शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालटकरच्या डोक्यात शिरला होता सैतान, दोन मुलींच्या आयुष्याला लावले ग्रहण

By योगेश पांडे | Updated: March 27, 2024 15:20 IST

जावई, बहिणी, भाचीसह स्वतःच्या मुलाचा केला होता कोल्ड ब्लडेड मर्डर : फाशी तर मिळाली, ती काळरात्री कशी विसरणार ?

नागपूर : उपराजधानीच्या गुन्हेगारी जगताला हादरवून सोडणाऱ्या क्रूरकर्मा विवेक पालटकर याच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. १० जून २०१८ साली पालटकरच्या डोक्यात अक्षरश: सैतान शिरला होता व त्याने स्वत:ची सख्खी बहीण, जावई, भाची, बहिणीची सासू व स्वत:च्या मुलाचा अगदी ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’च केला होता. पालटकर याला फाशी झाली असली तरी त्याच्या कृत्याची शिक्षा दोन लहान मुलींना आयुष्यभर भोगावी लागणार आहे. त्याची मुलगी व भाची त्या काळरात्री क्रूरकर्म्याच्या तावडीतून सुटल्या होत्या. मात्र त्यांच्या आयुष्यात नेहमीसाठीच ग्रहण लागले आहे.

मौदा तालुक्यातील नवरगावमधील गुलाब पालटकर यांना दोन पत्नी होत्या. त्यातील संध्या नामक पत्नीला विवेक आणि अर्चना ही दोन मुलं होती. गुलाब पालटकर यांच्याकडे १० एकर शेती होती. त्यातील सव्वादोन एकर शेती त्यांनी दुसऱ्या पत्नीच्या मुलीच्या नावे केली होती. उर्वरित साडेसात एकरवर नराधम विवेकचा ताबा होता. २०१४ मध्ये त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे तो कारागृहात पोहचला. कारागृहातदेखील त्याच्या डोक्यात सैतानी विचारच असायचे. पवनकर यांच्याशी शेतीवरून वाद सुरू असताना त्याने त्यांच्या घरापासून काही अंतरावरच एक भाड्याचे घर घेतले. पवनकर यांना संपविण्यासाठी १० जून रोजी पहाटे तीन वाजता तो त्यांच्या घरी पोहोचला आणि सर्व जण गाढ झोपेत असतानाच डोक्यावर सब्बलीने वार केले.

सब्बल आडवी मारल्याने त्याचा प्रहार त्याचाच मुलगा कृष्णा व भाची वेदांतीच्या डोक्यावरदेखील झाले. त्यांच्या किंकाळ्या ऐकून बहीण अर्चना व सासू मीराबाई जागे झाले. त्यांच्या डोक्यावरदेखील विवेकने सब्बलचे प्रहार करत त्यांची हत्या केली होती. विवेकची मुलगी वैष्णवी व कमलाकरची मुलगी मिताली दुसऱ्या खोलीत झोपल्याने वाचल्या होत्या. मात्र त्या काळरात्रीनंतर त्यांचे आयुष्यच बदलून गेले. एका रात्रीत त्यांचे कुटुंब त्यांच्यापासून हिरावल्या गेले. या घटनेच्या जखमा आजही त्यांच्या मनात कायम आहेत.

ज्याने आधार दिला, त्यालाच संपविलेविवेक कारागृहात असताना त्याचे जावई कमलाकर पवनकर यांनीच शेती व त्याच्या मुलामुलीचा सांभाळ केला होता. वैष्णवी व कृष्णा यांच्यावर पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. विवेकला कारागृहातून बाहेर आणण्यातदेखील पवनकर यांची मौलिक भूमिका होती. मात्र विवेकला याची कुठलीही कदर नव्हती. शेतीसह मुलांचा ताबा मिळावा यासाठी बाहेर आल्यावर त्याने वाद घालायला सुरुवात केली होती. विवेकची वृत्ती जाणून असल्याने पवनकर यांनी अगोदर नोकरी मिळव असा सल्ला दिला होता. विवेकने जबरदस्तीने शेतीचा ताबा घेतला. त्यामुळे पवनकर दुखावले गेले होते व त्यांनी त्याला सुटकेसाठी खर्च केलेले पैसे मागितले. येथूनच विवेकचे डोके फिरले व त्याने पवनकर यांची हत्या करण्याचे षडयंत्र रचले होते.

नागपुरातून गाठली दिल्ली, लुधियाना, मुंबई, पंजाबअंगाचा थरकाप उडेल असे हत्याकांड घडवून आणल्यानंतर विवेकने घर गाठले व तेथून सकाळी ९ वाजता रेल्वेने दिल्लीकडे निघाला. तेथून त्याने लुधियाना गाठले व सैनीवाल भागातील इंडस्ट्री परिसरात मजुरी सुरू केली. बारावीनंतर त्याने आयटीआयचा अभ्यासक्रम केला होता. त्याच्या भरवशावर त्याने मुंबईतील एका टेक्सटाईल कंपनीत नोकरी सुरू केली. नऊ महिन्यांनी पंजाबमधील अंबालातील टेक्सटाईल कंपनीत नोकरी लागला. इतके मोठे हत्याकांड केल्यानंतरदेखील तो साळसूदपणाचा आव आणत जगत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी