शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

रुग्णांच्या जीवावर उठले नागपूरचे विमा रुग्णालय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:34 IST

कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात वर्षभरापासून औषधांचा तुटवडा आहे. वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात ४० टक्के औषध असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र, साध्या तापाचेही औषध मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. सध्याच्या स्थितीत दहा दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा असल्याने रुग्णांच्या जीवावर हे रुग्णालय उठल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देदहा दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा : सोयींचा अभाव, ५० टक्के जागा रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात वर्षभरापासून औषधांचा तुटवडा आहे. वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात ४० टक्के औषध असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र, साध्या तापाचेही औषध मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. सध्याच्या स्थितीत दहा दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा असल्याने रुग्णांच्या जीवावर हे रुग्णालय उठल्याचे बोलले जात आहे.कामगारांचे आरोग्य सांभाळले जावे यासाठी नागपुरात कामगार विमा रुग्णालय स्थापन करण्यात आले. या कामगारांकडून वर्षाला कोट्यावधी रुपये रुग्णालयाला मिळतात. याच पैशांतून रुग्णालयातील डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांचे पगारही होतात. परंतु त्याच रुग्णालयात कामगार रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. शासन या रुग्णालयाकडे लक्ष देत नसल्याने रुग्णांसोबतच रुग्णालय प्रशासनाला करावे काय, हा प्रश्न भेडसावत आहे. रुग्णालात गेल्या वर्षभरापासून औषधांचा तुटवडा आहे. केवळ आकस्मिक औषधे खरेदी करून कसेतरी भागविले जात होते. सध्याच्या स्थितीत रुग्णालयात दहा टक्केही औषधांचा साठा नसल्याचे या रुग्णालच्या अभ्यागत मंडळावर असलेले सदस्य व राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)चे सचिव मुकुंद मुळे यांनी लेखी लिहून दिले आहे. त्यांनी औषधांसोबतच ५० टक्के रिक्त पदांमुळे बंद होत असलेला एक-एक वॉर्ड, अद्ययावत यंत्रसामुग्री व सोयीच्या अभावाने रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात ‘रेफर’ करण्याचे वाढते प्रमाण, रुग्णालयाचे वेळापत्रक पाळत नसलेले डॉक्टरांमुळे प्रभावित झालेली रुग्णसेवा आदी समस्याही त्यांनी मांडल्या आहेत.

दोन वर्षापासून बालरुग्णांवर अन्याय            

मुळे यांनी सांगितले, कामगार विमा रुग्णालयात बालरोग विभाग नाही. यामुळे येथील रुग्णांना एका खासगी रुग्णालयात पाठविले जायचे. यासाठी करार करण्यात आला होता. मात्र दोन वर्षांपूर्वी हा करार संपुष्टात आल्याने बालरुग्ण अडचणीत आले आहेत. बालरुग्णांवर अन्याय होत आहे. दीड कोटींचे बिल एक वर्षापासून पडूननागपुरातील १२ सेवा दवाखान्यांसह (डिस्पेंसरी) अमरावती, अकोला, चंद्रपूर, हिंगणघाट येथील सेवा दवाखान्यातील कामगारांच्या औषधांचे दीड कोटी रुपयांचे बिल एक वर्षांपासून मुंबईचे मुख्य विमा योजनेचा कार्यालयात पडून आहे. परंतु कुणालाच याची काळजी नाही. याचा फटका रुग्णांना बसत असून त्यांना रुग्णालयाचा चकरा माराव्या लागत असल्याचे मुळे यांनी सांगितले. तारांकित प्रश्नानंतरही समस्या कायमच उपचारासाठी वेतनामधून पैसा कपात होऊनही उपचार मिळत नसल्याने रुग्णाचा संताप समोर येऊ लागला आहे. येथील डॉक्टर-रुग्णांच्या संबंधामध्ये कटुता आली आहे. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या रुग्णालयाच्या समस्यांच्या वृत्ताबाबत राज्य पावसाळी विधीमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याला घेऊन रुग्णालयाची पाहणी व समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद व संचालक डॉ. राजीव स्वामी यांनी रुग्णालयाला भेट दिली. परंतु त्यानंतरही समस्या सुटलेल्या नाहीत, हे विशेष.

टॅग्स :Employeeकर्मचारीhospitalहॉस्पिटल