शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

समाजकार्य विद्यापीठावर नागपूरचाच दावा

By admin | Updated: December 1, 2015 07:21 IST

समाजकार्य विषयाच्या संशोधन व अध्ययनात सुसूत्रता यावी तसेच गुणवत्ता वाढावी यासाठी स्वतंत्र समाजकार्य विद्यापीठ

योगेश पांडे ल्ल नागपूरसमाजकार्य विषयाच्या संशोधन व अध्ययनात सुसूत्रता यावी तसेच गुणवत्ता वाढावी यासाठी स्वतंत्र समाजकार्य विद्यापीठ स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. देशातील अशा प्रकारच्या पहिल्या विद्यापीठाची स्थापना राज्यात नेमकी कुठे होणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरचा दावा यात सर्वात वर आहे. परंतु आपापल्या जिल्ह्यांमध्ये हे विद्यापीठ यावे यासाठी राज्यातील विविध भागांतील राजकारण्यांकडूनदेखील जोर लावण्यात येत आहे. एकूणच या विद्यापीठावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.आजच्या तारखेत महाराष्ट्रात एकूण ५२ समाजकार्य महाविद्यालये आहेत. ही महाविद्यालये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत संचालित केली जातात. परंतु या महाविद्यालयांमध्ये शिक्षण व संशोधनासंदर्भात फारसे सुसूत्रीकरण व समन्वय नाही. त्यामुळे या महाविद्यालयांना एका विद्यापीठांतर्गत आणण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. ४ सप्टेंबर रोजी पुण्यात राज्यातील सर्व समाजकार्य महाविद्यालयांच्या प्राचार्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेतील चर्चेनुसार स्वतंत्र विद्यापीठाची मागणी सामाजिक न्यायमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यानंतर या विद्यापीठाच्या कायद्याचे प्रारूप तयार करण्यासाठी पूरण मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीच्या आॅक्टोबर महिन्यात नागपुरात बैठकादेखील झाल्या. अद्याप या विद्यापीठाच्या स्थापनेचे काम अगदी प्राथमिक टप्प्यात आहे. मंत्रिमंडळाची पूर्ण मंजुरी मिळून याला सुरू होण्यास अद्याप बरीच मोठी प्रक्रिया बाकी आहे. परंतु हे विद्यापीठ आपल्याच जिल्ह्यात यावे यासाठी विविध पालकमंत्र्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यापीठासाठी नागपूरचा सर्वात मोठा दावा आहे. राज्यातील ५२ पैकी २२ समाजकार्य महाविद्यालये नागपूर व अमरावती विभागात आहेत. त्यामुळे येथेच विद्यापीठ स्थापन व्हावे असे ज्येष्ठ अधिकारी तसेच समितीतील सदस्यांचे मत आहे.परंतु नागपूरला अनेक ‘प्रीमिअर’ शैक्षणिक संस्थांची घोषणा झाली आहे. राज्यातील अनेक शैक्षणिक संचालकांची कार्यालये मुंबई-पुण्याकडेच आहे. त्यामुळे हे विद्यापीठ पश्चिम महाराष्ट्रात यावे असा काही नेते तसेच पालकमंत्र्यांचा आग्रह आहे. संबंधित समितीने अद्याप हे विद्यापीठ कुठे निर्माण व्हावे याबाबत काहीही शिफारस केलेली नाही. या शिफारशीनंतर मंत्रिमंडळ याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.जास्त महाविद्यालयांच्या भागालाच प्राधान्य : बडोलेयासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संपर्क केला असता अद्याप हे समाजकार्य विद्यापीठ नेमके कुठे स्थापन करायचे याचा निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंबंधातील समितीच्या शिफारशींवर शासन विचार करेल. परंतु ज्या भागात जास्त समाजकार्य महाविद्यालये आहेत, तेथेच हे विद्यापीठ स्थापन झाले तर जास्त सोयीस्कर ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे त्यादृष्टीने शासन विचार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.