासोबत खासगी बसचे संचालक आणि आरटीओ अधिकारी यांची अक्षम्य चूक आहे. हा केवळ निष्काळजीपणाने झालेल्या अपघातातील मृत्यू नसून सदोष मनुष्यवधाअंतर्गत मोडणारा गुन्हा आहे. यात आरटीओचे जबाबदार अधिकारी, वाहतूक पोलीस शाखेतील अधिकारी, खासगी बस संचालक यांनी संगमनताने घडवून आणलेले कृत्य आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल व्हायला हवा.

- अॅड. जयसिंह चव्हाण

- वर्धेत संस्था चालकाला बस अपघातात शिक्षा

वर्धा येथे एका संस्थेच्या बसचा अपघात झाला. त्यात चालकासोबत संस्था चालकावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होता. याच धर्तीवर खासगी बस अपघातात कारवाई होणे आवश्यक आहे.

- ॲड. इम्रान देशमुख

- आरटीओ तपासणी नसल्याने सुरक्षेला धोका

निकषाप्रमाणे खासगी बसेसची तपासणी होत नाही. रात्रकालिन बसेस ताशी १०० पेक्षा अधिक वेगाने धावतात. प्रवासी सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. हाच प्रकार १२ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने संबंधित यंत्रणेसह संचालकावरही गुन्हा नोंद होणे आवश्यक आहे.

- ॲड. अमित बदनोरे, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ, यवतमाळ.

- बस तपासणीची यंत्रणाच बदलणे गरजेचे

वारंवार होणाऱ्या खासगी बसच्या अपघाताला गंभीरतेने घ्यायला हवे. बस तपासणीची यंत्रणाच बदलणे गरजेचे आहे. जो पर्यंत एखाद्या अपघातात अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात नाही तोपर्यंत यंत्रणा सुधरणार नाही.

- राजू वाघ, सदस्य राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद, परिवहन मंत्रालय

- निष्काळजीपणा झाला म्हणूनच अपघात

बसमधील आपत्कालिन स्थितीत सुखरूप बाहेर पडणे सहज शक्य आहे. या अपघातात निष्काळजीपणा झाला म्हणूनच मृत्यूची संख्या वाढली. दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

- रवींद्र कासखेडीकर, सचिव जनआक्रोश, नागपूर

टॅग्स :AccidentअपघातRto officeआरटीओ ऑफीसYavatmalयवतमाळNashikनाशिक