शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष ‘क्वारंटाईन,’ सभा लांबणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 20:20 IST

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर दर तीन महिन्यात होणारी सर्वसाधारण सभा सहा महिने लोटल्यानंतरही होऊ शकली नाही. सभेवर यापूर्वी कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’चा परिणाम झाला. लॉकडाऊन संपल्यानंतर अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सभेची तारीख आणि सभागृहही निश्चित केल्यानंतर अध्यक्षांनाच क्वारंटाईन होण्याची वेळ आली. त्यामुळे २४ जुलैला होणारी सर्वसाधारण सभा पुढे ढकलावी लागणार आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर दर तीन महिन्यात होणारी सर्वसाधारण सभा सहा महिने लोटल्यानंतरही होऊ शकली नाही. सभेवर यापूर्वी कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’चा परिणाम झाला. लॉकडाऊन संपल्यानंतर अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सभेची तारीख आणि सभागृहही निश्चित केल्यानंतर अध्यक्षांनाच क्वारंटाईन होण्याची वेळ आली. त्यामुळे २४ जुलैला होणारी सर्वसाधारण सभा पुढे ढकलावी लागणार आहे.जिल्हा परिषद अध्यक्षांचे पतीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे अध्यक्षांना होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे. सदस्यांमध्येही कोरोनाच्या भीतीचे सावट आहे. समितीच्या मासिक बैठकीला सदस्य उपस्थित राहत नसल्याने बैठका तहकूब होत आहे. सर्वसाधारण सभेला सर्व सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते. सर्व अधिकारीसुद्धा उपस्थित असतात. जवळपास १०० ते १२५ लोक एकाच ठिकाणी एकत्र येतात. कोरोनाच्या काळात ही सभा होणे धोक्याचे आहे. सर्वसाधारण सभेअभावी ग्रामीण भागातील विकासकामांच्या अनेक मंजुऱ्या प्रलंबित आहेत. त्यातच अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सर्वसाधारण सभेची परवानगी आवश्यक आहे. विकासकामांना खीळ बसली आहे. हे लक्षात घेता अध्यक्षांनी सभा होण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळविली आणि सभागृह सुद्धा निश्चित केले. २४ जुलै तारीखही निश्चित झाली आहे. सभेची नोटीसही निघाली. परंतू आता निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सभा पुढे ढकलावी लागणार आहे. सीईओ योगेश कुंभेजकर यांनी सुद्धा यासाठी दुजोरा दिला आहे.सध्या मी शासन नियमानुसार गृह विलगीकरणात आहे. सदस्यांमध्ये सुद्धा कोरोनाची भीती आहे. त्यामुळे २४ जुलै रोजी होणारी सभा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शासनाकडे विनंती करणार आहे. यासंदर्भात सीईओंशीही चर्चा करण्यात आली आहे.रश्मी बर्वे, अध्यक्ष, जिल्हा परिषदसभेवरून मतभेद२४ जुलै रोजी सभा झालीच पाहिजे, अशी भूमिका शिक्षण व अर्थ सभापती भारती पाटील यांनी व्यक्त केली. अनेक विषय प्रलंबित आहेत. सभेच्या मान्यतेशिवाय काम होणार नाही. कोरोनाची भीती ठेवत ग्रामीण भागातील विकास कामांना खीळ बसता कामा नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सभा २४ जुलै रोजी होईल, असे मत कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी व्यक्त केले.विरोधक म्हणतात सभा झाली पाहिजेसदस्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते मार्गी लावयचे आहेत. पाच महिन्यापासून सभा झाली नाही. निश्चित तारखेत सभा घेण्यासाठी आमचा आग्रह आहे. अध्यक्ष नसल्यास उपाध्यक्षांकडे जबाबदारी द्यावी.अनिल निधान, विरोधी पक्षनेते

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या