शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नागपूर जि.प. च्या ७३२ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवास भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:31 IST

गावात शाळा नाही म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, म्हणून शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला. यावर्षी प्रवास भत्ता सहा हजार रुपये करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ७३२ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्देप्रती विद्यार्थी सहा हजाराची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गावात शाळा नाही म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, म्हणून शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला. यावर्षी प्रवास भत्ता सहा हजार रुपये करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ७३२ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.विद्यार्थ्याच्या गावातून शाळा १ किलोमीटरच्या वर असेल अशा विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्यात येतो. गेल्या वर्षी ग्रामीण भागातील ५५ विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी वार्षिक तीन हजार रुपयेप्रमाणे प्रवास भत्ता दिला होता. मुळात भत्ता देण्याचे दुसरेही एक कारण म्हणजे जि.प.च्या शाळांची पटसंख्या कमी होत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १५३१ शाळा आहे. या शाळांची पटसंख्या ही दरवर्षी घसरतच चालली आहे. चार वर्षांत पटसंख्या १६ हजाराने घटली आहे. यंदा जि.प.शाळांतील विद्यार्थी पटसंख्या ही ७१ हजार ४४८ इतकी आहे. गतवर्षी शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्याच्या १३ तालुक्यातील १ कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर शाळेत जाणाऱ्या ५५ विद्यार्थ्यांना प्रवासभत्त्यापोटी ३०० रुपये महिन्याप्रमाणे दहा महिन्याकरिता ३ हजार रुपये देण्यात आले होते. यंदा शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन करून त्या बंद करण्याचा मानस बाळगला आहे. गेल्या वर्षी राज्यात १३०० शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कमी पटसंख्येच्या शाळांचे नजीकच्या शाळेमध्ये समायोजन करुन विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही समायोजन करण्याचा शासनाचा मानस आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल असा विश्वास शासनाला आहे. सोबतच शिक्षकाच्या वेतनावर होणारा खर्च, पूर्वी सर्व शिक्षा अभियाना आता 'समग्र'अंतर्गत शाळेवर होणार खर्च लक्षात घेता, शासनावर कोट्यवधीचा बोझा पडतो आहे. तो कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरzpजिल्हा परिषदStudentविद्यार्थी