शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष ‘क्वारंटाईन,’ सभा लांबणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 20:20 IST

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर दर तीन महिन्यात होणारी सर्वसाधारण सभा सहा महिने लोटल्यानंतरही होऊ शकली नाही. सभेवर यापूर्वी कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’चा परिणाम झाला. लॉकडाऊन संपल्यानंतर अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सभेची तारीख आणि सभागृहही निश्चित केल्यानंतर अध्यक्षांनाच क्वारंटाईन होण्याची वेळ आली. त्यामुळे २४ जुलैला होणारी सर्वसाधारण सभा पुढे ढकलावी लागणार आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर दर तीन महिन्यात होणारी सर्वसाधारण सभा सहा महिने लोटल्यानंतरही होऊ शकली नाही. सभेवर यापूर्वी कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’चा परिणाम झाला. लॉकडाऊन संपल्यानंतर अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सभेची तारीख आणि सभागृहही निश्चित केल्यानंतर अध्यक्षांनाच क्वारंटाईन होण्याची वेळ आली. त्यामुळे २४ जुलैला होणारी सर्वसाधारण सभा पुढे ढकलावी लागणार आहे.जिल्हा परिषद अध्यक्षांचे पतीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे अध्यक्षांना होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे. सदस्यांमध्येही कोरोनाच्या भीतीचे सावट आहे. समितीच्या मासिक बैठकीला सदस्य उपस्थित राहत नसल्याने बैठका तहकूब होत आहे. सर्वसाधारण सभेला सर्व सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते. सर्व अधिकारीसुद्धा उपस्थित असतात. जवळपास १०० ते १२५ लोक एकाच ठिकाणी एकत्र येतात. कोरोनाच्या काळात ही सभा होणे धोक्याचे आहे. सर्वसाधारण सभेअभावी ग्रामीण भागातील विकासकामांच्या अनेक मंजुऱ्या प्रलंबित आहेत. त्यातच अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सर्वसाधारण सभेची परवानगी आवश्यक आहे. विकासकामांना खीळ बसली आहे. हे लक्षात घेता अध्यक्षांनी सभा होण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळविली आणि सभागृह सुद्धा निश्चित केले. २४ जुलै तारीखही निश्चित झाली आहे. सभेची नोटीसही निघाली. परंतू आता निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सभा पुढे ढकलावी लागणार आहे. सीईओ योगेश कुंभेजकर यांनी सुद्धा यासाठी दुजोरा दिला आहे.सध्या मी शासन नियमानुसार गृह विलगीकरणात आहे. सदस्यांमध्ये सुद्धा कोरोनाची भीती आहे. त्यामुळे २४ जुलै रोजी होणारी सभा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शासनाकडे विनंती करणार आहे. यासंदर्भात सीईओंशीही चर्चा करण्यात आली आहे.रश्मी बर्वे, अध्यक्ष, जिल्हा परिषदसभेवरून मतभेद२४ जुलै रोजी सभा झालीच पाहिजे, अशी भूमिका शिक्षण व अर्थ सभापती भारती पाटील यांनी व्यक्त केली. अनेक विषय प्रलंबित आहेत. सभेच्या मान्यतेशिवाय काम होणार नाही. कोरोनाची भीती ठेवत ग्रामीण भागातील विकास कामांना खीळ बसता कामा नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सभा २४ जुलै रोजी होईल, असे मत कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी व्यक्त केले.विरोधक म्हणतात सभा झाली पाहिजेसदस्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते मार्गी लावयचे आहेत. पाच महिन्यापासून सभा झाली नाही. निश्चित तारखेत सभा घेण्यासाठी आमचा आग्रह आहे. अध्यक्ष नसल्यास उपाध्यक्षांकडे जबाबदारी द्यावी.अनिल निधान, विरोधी पक्षनेते

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या