शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूर विद्यापीठ : विद्यार्थी परिषद निवडणुकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:38 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २५ वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या खुल्या निवडणुका होणार आहेत. विद्यापीठाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र विद्यार्थी संघटनांकडून याचा विरोध होत आहे. या निवडणुका पूर्णत: खुल्या स्वरूपाच्या नसल्याचा आरोप करत ‘एनएसयूआय’ने निवडणूक प्रणालीचा विरोध केला आहे.

ठळक मुद्देपूर्णत: खुल्या निवडणुका नसल्याचा ‘एनएसयूआय’चा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २५ वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या खुल्या निवडणुका होणार आहेत. विद्यापीठाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र विद्यार्थी संघटनांकडून याचा विरोध होत आहे. या निवडणुका पूर्णत: खुल्या स्वरूपाच्या नसल्याचा आरोप करत ‘एनएसयूआय’ने निवडणूक प्रणालीचा विरोध केला आहे.राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये १९९४ मध्ये नवीन विद्यापीठ कायदा लागू झाला होता. तोपर्यंत सर्वसाधारण निवडणुकांप्रमाणेच विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका व्हायच्या. मात्र निवडणुकांतील हिंसा लक्षात घेता गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थी परिषद गठित करण्याची प्रणाली सुरू करण्यात आली. १९९६ साली यानुसार सर्वप्रथम निवडणुका झाल्या होत्या. विद्यापीठाशी जुळलेल्या विद्यार्थी संघटनांनी याचा जोरदार विरोध केला होता. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार आता परत खुल्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तयारीसाठी प्रभारी कुलसचिव डॉ.विनायक देशपांडे यांनी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची ६ जुलै रोजी बैठक बोलविली आहे.मात्र ‘एनएसयूआय’ने निवडणुकीला विरोध केला आहे. या निवडणुका पूर्णत: खुल्या स्वरूपाच्या करण्यात याव्या, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात ‘एनएसयूआय’च्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी विकास संचालक डॉ.अभय मुद्गल यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाध्यक्ष आशिष मंडपे, राष्ट्रीय प्रतिनिधी आमीर नूरी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अजित सिंह, ’एनएसयूआय’चे प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक सिंह, महासचिव प्रतीक कोल्हे, प्रणय ठाकूर, दादा भोयर उपस्थित होते.हे आहेत आक्षेपविद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांत विद्यार्थी आपल्या मताचा उपयोग करून महाविद्यालय व विद्यापीठात आपला प्रतिनिधी निवडतो. मात्र नागपूर विद्यापीठाच्या दिशानिर्देशांनुसार विद्यार्थी केवळ महाविद्यालयाचाच प्रतिनिधी निवडू शकतो. महाविद्यालयाच्या प्रतिनिधीलाच विद्यापीठाचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. मात्र खुल्या निवडणुकांत विद्यार्थ्यांना हा अधिकार का नाही, असा आक्षेप ‘एनएसयूआय’ने घेतला आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थीElectionनिवडणूक