शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

नागपुरातील पाणीपुरवठ्यात १६ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 11:46 IST

तोतलाडोह धरणामधील ‘डेड स्टॉक’ पाणी हळूहळू कमी होत आहे. त्यावर नवेगाव खैरी येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १०० एमएलडीची घट झाली आहे.

ठळक मुद्देदररोज १०० एमएलडी पाणीपुरवठा कमीगोरेवाडा प्रकल्प पूर्णत: कोरडाजलकुंभांची पातळी घटलीटँकरद्वारे येताहेत अनेक अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोतलाडोह धरणामधील ‘डेड स्टॉक’ पाणी हळूहळू कमी होत आहे. त्यावर नवेगाव खैरी येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १०० एमएलडीची घट झाली आहे. जवळपास ही १६ ते १७ टक्के घट आहे. अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील जलकुं भांची पाणीपातळी घटल्याने नळाद्वारे होणाºया पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पुरेसा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. दुसरीकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. मागणीच्या तुलनेत ७० टक्के टँकरची मागणी पूर्ण करणे शक्य होत आहे. पुढील काही दिवसात पाऊ स न आल्यास शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च ते मे दरम्यान शहराला दररोज ७०० ते ७२५ एमएलडी पाणीपुरवठा होत होता. मात्र प्रकल्पातील मर्यादित जलसाठा, विस्कळीत वीजपुरवठा तसेच गोरेवाडा प्रकल्पात जलसाठा उपलब्ध नसल्याने जून महिन्याला सुुरुवात होताच शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दररोज ६०० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. पारा चढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागणी करूनही टँकर नाहीनळाला दाबाने पाणी येत नसल्याने नॉननेटवर्क भागाप्रमाणेच नेटवर्क असलेल्या भागातही टँकरची मागणी वाढली आहे. परंतु जलकुंभांच्या पाणीपातळीत घट झाल्याने सध्या टँकरची मागणी ७० टक्के पूर्ण करणे शक्य होत आहे. परंतु नवेगाव खैरी प्रकल्पातून उपलब्ध होणाºया कच्च्या पाणीपुरवठ्यात दिवसेंदिवस घट होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे मागणी करूनही टँकर उपलब्ध होणार नाही. यामुळे पर्यायी जलस्रोत उपलब्ध नसलेल्या नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागण्याची शक्यता आहे.

म्हणूनच झाला पाणीपुरवठा विस्कळीतनवेगाव खैरी केंद्रातून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास वेळप्रसंगी गोरेवाडा तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु गोरेवाडा तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे टंचाई काळात येथून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

नियोजनाअभावी बिघडली परिस्थितीनवेगाव खैरी प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठ्याचे फेब्रुवारी-मार्च महिन्यात नियोजन करणे अपेक्षित होते. उलट मार्च ते मे या कालावधीत शहराला सर्वाधिक ७०० ते ७२५ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात आला. वेळीच नियोजन करून ६०० एमएलडी पाणीपुरवठा केला असता तर १५ दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक राहिले असते. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई