शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हुडहुडीने नागपूरकरांचे ‘हु..हु..हू..हू...’, हिमाचलचा फील घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 13:03 IST

सध्या घरोघरी थंडीचीच चर्चा आहे. सकाळ झाली तरी पांघरूणातून निघण्याची इच्छा हाेत नाही आणि निघाले तरी सूर्याचा आसरा घ्यावा लागताे. सकाळची सूर्यकिरणे अंगावर घेण्याचा आनंद आता हवाहवासा झाला आहे.

ठळक मुद्देशेकोट्या पेटवून अन् डबल दुलई घेऊनही थंडी मानेना

नागपूर : ‘का म्हणते गा भाऊ थंडी?’ ‘का सांगू गा भाऊ, हाडं गाेठून रायले न.’ एकमेकांना भेटणाऱ्या नागपूरकरांचा संवाद सुरू हाेण्यापूर्वी या प्रश्नाेत्तरांची देवाण-घेवाण हाेत आहे. कारण मागील चार दिवसांपासून गाेठवणाऱ्या थंडीमुळे ‘यावर्षी हवी तशी थंडी वाटली नाही’ म्हणणाऱ्या नागपूरकरांची ‘दातखिळी’ बसली आहे.

तशी नागपूरकरांची ‘मिजास’ काही कमी नाही. पुणेकरांच्या ताेडीस ताेड, ‘थंडीत अन् उन्हाळ्यात येजाे’, असे उत्तर हमखास ठेवलेले. यावर्षी थंडीने जरा निराशच केले. जेमतेम काही दिवस वगळता हिवाळा संपायला आला तरी थंडीचा प्रकाेप जाणवला नाही. त्याऐवजी पावसानेच जाेर धरला हाेता. मात्र, २३ जानेवारीपासून वातावरणाने कूस बदलली. हवामान खात्यानेही थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तविला हाेता. २४ ला गारवा वाढला आणि २५ जानेवारीला पारा सर्रकन खाली घसरला आणि नागपूरकरांना गारठा झाेंबला. २६, २७ आणि २८ जानेवारीला ८.४ अंशावर जाऊन कडाक्याने तर कहरच केला. शनिवारी तर पारा पुन्हा घसरून ७.६ अंशावर पडला आणि शरीरात बर्फ पडल्यागत झाले.

थंडी सुरू झाली की, रात्री शेकाेटी पेटणार नाही तर नवलच. स्वच्छतेची आवड म्हणून नाही तर हुडहुडी घालविण्यासाठी आसपासचा कचरा गाेळा करून जागाेजागी रात्री शेकाेटी पेटती दिसायची. यावर्षी तेही कमीच दिसले. मात्र, तडाखा वाढताच शेकाेट्याही पेटायला लागल्या आहेत. आतापर्यंत लाेक स्वेटर, जॅकेट असे उबदार कपड्यांकडे दुर्लक्ष करून हाेते, पण तीन दिवसांपासून उबदार कपडे दिवसाही जवळ करू लागले. तरीही हात बांधून ‘हु..हु..हू..हू...’ करणाऱ्यांकडे पाहून थंडी वाढल्याची जाणीव हाेते. सायंकाळचे ५ वाजले की, ‘कधी एकदा घरी जाऊन ब्लॅन्केट अंगावर घेताे’, असे झाले आहे. घरीही अंगावर गाेधडी घेऊन राहण्याशिवाय पर्याय नाही. असेच ब्लॅंकेटमध्ये शिरून राहावे, अशी प्रत्येकाची भावना झाली आहे.

पांघरुणातून निघण्याची इच्छाच होत नाही

सध्या घरोघरी थंडीचीच चर्चा आहे. सकाळ झाली तरी पांघरूणातून निघण्याची इच्छा हाेत नाही आणि निघाले तरी सूर्याचा आसरा घ्यावा लागताे. सकाळची सूर्यकिरणे अंगावर घेण्याचा आनंद आता हवाहवासा झाला आहे. नव्हे, दिवसभर उन्हातच राहावे, असे नागपूरकरांना वाटत आहे. गारठवणाऱ्या या थंडीने नागपूरकरांना सुखावले आहे. मात्रल थंडी वाढताच सर्दी, खाेकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून काेराेनाच्या नव्या ओमायक्रान रूपाने धडकीही भरवली आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण