शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Nagpur: दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्कींगचा खड्डा २० सप्टेंबरपर्यंत बुजवणार, एनएमआरडीएचे विविध आंबेडकरी संघटनांच्या शिष्टमंडळाला आश्वासन

By आनंद डेकाटे | Updated: July 25, 2024 21:48 IST

Nagpur: दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगसाठी खोदण्यात आलेला खड्डा हा २० सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येईल, असे आश्वासन एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीना यांनी गुरूवारी विविध आंबेडकरी संघटनांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिले.

- आनंद डेकाटे

नागपूर - दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगसाठी खोदण्यात आलेला खड्डा हा २० सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येईल, असे आश्वासन एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीना यांनी गुरूवारी विविध आंबेडकरी संघटनांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिले.

दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्कींगच्या विरोधात १ जुलै रोजी आंबेडकरी अनुयायांनी मोठे आंदोलन केले. त्या आंदोलनाची दखल घेत शासनानेही भूमिगत पार्किंग रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. तेव्हापासून दीक्षाभूमीवर सुरू असलेले काम बंद पडले आहे. परंतु भूमिगत पार्किंगसाठी करण्यात आलेले खोदकाम तसेच पडून आहे. २५ दिवस लोटले तरी खड्डा बुजवण्यात आलेला नाही. त्यामुळे खड्ड्यात पाणी साचले आहे. हे साचलेले पाणी मुख्य स्मारकासाठी धोकादायक ठरू शकते, अशी शक्यता आहे. त्यामुळे हा खड्डा तातडीने बुजवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

१२ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. त्यावेळी दीक्षाभूमीवर लाखो लोक येतील. तेव्हा त्या दिवसाच्या १५ दिवसांपूर्वीपर्यंत येथील खड्डा बुजवून ती जागा समतल करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी, मुक्तिवाहिनी, रिपब्लिकन मुव्हमेंट आदींसह ४० विविध संघटनांचे प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने गुरूवारी एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीणा यांची भेट घेऊन याविषयावर सविस्तर चर्चा केली तसेच त्यांना निवेदन सादर केले. काही तांत्रिक बाबीमुळे खड्डा बुजवण्याच्या कामाला सुरूवात झाली नसली तरी २० सप्टेंबरपर्यंत खड्डा बुजवण्यात येईल, असे यावेळी एनएमआरडीएतर्फे स्पष्ट करण्यात आले.  खड्ड्यातील पाणी उपसून जागा समतल करा - भंते ससाईदीक्षाभूमी परिसरात पार्किंगसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. खड्ड्यातील पाणी उपसून जागा समतल करावी, अशा आशयाचे पत्र परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविले आहे. यासोबतच एनआयटी, मनपा आणि एनएमआरडीला लेखी निवेदन पाठविले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर