शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नागपुरात  सख्ख्या भावांनी केली दगाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:18 IST

अगरबत्तीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापारी बंधूंनी त्यांच्या एका सख्ख्या भावाच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाते उघडले आणि १२ वर्षांत तब्बल २ कोटी, ७ लाखांचा व्यवहार केला.

ठळक मुद्देबनावट कागदपत्रांचा वापर : लहान भावाच्या नावाने कोट्यवधींचा व्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अगरबत्तीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापारी बंधूंनी त्यांच्या एका सख्ख्या भावाच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाते उघडले आणि १२ वर्षांत तब्बल २ कोटी, ७ लाखांचा व्यवहार केला. १२ वर्षांनंतर हा गैरप्र्रकार उघड झाल्यानंतर शंकर भगवानदास सुगंध (वय ४२, रा. छापरूनगर, सोसायटी गरोबा मैदान) यांनी त्यांचे सख्खे भाऊ ईश्वर भगवानदास सुगंध (वय ४४) आणि हिरालाल भगवानदास सुगंध (वय ४८, रा. दोघेही जुना बगडगंज) यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार केली.शंकर सुगंध यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या फोटोचा गैरवापर करीत त्यांच्या दोन भावांनी १७ डिसेंबर २००६ रोजी नागपूर नागरिक सहकारी बँकेत खाते उघडले. त्यानंतर त्या खात्याच्या आधारे एलआयसीचे ६३,०१६ रुपये काढून घेतले. हे दोन गैरप्रकार झाल्यानंतर ईश्वर आणि हिरालाल या दोघांनी गेल्या १२ वर्षांत २ कोटी, ७ लाख, १९,२०० रुपयांचा व्यवहार शंकर सुगंध यांच्या नावे केला. या सर्व गैरप्रकारापासून अनभिज्ञ असलेल्या शंकर सुगंध यांना दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या नावे होत असलेल्या गैरव्यवहाराची माहिती कळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या भावांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शंकर सुगंध यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.कोटी नव्हे, लाखाचा गैरव्यवहार ?रात्री उशिरा या संबंधाने तहसील ठाण्यातील चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यवहार २ कोटी नव्हे तर २ लाख, १९ हजारांचा व्यवहार असल्याचे ते म्हणाले. आरोपींची चौकशी केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूर