शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नागपूर विद्यापीठ : विलंब शुल्काची अट तात्काळ मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 19:04 IST

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्यापही निर्णय झालेला नसल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अनिश्चितता आहे. या स्थितीत परीक्षा अर्ज भरण्यासाठी विलंब शुल्क भरण्याची अट विद्यापीठाने घातली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून हे शुल्क भरणे अनेक विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही. यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून तात्काळ हे विलंब शुल्क मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी संघटनांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्यापही निर्णय झालेला नसल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अनिश्चितता आहे. या स्थितीत परीक्षा अर्ज भरण्यासाठी विलंब शुल्क भरण्याची अट विद्यापीठाने घातली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून हे शुल्क भरणे अनेक विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही. यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून तात्काळ हे विलंब शुल्क मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.विद्यापीठातर्फे २२ मे रोजी एक परिपत्रक जारी केले. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत उन्हाळी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले नाहीत, त्यांनी विलंब शुल्कासह महाविद्यालयाकडे आपले अर्ज जमा करावे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. विलंब शुल्कासह त्यांना किती रक्कम जमा करावी लागेल हे विद्यापीठाने स्पष्ट न केल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. प्रत्यक्षात विद्यापीठाकडे विलंब शुल्क जमा करण्यासाठी अनेक नियम आहेत. त्यातील एका नियमानुसार विलंब शुल्काच्या रूपाने फक्त ५० ते १०० रुपये आकारणी केली जाते. तर अन्य नियमानुसार विद्यार्थ्यांकडून ५ हजार ते २० हजार रुपये विलंब शुल्क घेण्याचेदेखील प्रावधान आहे. विद्यापीठाकडे १६ मार्चपूर्वी परीक्षेचे अर्ज भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांवर ही पाळी आली आहे.यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेदेखील यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपूर जिल्ह्यातच असणाºया कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने ५० ते १०० टक्के शिक्षण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर विद्यापीठाने मात्र गरीब विद्यार्थ्यांना संकटात टाकले आहे. या स्थितीत त्यांच्याकडून विलंब शुल्क वसूल करणे अयोग्य आहे. विद्यापीठाने तात्काळ ही अट रद्द करावी. यासंदर्भात आम्ही कुलगुरूंना मागणी करणार आहोत. तर त्यांनी दिलासा दिला नाही तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे हा मुद्दा लावून धरू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी केले.विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत कराकोरोनाची स्थिती लक्षात घेता अंतिम वर्ष सोडून इतर परीक्षा रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यापीठाने लगेच परत करावे अशी मागणी छात्र युवा संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा करावी, असे निवेदन समितीतर्फे सादर करण्यात आले आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी