शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

डांबरीकरण नावासाठी; पाऊस येताच पुन्हा खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:41 IST

पारडी उड्डाणपुलाच्या नियोजनशून्य कामामुळे पारडी चौकाला जोडणाऱ्या सर्व मार्गाची दुरवस्था झालेली आाहे. नागरिकांचा प्रचंड विरोध विचारात घेता पारडी ते कळमना व पारडी चौक ते पारडी बाजार दरम्यानच्या काही भागात पावसाची उघाड असताना डांबरीकरण करण्यात आले. परंतु पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अद्याप जोराचा पाऊ स झाला नसतानाही रविवारी डांबरीकरण करण्यात आलेल्या भागातील गिट्टी निघाली असून, रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देपारडी उड्डाणपूल : नागरिकांच्या जीवाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारडी उड्डाणपुलाच्या नियोजनशून्य कामामुळे पारडी चौकाला जोडणाऱ्या सर्व मार्गाची दुरवस्था झालेली आाहे. नागरिकांचा प्रचंड विरोध विचारात घेता पारडी ते कळमना व पारडी चौक ते पारडी बाजार दरम्यानच्या काही भागात पावसाची उघाड असताना डांबरीकरण करण्यात आले. परंतु पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अद्याप जोराचा पाऊ स झाला नसतानाही रविवारी डांबरीकरण करण्यात आलेल्या भागातील गिट्टी निघाली असून, रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली आहे.पारडी चौक ते कळमना दरम्यानच्या मार्गावरील एका भागात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आॅफ इंडियाने आधीच खोदकाम केले आहे. येथील खांब उभारण्याचे काम बºयाच दिवसापासून रखडले आहे. मार्गाच्या दुसºया बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांची ये-जा सुरू आहे. पावसाला सुरुवात होताच या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते. ‘लोकमत’ ने यासंदर्भात वृत्तमालिका प्रकाशित करून नागरिकांना होणारा त्रास निदर्शनास आणला; सोबतच प्राधिकरणाची मनमानी व लोकप्रतिनिधींची उदासीनता उघडकीस आणली होती.त्यानंतर औपचारिकता म्हणून खड्डे पडलेल्या भागात डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु निकृष्ट कामामुळे रविवारी सायंकाळी पहिल्याच पावसात मार्गावरील गिट्टी बाहेर आली. डागडुजी करण्यात आलेल्या भागात पुन्हा खड्डे पडले. यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.पारडी चौक ते वर्धमाननगर, प्रजापती चौक ते स्वामीनारायण मंदिर मार्गाचीही अशीच अवस्था आहे. रस्ता कमी व खड्डे अधिक झालेले आहेत. या भागात डांबरीकरण कधी होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.लोकप्रतिनिधी जागे कधी होणार?पूर्व नागपूर हा भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. कृष्णा खोपडे या भागाचे आमदार आहेत. महापालिकेत पूर्व नागपुरातील एकूण नगरसेवकांपैकी ९० टक्के नगरसेवक भाजपाचे आहेत. लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे पारडी भागात वास्तव्यास आहेत. त्यांनाही या खड्ड्याच्या मार्गाने ये-जा करावी लागते. असे असूनही ते गप्प का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या भागातील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील अधिकाºयांना निवेदन सादर करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती.डांबरीकरणाला सुरुवात होताच वाडीभस्मे याचे श्रेय घेण्यासाठी पुढे आले होते. परंतु रविवारच्या पावसात रस्ता पुन्हा उखडल्याने ते आता नागरिकांना काय सांगणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील इतर नगरसेवकांनीही मौनीबाबाची भूमिका घेतली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरroad safetyरस्ते सुरक्षा