शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

नागपूर जिल्हा परिषदेलाही निवडणुकीची प्रतीक्षा : दोन वर्षे फुकटची मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:59 IST

जिल्हा परिषदेच्या इतिहासात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना कदाचित पहिल्यांदाच सात वर्षाचा कार्यकाळ उपभोगायला मिळाला आहे. फुकट मिळालेल्या दोन वर्षाचा आता लोकप्रतिनिधींनाच वीट यायला लागला आहे. सदस्यांचे जि.प.कडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. विरोधकही थंडावले आहेत. काही पदाधिकारी खानापूर्ती म्हणून महिन्याभरात एक दोन दिवस दिसतात. दोन वर्षाचा अतिरिक्त कार्यकाळ मिळाला असतानाही ग्रामीण जनतेच्या काहीच ठोस पदरी पडले नाही. मुळात जनतेच्या पदरी पाडून देण्याचा उत्साहच जि.प.च्या लोकप्रतिनिधीमध्ये राहिला नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची चिन्हे असताना जिल्हा परिषदेलालाही निवडणुकीची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देसदस्य, विरोधक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह राहिला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या इतिहासात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना कदाचित पहिल्यांदाच सात वर्षाचा कार्यकाळ उपभोगायला मिळाला आहे. फुकट मिळालेल्या दोन वर्षाचा आता लोकप्रतिनिधींनाच वीट यायला लागला आहे. सदस्यांचे जि.प.कडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. विरोधकही थंडावले आहेत. काही पदाधिकारी खानापूर्ती म्हणून महिन्याभरात एक दोन दिवस दिसतात. दोन वर्षाचा अतिरिक्त कार्यकाळ मिळाला असतानाही ग्रामीण जनतेच्या काहीच ठोस पदरी पडले नाही. मुळात जनतेच्या पदरी पाडून देण्याचा उत्साहच जि.प.च्या लोकप्रतिनिधीमध्ये राहिला नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची चिन्हे असताना जिल्हा परिषदेलालाही निवडणुकीची प्रतीक्षा आहे.नागपूर जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ मार्च २०१७ मध्येच संपुष्टात आला. परंतु न्यायालयीन प्रक्रियेत जि.प.ची निवडणूक अडकल्यामुळे अजूनपर्यंत सरकारला निवडणुकीचा निर्णय घेता येऊ शकला नाही. राज्य सरकारने जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत ‘जैसे थे’चे परिपत्रक जारी केले. त्यावर दोन वर्षातही शासन निर्णय घेऊ शकले नाही. परिणामी मुदतवाढ कायम आहे. विद्यमान अध्यक्ष व पदाधिकारी साडेचार वर्षांपासून पदासोबतच शासकीय सुविधांचा लाभ घेत आहेत. नियमानुसार जि.प. अध्यक्षांचा कार्यकाळ अडीच-अडीच वर्षांचा असतो. परंतु, निवडणूक न झाल्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांना साडेचार वर्ष झाले आहेत. निवडणुकीच्या कोणत्याही हालचाली नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांना कंटाळलेले विरोधकही निराश झाले आहेत. बराच काळ पदाचा उपभोग घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीला अधिकारी व कर्मचारीही कंटाळले आहेत. सत्ताधारी व विरोधकांचा भविष्यात होणाऱ्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीवर भर असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासात कुणालाही रस नसल्याचे दिसून येत आहे. विषय समिती, स्थायी समितीच्या सभेला सदस्यांची उपस्थिती नगण्य असते. विरोधक थंडावल्यामुळे सत्ताधाऱ्यांचेही चांगलेच फावते आहे.लोकसभेसोबतच घेतल्या पाहिजेत निवडणुकादोन वर्षाचा अतिरिक्त कार्यकाळ मिळाला असला तरी लोकप्रतिनिधींची मानसिकता राहिली नाही. मिनी मंत्रालयाचा दर्जा असलेल्या जिल्हा परिषदेत सदस्यांचे येणेजाणे कमी झाले आहे. काम करण्याची, लोकांचे प्रश्न सोडविण्याची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे सरकारने निर्णय घेऊन लोकसभेसोबतच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आटोपल्या पाहिजेत.शरद डोणेकर, उपाध्यक्ष, जि.प. नागपूरनिवडणुका जर वेळेत झाल्यास सत्ताधारी असो की विरोधकांमध्ये काम करण्याचा एक उत्साह असतो. फुकटचे मिळत असेल तर त्याचे महत्त्व नसते. हेच जिल्हा परिषदेच्या एकंदरीत कारभारावरून दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुका झाल्याच पाहिजेत.मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते, जि. प.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरElectionनिवडणूक