शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

नाईक घराण्यातील नीलय यांना भाजपाकडून उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:16 IST

राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनिष्ठ राहिलेल्या पुसदच्या (जि. यवतमाळ) नाईक घराण्यातील अ‍ॅड. नीलय नाईक यांना भाजपाने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. पशुसंवर्धन मंत्री व रासपाचे नेते महादेव जानकर, विद्यमान आमदार भाई गिरकर, नांदेड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष राम पाटील रातोळीकर आणि रमेश पाटील यांनाही भाजपाने संधी दिली आहे.

नागपूर : राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनिष्ठ राहिलेल्या पुसदच्या (जि. यवतमाळ) नाईक घराण्यातील अ‍ॅड. नीलय नाईक यांना भाजपाने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. पशुसंवर्धन मंत्री व रासपाचे नेते महादेव जानकर, विद्यमान आमदार भाई गिरकर, नांदेड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष राम पाटील रातोळीकर आणि रमेश पाटील यांनाही भाजपाने संधी दिली आहे. शिवसेनेने अनिल परब यांना आधीच उमेदवारी दिली असून दुसरा उमेदवार म्हणून पक्ष प्रवक्त्या मनीषा कायंदे यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे.भाजपाकडून उमेदवारी मिळालेले नीलय नाईक यांनी दीड वर्षांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे ते नातू तर माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व पुसदचे विद्यमान आमदार व माजी मंत्री मनोहर नाईक यांचे ते पुतणे आहेत. बंजारा समाजाच्या व्होट बँकेवर नजर ठेवून भाजपाने नीलय यांना उमेदवारी दिल्याचे मानले जाते.नांदेड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष असलेले रातोळीकर हे निष्ठावंत भाजपाजन मानले जातात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्याला भाजपाने विधान परिषदेत प्रतिनिधित्व दिले आहे. भाजपाचे अन्य एक उमेदवार रमेश पाटील हे कोळी समाजाचे नेते आहेत. त्यांना ऐनवेळी भाजपात आणून उमेदवारी देण्यात आली आहे. ते बांधकाम व्यावसायिक आहेत.११ जागांसाठी १६ जुलैला ही निवडणूक होत आहे. काँग्रेसने विद्यमान सदस्य शरद रणपिसे आणि यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांना तर राष्ट्रवादीने बाबाजानी दुर्रानी यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान सदस्य शेकापचे जयंत पाटील हेही रिंगणात असतील.ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न असले तरी राजकीय खेळीचा भाग म्हणून भाजपाकडून उद्या पृथ्वीराज देशमुख यांचा सहावा अर्ज भरला जाऊ शकतो. तो दबावतंत्राचा एक भाग असेल. अन्य कुठल्याही पक्षाने जादाचा उमेदवार उभा केला तर भाजपाकडून सहावा उमेदवार कायम राखला जाईल. मात्र, अन्य कुणीही जादाचा उमेदवार दिला नाही तर भाजपाचाही सहावा उमेदवार माघारघेईल.

टॅग्स :BJPभाजपा