शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प. सर्कलची तिसऱ्यांदा पुनर्रचना व आरक्षण सोडत मंगळवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 21:04 IST

जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपून दोन वर्ष लोटले आहे. आरक्षण आणि त्याचबरोबर इतर मुद्यांवर जि.प.ची निवडणूक न्यायालयात अडकली आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दोनवेळा आरक्षण सोडत काढण्यात आली होती. आता पुन्हा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन तिसऱ्यांदा जि.प. सर्कलची पुनर्रचना व आरक्षणाची सोडत मंगळवारी सकाळी ११ वाजता बचत भवनात काढणार आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचे आदेश : बचत भवनात होणार सोडत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपून दोन वर्ष लोटले आहे. आरक्षण आणि त्याचबरोबर इतर मुद्यांवर जि.प.ची निवडणूक न्यायालयात अडकली आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दोनवेळा आरक्षण सोडत काढण्यात आली होती. आता पुन्हा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन तिसऱ्यांदा जि.प. सर्कलची पुनर्रचना व आरक्षणाची सोडत मंगळवारी सकाळी ११ वाजता बचत भवनात काढणार आहे.राज्य शासनाने नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी, वानाडोंगरी व बुटीबोरी हे जि.प. सर्कल नगर परिषद व नगर पंचायती नव्याने गठित केले. त्यावर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच जि. प. च्या आरक्षण सोडतीत राखीव जागांचे आरक्षण ५३ टक्क्यांवर गेल्यामुळे माजी जि. प. सदस्य बाबा आष्टनकर यांनी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने शासनाला ५३ टक्के आरक्षण का देण्यात आले, याची विचारणाही केली होती. न्यायालयाने राज्य शासनास ५० टक्के आरक्षणासंदर्भात तीन महिन्याच्या आत निर्णय घ्यावा तोपर्यंत निवडणुका घेऊ नये, असे निर्देश दिले होते. परंतु तीन महिन्यांच्या मुदतीनंतरही शासनाने त्यासंदर्भात कसलाही निर्णय घेतला नाही. दरम्यान दोनवेळा सर्कलची पुनर्रचना व आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने उच्च न्यायालयात याचिकेमुळे दोन्हीवेळा आयोगाने कार्यक्रम रद्द केला. निवडणूक आयोगानेसुद्धा शासनाला वारंवार पत्र, सूचना व बैठका घेऊन सूचित केले. परंतु शासनाने त्याचीही दखल घेतली नाही. न्यायालयाने दिलेल्या कालावधीची मुदत संपल्यामुळे निवडणूक आयोगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३(ई)नुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नागपूर जि.प. व त्याअंतर्गत येणाºया १३ पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेसाठी आयोगाने आदेश दिले आहे. नवीन प्रभाग रचनेत बुटीबोरी नगर परिषद क्षेत्र वगळून जिल्ह्याच्या उर्वरित ग्रामीण क्षेत्रासाठी २०११ च्या जनगणनेच्या आधारे ५८ सदस्यसंख्येची पंचायत समिती क्षेत्रनिहाय सर्कलची विभागणी करायची आहे. जिल्ह्यातील बुटीबोरी क्षेत्र वगळून जि. प.ची सर्कल रचना केली जाणार आहे. बुटीबोरी वगळली असली तरी सदस्यसंख्या ५८ राहणार आहे.सीईओ पदभार केदारांकडेलोकसभा निवडणुका सात टप्प्यांमध्ये होत आहे. यासाठी केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व अधिकाऱ्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून ड्युटी लावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ संजय यादव यांचीही ड्युटी झारखंडचे निवडणूक निरीक्षक म्हणून लावण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा पदभार परत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यादव हे आजपासून संबंधित राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण होईतोवर निरीक्षकपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. तोवर केदार यांच्याकडे सीईओपदाचा पदभार राहणार आहे.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरElectionनिवडणूक