शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

हुडहुडीने नागपूरकरांचे ‘हु..हु..हू..हू...’, हिमाचलचा फील घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 13:03 IST

सध्या घरोघरी थंडीचीच चर्चा आहे. सकाळ झाली तरी पांघरूणातून निघण्याची इच्छा हाेत नाही आणि निघाले तरी सूर्याचा आसरा घ्यावा लागताे. सकाळची सूर्यकिरणे अंगावर घेण्याचा आनंद आता हवाहवासा झाला आहे.

ठळक मुद्देशेकोट्या पेटवून अन् डबल दुलई घेऊनही थंडी मानेना

नागपूर : ‘का म्हणते गा भाऊ थंडी?’ ‘का सांगू गा भाऊ, हाडं गाेठून रायले न.’ एकमेकांना भेटणाऱ्या नागपूरकरांचा संवाद सुरू हाेण्यापूर्वी या प्रश्नाेत्तरांची देवाण-घेवाण हाेत आहे. कारण मागील चार दिवसांपासून गाेठवणाऱ्या थंडीमुळे ‘यावर्षी हवी तशी थंडी वाटली नाही’ म्हणणाऱ्या नागपूरकरांची ‘दातखिळी’ बसली आहे.

तशी नागपूरकरांची ‘मिजास’ काही कमी नाही. पुणेकरांच्या ताेडीस ताेड, ‘थंडीत अन् उन्हाळ्यात येजाे’, असे उत्तर हमखास ठेवलेले. यावर्षी थंडीने जरा निराशच केले. जेमतेम काही दिवस वगळता हिवाळा संपायला आला तरी थंडीचा प्रकाेप जाणवला नाही. त्याऐवजी पावसानेच जाेर धरला हाेता. मात्र, २३ जानेवारीपासून वातावरणाने कूस बदलली. हवामान खात्यानेही थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तविला हाेता. २४ ला गारवा वाढला आणि २५ जानेवारीला पारा सर्रकन खाली घसरला आणि नागपूरकरांना गारठा झाेंबला. २६, २७ आणि २८ जानेवारीला ८.४ अंशावर जाऊन कडाक्याने तर कहरच केला. शनिवारी तर पारा पुन्हा घसरून ७.६ अंशावर पडला आणि शरीरात बर्फ पडल्यागत झाले.

थंडी सुरू झाली की, रात्री शेकाेटी पेटणार नाही तर नवलच. स्वच्छतेची आवड म्हणून नाही तर हुडहुडी घालविण्यासाठी आसपासचा कचरा गाेळा करून जागाेजागी रात्री शेकाेटी पेटती दिसायची. यावर्षी तेही कमीच दिसले. मात्र, तडाखा वाढताच शेकाेट्याही पेटायला लागल्या आहेत. आतापर्यंत लाेक स्वेटर, जॅकेट असे उबदार कपड्यांकडे दुर्लक्ष करून हाेते, पण तीन दिवसांपासून उबदार कपडे दिवसाही जवळ करू लागले. तरीही हात बांधून ‘हु..हु..हू..हू...’ करणाऱ्यांकडे पाहून थंडी वाढल्याची जाणीव हाेते. सायंकाळचे ५ वाजले की, ‘कधी एकदा घरी जाऊन ब्लॅन्केट अंगावर घेताे’, असे झाले आहे. घरीही अंगावर गाेधडी घेऊन राहण्याशिवाय पर्याय नाही. असेच ब्लॅंकेटमध्ये शिरून राहावे, अशी प्रत्येकाची भावना झाली आहे.

पांघरुणातून निघण्याची इच्छाच होत नाही

सध्या घरोघरी थंडीचीच चर्चा आहे. सकाळ झाली तरी पांघरूणातून निघण्याची इच्छा हाेत नाही आणि निघाले तरी सूर्याचा आसरा घ्यावा लागताे. सकाळची सूर्यकिरणे अंगावर घेण्याचा आनंद आता हवाहवासा झाला आहे. नव्हे, दिवसभर उन्हातच राहावे, असे नागपूरकरांना वाटत आहे. गारठवणाऱ्या या थंडीने नागपूरकरांना सुखावले आहे. मात्रल थंडी वाढताच सर्दी, खाेकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून काेराेनाच्या नव्या ओमायक्रान रूपाने धडकीही भरवली आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण