शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

पालटकरच्या डोक्यात शिरला होता सैतान, दोन मुलींच्या आयुष्याला लावले ग्रहण

By योगेश पांडे | Updated: March 27, 2024 15:20 IST

जावई, बहिणी, भाचीसह स्वतःच्या मुलाचा केला होता कोल्ड ब्लडेड मर्डर : फाशी तर मिळाली, ती काळरात्री कशी विसरणार ?

नागपूर : उपराजधानीच्या गुन्हेगारी जगताला हादरवून सोडणाऱ्या क्रूरकर्मा विवेक पालटकर याच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. १० जून २०१८ साली पालटकरच्या डोक्यात अक्षरश: सैतान शिरला होता व त्याने स्वत:ची सख्खी बहीण, जावई, भाची, बहिणीची सासू व स्वत:च्या मुलाचा अगदी ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’च केला होता. पालटकर याला फाशी झाली असली तरी त्याच्या कृत्याची शिक्षा दोन लहान मुलींना आयुष्यभर भोगावी लागणार आहे. त्याची मुलगी व भाची त्या काळरात्री क्रूरकर्म्याच्या तावडीतून सुटल्या होत्या. मात्र त्यांच्या आयुष्यात नेहमीसाठीच ग्रहण लागले आहे.

मौदा तालुक्यातील नवरगावमधील गुलाब पालटकर यांना दोन पत्नी होत्या. त्यातील संध्या नामक पत्नीला विवेक आणि अर्चना ही दोन मुलं होती. गुलाब पालटकर यांच्याकडे १० एकर शेती होती. त्यातील सव्वादोन एकर शेती त्यांनी दुसऱ्या पत्नीच्या मुलीच्या नावे केली होती. उर्वरित साडेसात एकरवर नराधम विवेकचा ताबा होता. २०१४ मध्ये त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे तो कारागृहात पोहचला. कारागृहातदेखील त्याच्या डोक्यात सैतानी विचारच असायचे. पवनकर यांच्याशी शेतीवरून वाद सुरू असताना त्याने त्यांच्या घरापासून काही अंतरावरच एक भाड्याचे घर घेतले. पवनकर यांना संपविण्यासाठी १० जून रोजी पहाटे तीन वाजता तो त्यांच्या घरी पोहोचला आणि सर्व जण गाढ झोपेत असतानाच डोक्यावर सब्बलीने वार केले.

सब्बल आडवी मारल्याने त्याचा प्रहार त्याचाच मुलगा कृष्णा व भाची वेदांतीच्या डोक्यावरदेखील झाले. त्यांच्या किंकाळ्या ऐकून बहीण अर्चना व सासू मीराबाई जागे झाले. त्यांच्या डोक्यावरदेखील विवेकने सब्बलचे प्रहार करत त्यांची हत्या केली होती. विवेकची मुलगी वैष्णवी व कमलाकरची मुलगी मिताली दुसऱ्या खोलीत झोपल्याने वाचल्या होत्या. मात्र त्या काळरात्रीनंतर त्यांचे आयुष्यच बदलून गेले. एका रात्रीत त्यांचे कुटुंब त्यांच्यापासून हिरावल्या गेले. या घटनेच्या जखमा आजही त्यांच्या मनात कायम आहेत.

ज्याने आधार दिला, त्यालाच संपविलेविवेक कारागृहात असताना त्याचे जावई कमलाकर पवनकर यांनीच शेती व त्याच्या मुलामुलीचा सांभाळ केला होता. वैष्णवी व कृष्णा यांच्यावर पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. विवेकला कारागृहातून बाहेर आणण्यातदेखील पवनकर यांची मौलिक भूमिका होती. मात्र विवेकला याची कुठलीही कदर नव्हती. शेतीसह मुलांचा ताबा मिळावा यासाठी बाहेर आल्यावर त्याने वाद घालायला सुरुवात केली होती. विवेकची वृत्ती जाणून असल्याने पवनकर यांनी अगोदर नोकरी मिळव असा सल्ला दिला होता. विवेकने जबरदस्तीने शेतीचा ताबा घेतला. त्यामुळे पवनकर दुखावले गेले होते व त्यांनी त्याला सुटकेसाठी खर्च केलेले पैसे मागितले. येथूनच विवेकचे डोके फिरले व त्याने पवनकर यांची हत्या करण्याचे षडयंत्र रचले होते.

नागपुरातून गाठली दिल्ली, लुधियाना, मुंबई, पंजाबअंगाचा थरकाप उडेल असे हत्याकांड घडवून आणल्यानंतर विवेकने घर गाठले व तेथून सकाळी ९ वाजता रेल्वेने दिल्लीकडे निघाला. तेथून त्याने लुधियाना गाठले व सैनीवाल भागातील इंडस्ट्री परिसरात मजुरी सुरू केली. बारावीनंतर त्याने आयटीआयचा अभ्यासक्रम केला होता. त्याच्या भरवशावर त्याने मुंबईतील एका टेक्सटाईल कंपनीत नोकरी सुरू केली. नऊ महिन्यांनी पंजाबमधील अंबालातील टेक्सटाईल कंपनीत नोकरी लागला. इतके मोठे हत्याकांड केल्यानंतरदेखील तो साळसूदपणाचा आव आणत जगत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी