शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; मुंबई मेट्रोची स्थगिती उठविण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:39 IST

मुंबईतील मेट्रो रेल्वेला लावलेली स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मुंबईतील मेट्रो रेल्वेला लावलेली स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली. या कामाला भाजप सरकारच्या काळात गती देण्यात आली होती. ६५ लाख नवीन प्रवासी वाहक क्षमता या माध्यमातून निर्माण होणार होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केवळ अहंकारापोटी या कामाला स्थगिती दिली. गेल्या 24 दिवसापासून काम थांबले आहे. एका दिवसाचे नुकसान हे जवळपास साडेचार कोटीच्या घरात आहे. आजपर्यंत १०० कोटींचा भुर्दंड बसला आहे. हा भुर्दंड कॉस्ट एक्सलेशनच्या नावावर मुंबईकरांच्या माथी मारल्या जाईल. एकीकडे शिवसेना आरेला जंगल घोषित करण्याची भाषा करतात. तर दुसरीकडे निवासी क्षेत्र करण्याची भाषा करतात. नेमक तिथे निवास की जंगल, हे शिवसेनेने ठरवावे. मुंबई कारशेडची जागा सरकारच्या हक्काची आहे. मात्र हा प्रकल्प तिथे न करता तो कांजूरमार्गला हलविण्याच्या हालचाली सरकारची आहे. याच्या मोबदल्यात येथील जागचा साडेतीन हजार कोटींचा मोबदला हा खाजगी व्यक्तींच्या घशात घालण्याचा घाट करीत आहे. जेव्ही मुंबईत दर वर्षाला 25 हजार झाडे तोडण्याची मंजुरी देता आणि आता कारशेडच्या जागेवर 2446 झाडेंचा पुळका दाखवून ढोंगीपणा करता असा आरोप आशीष शेलार यांनी केला. तत्पूर्वी विधानसभेच्या पायऱ्यांवर स्थगितीच्या विरोधात भाजप आमदारांनी हातात बॅनर घेऊन निदर्शने केली.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAshish Shelarआशीष शेलार