शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; शेतकऱ्यांना मदत कधी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:34 IST

या सरकारकडून शेतकऱ्यांना काहीतरी मिळेल अशी अपेक्षा करणे चूक असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विधीमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस होता. राज्यपालांच्या अभिभाषणावर सरकारकडून उत्तर आले. राज्यातील शेतकरी मागील चार दिवसांपासून अधिवेशनातून काहीतरी मिळेल या अपेक्षेने आस लावून बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची ग्वाही महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र शेतकऱ्याच्या तोंडाला नुसती पाने पुसली जात आहे. सरकारकडून केवळ राजकीय भाषण देणे सुरु आहे. याकरता सरकारचा धिक्कार करत आम्ही सभात्याग केला आहे. त्यामुळे या सरकारकडून शेतकऱ्यांना काहीतरी मिळेल अशी अपेक्षा करणे चूक असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे केला. विदर्भात अधिवेशन सुरू असताना विदर्भाच्या मुद्यावर चर्चा केली जाऊ देत नाही. विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातोय. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न कसा सोडवला जाईल, प्रलंबित प्रकल्पांना गती कशी दिली जाईल यावर कुणी बोलत नाही. मराठा वॉटर ग्रीडचा प्रश्न असो राज्यातील ढासळत चाललेली कायदा व सुव्यवस्था यावर सरकारकडून उत्तर दिले जात नाही. त्यामुळे या अधिवेशनातून राज्यातील जनतेला विशेषत: विदर्भातील जनतेला काही मिळेल असे वाटत नाही.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनPraveen Darekarप्रवीण दरेकर