शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दादासाहेबांच्या स्मृतिदिनाला नागपूर विद्यापीठाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 23:45 IST

वंचित आणि शोषित समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे दिवंगत माजी कुलगुरु दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २९ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला यंदा विद्यापीठ प्रशासनाने नकार दर्शविला आहे. त्यामुळे गत २० वर्षांपासून होणाऱ्या या वैभवशाली परंपरेत खंड पडणार असल्याने दादासाहेब काळमेघ यांच्या चाहत्यात सध्या नाराजीचा सूर आहे.

ठळक मुद्देकशी जपणार वैभवशाली संस्कृती ? : शिक्षणमंत्र्यांना हर्षवर्धन देशमुख यांचे पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंचित आणि शोषित समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे दिवंगत माजी कुलगुरु दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २९ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला यंदा विद्यापीठ प्रशासनाने नकार दर्शविला आहे. त्यामुळे गत २० वर्षांपासून होणाऱ्या या वैभवशाली परंपरेत खंड पडणार असल्याने दादासाहेब काळमेघ यांच्या चाहत्यात सध्या नाराजीचा सूर आहे.विद्यापीठात स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र यंदापासून विद्यापीठ प्रशासनाने दीक्षांत सभागृह केवळ विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठीच उपलब्ध होईल, असे कारण देत स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानची विनंती अमान्य केली आहे. दादासाहेबांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी २९ जुलै रोजी विद्यापीठाने भाडेतत्त्वावर तीन तासांसाठी दीक्षांत सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती प्रतिष्ठानचे सचिव हेमंत काळमेघ यांनी केली होती. मात्र प्रशासकीय कारण देत ती अमान्य करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयावरून श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठविले आहे. यात त्यांनी दादासाहेब काळमेघ यांचे कर्तृत्व केवळ नागपूर विद्यापीठापुरते मर्यादित नसून त्यांनी कर्तृत्वाच्या बळावर अवघ्या महाराष्ट्रात स्वत:चा ठसा उमटविला होता. फुले, शाहू, डॉ.आंबेडकर, डॉ.पंजाबराव देशमुख यांचे विचार विद्यार्थ्यांत खऱ्या अर्थाने रुजविणारे दादासाहेब विद्यापीठाचे कुणीच नव्हते का, अशी विचारणा केली आहे. दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रमासाठी दीक्षांत सभागृहाची परवानगी नाकारल्याने विद्यापीठाची जनमानसात प्रतिमा उंचावले का, असा प्रश्नही देशमुख यांनी तावडे यांना केला आहे. इकडे प्रतिष्ठानच्य वतीने कार्यक्रमासाठी ९ जुलै या कार्यक्रमासाठी अर्ज केला होता. यानंतर विद्यापीठाने १३ जुलै रोजी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत दीक्षांत सभागृह केवळ विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दादासाहेब अखेरच्या श्वासापर्यंत गरिबांसाठी झटले. त्यांनी वंचितांना जगण्याचा मार्ग दाखविला. विद्यापीठाने कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याचे पत्र मिळाले. आता दादासाहेबांचा विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहातून फोटो कधी हटवितात याची वाट बघतो आहे. या कार्यक्रमाला विद्यापीठाने परवानगी नाकारली असली तरी दादासाहेबांच्या हजारो चाहत्यांच्या आग्रहास्तव नागपुरात कार्यक्रम होईलच. यात कुणीही शंका ठेवण्याचे कारण नाही.हेमंत काळमेघसचिव, स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठान

 

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर