शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

हुडहुडीने नागपूरकरांचे ‘हु..हु..हू..हू...’, हिमाचलचा फील घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 13:03 IST

सध्या घरोघरी थंडीचीच चर्चा आहे. सकाळ झाली तरी पांघरूणातून निघण्याची इच्छा हाेत नाही आणि निघाले तरी सूर्याचा आसरा घ्यावा लागताे. सकाळची सूर्यकिरणे अंगावर घेण्याचा आनंद आता हवाहवासा झाला आहे.

ठळक मुद्देशेकोट्या पेटवून अन् डबल दुलई घेऊनही थंडी मानेना

नागपूर : ‘का म्हणते गा भाऊ थंडी?’ ‘का सांगू गा भाऊ, हाडं गाेठून रायले न.’ एकमेकांना भेटणाऱ्या नागपूरकरांचा संवाद सुरू हाेण्यापूर्वी या प्रश्नाेत्तरांची देवाण-घेवाण हाेत आहे. कारण मागील चार दिवसांपासून गाेठवणाऱ्या थंडीमुळे ‘यावर्षी हवी तशी थंडी वाटली नाही’ म्हणणाऱ्या नागपूरकरांची ‘दातखिळी’ बसली आहे.

तशी नागपूरकरांची ‘मिजास’ काही कमी नाही. पुणेकरांच्या ताेडीस ताेड, ‘थंडीत अन् उन्हाळ्यात येजाे’, असे उत्तर हमखास ठेवलेले. यावर्षी थंडीने जरा निराशच केले. जेमतेम काही दिवस वगळता हिवाळा संपायला आला तरी थंडीचा प्रकाेप जाणवला नाही. त्याऐवजी पावसानेच जाेर धरला हाेता. मात्र, २३ जानेवारीपासून वातावरणाने कूस बदलली. हवामान खात्यानेही थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तविला हाेता. २४ ला गारवा वाढला आणि २५ जानेवारीला पारा सर्रकन खाली घसरला आणि नागपूरकरांना गारठा झाेंबला. २६, २७ आणि २८ जानेवारीला ८.४ अंशावर जाऊन कडाक्याने तर कहरच केला. शनिवारी तर पारा पुन्हा घसरून ७.६ अंशावर पडला आणि शरीरात बर्फ पडल्यागत झाले.

थंडी सुरू झाली की, रात्री शेकाेटी पेटणार नाही तर नवलच. स्वच्छतेची आवड म्हणून नाही तर हुडहुडी घालविण्यासाठी आसपासचा कचरा गाेळा करून जागाेजागी रात्री शेकाेटी पेटती दिसायची. यावर्षी तेही कमीच दिसले. मात्र, तडाखा वाढताच शेकाेट्याही पेटायला लागल्या आहेत. आतापर्यंत लाेक स्वेटर, जॅकेट असे उबदार कपड्यांकडे दुर्लक्ष करून हाेते, पण तीन दिवसांपासून उबदार कपडे दिवसाही जवळ करू लागले. तरीही हात बांधून ‘हु..हु..हू..हू...’ करणाऱ्यांकडे पाहून थंडी वाढल्याची जाणीव हाेते. सायंकाळचे ५ वाजले की, ‘कधी एकदा घरी जाऊन ब्लॅन्केट अंगावर घेताे’, असे झाले आहे. घरीही अंगावर गाेधडी घेऊन राहण्याशिवाय पर्याय नाही. असेच ब्लॅंकेटमध्ये शिरून राहावे, अशी प्रत्येकाची भावना झाली आहे.

पांघरुणातून निघण्याची इच्छाच होत नाही

सध्या घरोघरी थंडीचीच चर्चा आहे. सकाळ झाली तरी पांघरूणातून निघण्याची इच्छा हाेत नाही आणि निघाले तरी सूर्याचा आसरा घ्यावा लागताे. सकाळची सूर्यकिरणे अंगावर घेण्याचा आनंद आता हवाहवासा झाला आहे. नव्हे, दिवसभर उन्हातच राहावे, असे नागपूरकरांना वाटत आहे. गारठवणाऱ्या या थंडीने नागपूरकरांना सुखावले आहे. मात्रल थंडी वाढताच सर्दी, खाेकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून काेराेनाच्या नव्या ओमायक्रान रूपाने धडकीही भरवली आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण