शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

कोळसा स्वच्छतेच्या नावावर कोट्यवधीचा गोलमाल; टंकलेखनात चुका करून कोल वॉशरीजचे खिसे गरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 08:00 IST

कोल वॉशरीचा मोठा खेळ सुरू आहे आणि या भ्रष्टाचारात ऊर्जा विभागाचे अधिकारीच नाहीत, तर व्यापारी अन् राजकारणी अशी संपूर्ण यंत्रणाच गुंतलेली आहे.

कमल शर्मा

नागपूर : काही व्हाइट कॉलर लोकांनी कोळसा (कोल) वॉशरीच्या माध्यमातून काळा पैसा कमावण्याचा असा मार्ग शोधला, जाे जाणून तुम्हाला धक्का बसेल. विजेचे संकट येते तेव्हा आपण वीज कंपन्यांना शिव्याशाप करताे. मात्र, हा विषय साधा नाही. कोल वॉशरीचा मोठा खेळ सुरू आहे आणि या भ्रष्टाचारात ऊर्जा विभागाचे अधिकारीच नाहीत, तर व्यापारी अन् राजकारणी अशी संपूर्ण यंत्रणाच गुंतलेली आहे. करदात्यांच्या पैशाची खुलेआम लूट केली जात आहे.

हे सर्व कसे घडते आहे, ते धक्कादायक आहे. यासाठी काेल वाॅशरीजचा विषय समजून घ्यावा लागेल. तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आलेली कोल वॉशरी भ्रष्टाचाराच्या अड्ड्यात रूपांतरित झाली आहे. त्यांना लाभ देण्यासाठी सरकारी यंत्रणाही तत्पर आहे. आश्चर्य म्हणजे यासाठी महाजेनकोने टायपिंग मिस्टेकचे कारण देत नियमच बदलले आहेत. त्यामुळे कोल वॉशरीजवर ठाेठावलेला कोट्यवधी रुपयांचा दंड कमी होईल. त्यामुळे औष्णिक वीज केंद्रांना निकृष्ट दर्जाचा कोळसा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

महाराष्ट्रातील कोल वॉशरीजवर यापूर्वीही असे आराेप झाले हाेते, ज्यामुळे २०११ साली त्यांना बंद करण्यात आले हाेते. मात्र, २०१९ मध्ये कोणतीही मागणी नसताना ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कोल वॉशरीजची जबाबदारी महाजेनकोच्या नियंत्रणात न ठेवण्याचा बदल करण्यात आला. २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ (एमएसएमसी) ही नोडल एजन्सी बनवून  फेरनिविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. 

२०२१ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. दोन वर्षांनंतर, महाजेनकोच्या लक्षात आले की, ती चुकीच्या सूत्राचा वापर करून कोल वॉशरींकडून कोळसा खरेदी करत आहे. निविदेच्या अटीनुसार, कोळसा पुरवठा ‘ॲज रिसीव्ह बेसिस’ (एआरसी) वर केला जाणार होता, पण वर्कऑर्डरमध्ये ते ‘एअर ड्राय बेस’ (एडीबी) झाले. टंकलेखनाच्या चुकीमुळे हे सर्व घडले का? 

येथे शंका उद्भवते कारण तीन वर्षांत ‘एडीबी’च्या मानकांची पूर्तता न केल्याबद्दल आकारण्यात आलेला दंड आता ‘एआरसी’नुसार आकारला जाईल, जाे अत्यंत कमी असेल. स्पष्टपणे यातूनही काही लाेकांना फायदा पाेहोचविण्याचे हे माध्यम असल्याचेच दिसून येत आहे. देशभरात केवळ एआरसी कार्यरत असल्याने कोळशात राखेचे प्रमाण ३१ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे या सूत्राची अंमलबजावणी केली असल्याचा युक्तिवाद  महाजेनकोने केला आहे. या सूत्रानुसार दंड ३ टक्क्यांनी कमी होणार असल्याचा दावा महाजेनकोचे अधिकारी करीत आहेत. अशा परिस्थितीत कोल वॉशरीजवरील दंड कमी हाेणारच आहे,  त्याचप्रमाणे, काेळशाच्या गुणवत्तेत घोळ करण्याचीही संधी त्यांना मिळण्याची शक्यता आहे.

दंडाची प्रक्रिया इतकी किचकट का?

एमएसएमसीने कोल वॉशरीजमधून येणाऱ्या कोळशाची तपासणी करण्यासाठी एजन्सीही नेमली आहे. मानकांचे पालन केले नाही तर महाजेनको वॉशरीजना दंड करते. 

आता फॉर्म्युला बदलल्यानंतर दंड कमी होणार असला तरी, ताे किती कमी हाेईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

महाजेनकोच्या म्हणण्यानुसार दंड ठरविण्याची प्रक्रिया खूप किचकट असते, ज्यामुळे यासाठी खूप वेळ लागेल. त्यानंतरच कोल वॉशरीजला त्यांचे थकीत बिल मिळेल.

‘एडीबी’च्या सूत्रानुसार, कोल वॉशरीजला कोळशातून ओलावा आणि राख काढून औष्णिक वीज केंद्राला द्यावी लागते. कोळशात राखेचे प्रमाण ३१ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. मात्र, ‘एआरसी’मध्ये अशी कोणतीही अट नाही.

टॅग्स :nagpurनागपूरCoal Allocation Scamकोळसा खाण घोटाळा