शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : विलंब शुल्काची अट तात्काळ मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 19:04 IST

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्यापही निर्णय झालेला नसल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अनिश्चितता आहे. या स्थितीत परीक्षा अर्ज भरण्यासाठी विलंब शुल्क भरण्याची अट विद्यापीठाने घातली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून हे शुल्क भरणे अनेक विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही. यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून तात्काळ हे विलंब शुल्क मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी संघटनांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्यापही निर्णय झालेला नसल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अनिश्चितता आहे. या स्थितीत परीक्षा अर्ज भरण्यासाठी विलंब शुल्क भरण्याची अट विद्यापीठाने घातली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून हे शुल्क भरणे अनेक विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही. यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून तात्काळ हे विलंब शुल्क मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.विद्यापीठातर्फे २२ मे रोजी एक परिपत्रक जारी केले. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत उन्हाळी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले नाहीत, त्यांनी विलंब शुल्कासह महाविद्यालयाकडे आपले अर्ज जमा करावे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. विलंब शुल्कासह त्यांना किती रक्कम जमा करावी लागेल हे विद्यापीठाने स्पष्ट न केल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. प्रत्यक्षात विद्यापीठाकडे विलंब शुल्क जमा करण्यासाठी अनेक नियम आहेत. त्यातील एका नियमानुसार विलंब शुल्काच्या रूपाने फक्त ५० ते १०० रुपये आकारणी केली जाते. तर अन्य नियमानुसार विद्यार्थ्यांकडून ५ हजार ते २० हजार रुपये विलंब शुल्क घेण्याचेदेखील प्रावधान आहे. विद्यापीठाकडे १६ मार्चपूर्वी परीक्षेचे अर्ज भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांवर ही पाळी आली आहे.यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेदेखील यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपूर जिल्ह्यातच असणाºया कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने ५० ते १०० टक्के शिक्षण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर विद्यापीठाने मात्र गरीब विद्यार्थ्यांना संकटात टाकले आहे. या स्थितीत त्यांच्याकडून विलंब शुल्क वसूल करणे अयोग्य आहे. विद्यापीठाने तात्काळ ही अट रद्द करावी. यासंदर्भात आम्ही कुलगुरूंना मागणी करणार आहोत. तर त्यांनी दिलासा दिला नाही तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे हा मुद्दा लावून धरू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी केले.विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत कराकोरोनाची स्थिती लक्षात घेता अंतिम वर्ष सोडून इतर परीक्षा रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यापीठाने लगेच परत करावे अशी मागणी छात्र युवा संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा करावी, असे निवेदन समितीतर्फे सादर करण्यात आले आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी