शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाने केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 23:57 IST

विद्यापीठाने धोरणात बदल करावा व केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षाच घ्याव्यात. इतर सर्व सत्रांच्या परीक्षा या महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात याव्या, अशी मागणी विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी केली आहे.

ठळक मुद्देप्राधिकरण सदस्यांची मागणी : ‘कोरोना’मुळे धोरणात बदल करावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरात ‘कोरोना’चे थैमान सुरू असून नागपूरलादेखील त्याचा फटका बसला आहे. ‘लॉकडाऊन’मुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून सर्व काही ठीक झाले तर विद्यापीठावर सोबतच सर्व परीक्षा घेण्याचा ताण पडणार आहे. यंदाची एकूण स्थिती लक्षात घेता विद्यापीठाने धोरणात बदल करावा व केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षाच घ्याव्यात. इतर सर्व सत्रांच्या परीक्षा या महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात याव्या, अशी मागणी विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी केली आहे.‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १४ एप्रिलपर्यंतच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतरही प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यास काही कालावधी लागणार आहे. अशा स्थितीत पुढे ढकललेल्या परीक्षा व नियमित परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर निकालदेखील उशिरा येतील. त्याचा फटका पुढील सत्राच्या प्रवेशप्रक्रियेला बसू शकतो. त्यामुळे एकूणच शैक्षणिक ‘कॅलेंडर’ बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जर १४ एप्रिलपर्यंत परिस्थिती सुरळीत झाली व ‘लॉकडाऊन’ उठला तरी विद्यापीठाला त्वरित परीक्षा आयोजित करता येणार नाहीत. साधारणत: २३ ते २५ एप्रिलपासूनच परीक्षा घेता येतील.यासंदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी कुलगुरूंना पत्र लिहिले आहे. आगामी काळात विद्यापीठाच्या परीक्षा व इतर शैक्षणिक महत्त्वाच्या बाबी या अधिक क्षमतेने आपल्यासह इतर सर्व घटकांना पार पाडाव्या लागतील. जर ‘लॉकडाऊन’ १४ एप्रिल रोजी उठले तर परीक्षा या २० एप्रिलपासूनच घ्याव्यात, शिवाय प्राध्यापकांना २ मे पासून पेपर तपासणी बंधनकारक करावी. अगोदर अंतिम वर्षाचे निकाल लावावेत व इतर वर्षांचे वर्ग १ जुलैपासून सुरूकरावेत, अशी मागणी चांगदे यांनी केली आहे. मात्र स्थितीत सुधारणा झाली नाही तर विद्यापीठाने केवळ अंतिम वर्षाच्याच परीक्षा घ्याव्या. इतर सर्व परीक्षा जून महिन्यात महाविद्यालय स्तरावर घ्याव्यात. महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी पेपर तपासून त्याचे गुण विद्यापीठाकडे पाठवावेत, अशी सूचना चांगदे यांनी केली आहे.वेळापत्रक जारी केल्यानंतर १५ दिवसांचा वेळ द्या‘लॉकडाऊन’नंतर विद्यापीठाला नवे वेळापत्रक घोषित करावे लागणार आहे. विद्यापीठात शिकणारे अनेक विद्यार्थी हे बाहेरगावी राहतात. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचायला वेळ लागू शकतो. शिवाय त्यांना यायलादेखील काही वेळ लागेलच. त्यामुळेच हे वेळापत्रक जारी झाल्यानंतर विद्यापीठाने परीक्षा १५ दिवसांच्या कालावधीनंतर घ्याव्यात, अशी मागणी विधिसभा सदस्य अ‍ॅड.मनमोहन बाजपेयी यांनी केली आहे. अंतिम वर्षाच्याच परीक्षा विद्यापीठाने घ्याव्या व इतर परीक्षा महाविद्यालयीन पातळीवर घेऊन जुलैपर्यंत निकाल लावावे, ही भूमिका मांडली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा