शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

उपराजधानीत चोवीस तासात दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:20 IST

गुरुवारी मध्यरात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गांजा विक्रेत्याची तीन गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली. या हत्येची चर्चा सुरूच असताना रेल्वेस्थानकासमोरच्या उड्डाण पुलाखाली एका महिलेची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या झाली. २४ तासात हत्येच्या दोन घटना घडल्याने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरेल्वेस्थानकासमोर महिलेची तर यशोधरानगरात गांजा विकणाऱ्याची हत्या : सर्वत्र खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी मध्यरात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गांजा विक्रेत्याची तीन गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली. या हत्येची चर्चा सुरूच असताना रेल्वेस्थानकासमोरच्या उड्डाण पुलाखाली एका महिलेची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या झाली. २४ तासात हत्येच्या दोन घटना घडल्याने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली आहे.रुबिना सलीम खान (रा. मोहननगर, सदर) ही महिला मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या उड्डाण पुलाखाली ( प्रवेशद्वारासमोर) हातठेल्यावर फळ विकत होती. शुक्रवारू रात्री ८.४५ च्या सुमारास रुबिना मृतावस्थेत दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती कळताच सीताबर्डीचे ठाणेदार हेमंत खराबे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. रुबिनाच्या डोक्यावर आणि गळ्यावर घाव होता. चौकशीत तिची दोन ते तीन जणांनी हत्या केल्याचा संशय आजूबाजूच्यांनी व्यक्त केला. एका संशयिताचे नावही पोलिसांना कळले. त्यावरून पोलिसांची पथके आरोपीच्या शोधात वेगवेगळळ्या भागात रवाना झाली. दरम्यान, पोलिसांनी रुबिनाचा मृतदेह रुग्णालयात पाठविला. हत्येच्या या घटनेने रेल्वेस्थानक परिसरात दहशत निर्माण झाली होती.यशोधरानगरातील मृताचे नाव शेरू अली मोहम्मद अली (वय ४०) असून, तो एकता कॉलनी गौसीया मस्जीदजवळ सुकेशिनी राजेश बल्लारे (वय ३५) हिच्या घरी राहायचा. तो गांजा विकत होता. त्याच्याकडे ओरिसा, आंध्रप्रदेशमधील तस्कर नेहमी गांजाची खेप घेऊन येत होते. नेहमीप्रमाणे राजलक्ष्मी नामक महिला गुरुवारी गांजाची खेप घेऊन शेरू-सुकेशिनीच्या घरी आली. तिने घरात पिशवी ठेवली होती. त्याचवेळी तेथे जरीपटक्यातील लुंबिनीनगरात राहणारा आरोपी गोलू ऊर्फ विद्याधर कांबळे आला. तो निघून गेल्यानंतर राजलक्ष्मीच्या पिशवीतील तीन गांजाची पाकिटं गायब झाल्याचे शेरूच्या लक्षात आले. ते कांबळेनेच चोरले असावे, असा संशय आल्याने शेरूने कांबळेला बोलविले. कांबळे त्याच्या दोन साथीदारासह गुरुवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास शेरूच्या घरी पोहचला. यावेळी चोरलेला गांजा परत आणून दे, असे म्हणत शेरूने कांबळेसोबत वाद घातला. कांबळेने नकार देताच शेरूने त्याला दोन थापडा मारल्या. यामुळे कांबळेने त्याच्यावर लोखंडी पाईपने हल्ला चढवला. त्याला रक्तबंबाळ केल्यानंतर कांबळेसोबत असलेले त्याचे साथीदार कुणाल नरेंद्र वाघमारे (वय २०, रा. लुंबिनीनगर) आणि दाद्या ऊर्फ राहुल भीमराव इंगळे (वय २४) या दोघांनी शेरूला पकडले तर कांबळेने धारदार खंजराने शेरूवर सपासप घाव घालून त्याची हत्या केली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा पोहचला. पोलिसांनी सुकेशिनी बल्लारेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींची शोधाशोध सुरू केली.पळून जाण्याची होती तयारीशेरूची हत्या केल्यानंतर आरोपी कांबळे, वाघमारे आणि इंगळे यशोधरानगरातून पळून गेले. हे तिघेही गुन्हेगारी वृत्तीचे असून, यशोधरानगर तसेच जरीपटक्यात ते अवैध दारू, गांजाची विक्री करतात. त्यांनी पैशाची जुळवाजुळव केल्यानंतर पहाटे नागपुरातून बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, ठाणेदार पुंडलिक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यानी या तिघांच्याही मुसक्या बांधल्या. 

 

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर