शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाच्या नावावर आदिवासींना केले विस्थापित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:15 IST

मेळघाट व्याघ्र प्र्रकल्पातील गावांमधील मूळ निवासी असलेल्या आदिवासींना पुनर्वसनाच्या नावावर विस्थापित करण्यात आले असल्याचा आरोप राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने केला असून, याविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय आदिवासी एकता परिषद : अमरावतीच्या शेड्युल क्षेत्रातून हटवून आकोटच्या नॉन शेड्युल परिसरात वसविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेळघाट व्याघ्र प्र्रकल्पातील गावांमधील मूळ निवासी असलेल्या आदिवासींना पुनर्वसनाच्या नावावर विस्थापित करण्यात आले असल्याचा आरोप राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने केला असून, याविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे. गुरुवारी रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमकुमार गेडाम यांनी संगितले की, अमरावती जिल्हा हा शेड्युल ५ मध्ये येतो. येथील १६८४ आदिवासी कुटुंबांना २०१२ मध्ये खोटे आश्वासन देऊन नॉन शेड्युल असलेल्या आकोटमध्ये वसवण्यात आले. त्यांना पुनर्वसनाच्या नियमानुसार वर्षभरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या. परंतु आजपर्यंत त्यांना पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, बाजार आणि निवासाचीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपाशी मरण्याची वेळ आली. आतापर्यंत २७५ लोकांचा भुकेने बळी गेला आहे. हे आदिवसी कुटुंब अनेक वर्षांपासून आपल्या न्यायासाठी लढत आहेत. पैदल मार्च आणि निवेदन देऊन ते थकले आहेत. रोजगाराचे कुठलेही साधन नसल्याने शेवटी या आदिवासी कुटुंबांनी आपल्या जुन्या गावी परत जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. १७ जानेवारी २०१९ रोजी ते आपल्या गावी आले तेव्हा वन विभाग आणि पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यांच्यावर लाठीहल्ला केला. गोळीबार केला. यात चंपालाल पेठे या आदिवासी नेत्याला गोळी लागली. ३५ आदिवासी जखमी झाले. १९ आदिवासी अजूनही बेपत्ता आहेत. आदिवासींनी आपल्या रक्षणासाठी प्रतिकार केला असता वन अधिकाऱ्यांनी उलट त्यांच्यावरच खोटा आरोप लावला की आदिवासींनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला.प्रसिद्धी माध्यमांमध्येही खोटी माहिती दिली. वन अधिकारी व पोलीस आजही येथील आदिवासींना धमकावीत आहेत. आदिवासी त्यांच्या दहशतीत जगत आहेत. तेव्हा आदिवासींना न्याय मिळावा. मेळघाट येथील आदिवासींचे पुनर्वसन अमरावती जिल्ह्यातच व्हावे, त्यांना नुकसान भरपाईपोटी प्रत्येक कुटुंबाला एक कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आदिवासींच्या न्यायासाठी परिषदेतर्फे लवकरच न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असून रस्त्यावरची लढाईसुद्धा लढू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पत्रपरिषदेत डॉ. सुनील पेंदोर, प्रभुलाल परतेकी उपस्थित होते.

टॅग्स :MelghatमेळघाटTrible Development Schemeआदिवासी विकास योजना