शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पाणीपुरवठ्यात १६ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 11:46 IST

तोतलाडोह धरणामधील ‘डेड स्टॉक’ पाणी हळूहळू कमी होत आहे. त्यावर नवेगाव खैरी येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १०० एमएलडीची घट झाली आहे.

ठळक मुद्देदररोज १०० एमएलडी पाणीपुरवठा कमीगोरेवाडा प्रकल्प पूर्णत: कोरडाजलकुंभांची पातळी घटलीटँकरद्वारे येताहेत अनेक अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोतलाडोह धरणामधील ‘डेड स्टॉक’ पाणी हळूहळू कमी होत आहे. त्यावर नवेगाव खैरी येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १०० एमएलडीची घट झाली आहे. जवळपास ही १६ ते १७ टक्के घट आहे. अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील जलकुं भांची पाणीपातळी घटल्याने नळाद्वारे होणाºया पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पुरेसा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. दुसरीकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. मागणीच्या तुलनेत ७० टक्के टँकरची मागणी पूर्ण करणे शक्य होत आहे. पुढील काही दिवसात पाऊ स न आल्यास शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च ते मे दरम्यान शहराला दररोज ७०० ते ७२५ एमएलडी पाणीपुरवठा होत होता. मात्र प्रकल्पातील मर्यादित जलसाठा, विस्कळीत वीजपुरवठा तसेच गोरेवाडा प्रकल्पात जलसाठा उपलब्ध नसल्याने जून महिन्याला सुुरुवात होताच शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दररोज ६०० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. पारा चढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागणी करूनही टँकर नाहीनळाला दाबाने पाणी येत नसल्याने नॉननेटवर्क भागाप्रमाणेच नेटवर्क असलेल्या भागातही टँकरची मागणी वाढली आहे. परंतु जलकुंभांच्या पाणीपातळीत घट झाल्याने सध्या टँकरची मागणी ७० टक्के पूर्ण करणे शक्य होत आहे. परंतु नवेगाव खैरी प्रकल्पातून उपलब्ध होणाºया कच्च्या पाणीपुरवठ्यात दिवसेंदिवस घट होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे मागणी करूनही टँकर उपलब्ध होणार नाही. यामुळे पर्यायी जलस्रोत उपलब्ध नसलेल्या नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागण्याची शक्यता आहे.

म्हणूनच झाला पाणीपुरवठा विस्कळीतनवेगाव खैरी केंद्रातून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास वेळप्रसंगी गोरेवाडा तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु गोरेवाडा तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे टंचाई काळात येथून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

नियोजनाअभावी बिघडली परिस्थितीनवेगाव खैरी प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठ्याचे फेब्रुवारी-मार्च महिन्यात नियोजन करणे अपेक्षित होते. उलट मार्च ते मे या कालावधीत शहराला सर्वाधिक ७०० ते ७२५ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात आला. वेळीच नियोजन करून ६०० एमएलडी पाणीपुरवठा केला असता तर १५ दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक राहिले असते. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई