शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

नागपूर जि.प. च्या ७३२ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवास भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:31 IST

गावात शाळा नाही म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, म्हणून शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला. यावर्षी प्रवास भत्ता सहा हजार रुपये करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ७३२ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्देप्रती विद्यार्थी सहा हजाराची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गावात शाळा नाही म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, म्हणून शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला. यावर्षी प्रवास भत्ता सहा हजार रुपये करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ७३२ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.विद्यार्थ्याच्या गावातून शाळा १ किलोमीटरच्या वर असेल अशा विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्यात येतो. गेल्या वर्षी ग्रामीण भागातील ५५ विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी वार्षिक तीन हजार रुपयेप्रमाणे प्रवास भत्ता दिला होता. मुळात भत्ता देण्याचे दुसरेही एक कारण म्हणजे जि.प.च्या शाळांची पटसंख्या कमी होत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १५३१ शाळा आहे. या शाळांची पटसंख्या ही दरवर्षी घसरतच चालली आहे. चार वर्षांत पटसंख्या १६ हजाराने घटली आहे. यंदा जि.प.शाळांतील विद्यार्थी पटसंख्या ही ७१ हजार ४४८ इतकी आहे. गतवर्षी शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्याच्या १३ तालुक्यातील १ कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर शाळेत जाणाऱ्या ५५ विद्यार्थ्यांना प्रवासभत्त्यापोटी ३०० रुपये महिन्याप्रमाणे दहा महिन्याकरिता ३ हजार रुपये देण्यात आले होते. यंदा शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन करून त्या बंद करण्याचा मानस बाळगला आहे. गेल्या वर्षी राज्यात १३०० शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कमी पटसंख्येच्या शाळांचे नजीकच्या शाळेमध्ये समायोजन करुन विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही समायोजन करण्याचा शासनाचा मानस आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल असा विश्वास शासनाला आहे. सोबतच शिक्षकाच्या वेतनावर होणारा खर्च, पूर्वी सर्व शिक्षा अभियाना आता 'समग्र'अंतर्गत शाळेवर होणार खर्च लक्षात घेता, शासनावर कोट्यवधीचा बोझा पडतो आहे. तो कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरzpजिल्हा परिषदStudentविद्यार्थी