शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

देशाचे पायलट म्हणून नरेंद्र मोदी अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 21:08 IST

विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी कुशल पायलटची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे देशाच्या १२५ कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या पायलटची देशाला आवश्यकता आहे. देशाचा पायलट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शुक्रवारी नागपुरात केली.

ठळक मुद्देहार्दिक पटेल यांची टीका : दीक्षाभूमीला दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी कुशल पायलटची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे देशाच्या १२५ कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या पायलटची देशाला आवश्यकता आहे. देशाचा पायलट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शुक्रवारी नागपुरात केली.अकोला येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते नागपुरात आले होते. नागपुरात आल्यानंतर प्रथम त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या चार वर्षात मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. नरेंद्र मोदींबद्दल लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या. शेतकऱ्यांना दामदुप्पट भाव देऊ, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, असे आश्वासन दिल्यानंतरही शेतकºयांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे, विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे जनता विचारत आहे. अच्छे दिन कुठे आहेत? विमानात जाताना आपण चांगला पायलट असावा, अशी अपेक्षा करतो. प्रवाशांचे जीवन पायलटच्या हातात असते. त्याचप्रमाणे देशातील सव्वाशे कोटी लोकांचे भवितव्य पंतप्रधानांच्या हातात असते. परंतु देशाचा पायलट संपूर्णपणे अपयशी ठरला असून आता त्यांच्या हातात देश ठेवणे धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा पटेल यांनी दिला.पंतप्रधानांना होती पीएनबी घोटाळ्याची माहितीहिरे व्यापारी नीरव मोदी यांनी केलेला पीएनबी घोटाळ्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होती, असा आरोप करीत पीएनबी घोटाळ्याबद्दल आपला नाईलाज असल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे. यावरून त्यांना या घोटाळ्याची पूर्वकल्पना होती, हे स्पष्ट होते. या घोटाळ्याची पूर्वकल्पना असताना चुप्पी साधणे हा देशद्रोह ठरत नाही काय, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलnagpurनागपूर