शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पाणीपुरवठ्यात १६ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 11:46 IST

तोतलाडोह धरणामधील ‘डेड स्टॉक’ पाणी हळूहळू कमी होत आहे. त्यावर नवेगाव खैरी येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १०० एमएलडीची घट झाली आहे.

ठळक मुद्देदररोज १०० एमएलडी पाणीपुरवठा कमीगोरेवाडा प्रकल्प पूर्णत: कोरडाजलकुंभांची पातळी घटलीटँकरद्वारे येताहेत अनेक अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोतलाडोह धरणामधील ‘डेड स्टॉक’ पाणी हळूहळू कमी होत आहे. त्यावर नवेगाव खैरी येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १०० एमएलडीची घट झाली आहे. जवळपास ही १६ ते १७ टक्के घट आहे. अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील जलकुं भांची पाणीपातळी घटल्याने नळाद्वारे होणाºया पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पुरेसा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. दुसरीकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. मागणीच्या तुलनेत ७० टक्के टँकरची मागणी पूर्ण करणे शक्य होत आहे. पुढील काही दिवसात पाऊ स न आल्यास शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च ते मे दरम्यान शहराला दररोज ७०० ते ७२५ एमएलडी पाणीपुरवठा होत होता. मात्र प्रकल्पातील मर्यादित जलसाठा, विस्कळीत वीजपुरवठा तसेच गोरेवाडा प्रकल्पात जलसाठा उपलब्ध नसल्याने जून महिन्याला सुुरुवात होताच शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दररोज ६०० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. पारा चढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागणी करूनही टँकर नाहीनळाला दाबाने पाणी येत नसल्याने नॉननेटवर्क भागाप्रमाणेच नेटवर्क असलेल्या भागातही टँकरची मागणी वाढली आहे. परंतु जलकुंभांच्या पाणीपातळीत घट झाल्याने सध्या टँकरची मागणी ७० टक्के पूर्ण करणे शक्य होत आहे. परंतु नवेगाव खैरी प्रकल्पातून उपलब्ध होणाºया कच्च्या पाणीपुरवठ्यात दिवसेंदिवस घट होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे मागणी करूनही टँकर उपलब्ध होणार नाही. यामुळे पर्यायी जलस्रोत उपलब्ध नसलेल्या नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागण्याची शक्यता आहे.

म्हणूनच झाला पाणीपुरवठा विस्कळीतनवेगाव खैरी केंद्रातून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास वेळप्रसंगी गोरेवाडा तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु गोरेवाडा तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे टंचाई काळात येथून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

नियोजनाअभावी बिघडली परिस्थितीनवेगाव खैरी प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठ्याचे फेब्रुवारी-मार्च महिन्यात नियोजन करणे अपेक्षित होते. उलट मार्च ते मे या कालावधीत शहराला सर्वाधिक ७०० ते ७२५ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात आला. वेळीच नियोजन करून ६०० एमएलडी पाणीपुरवठा केला असता तर १५ दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक राहिले असते. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई