शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
4
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
5
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
6
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
7
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
8
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
9
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
10
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
11
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
12
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
13
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
15
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
16
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
17
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
18
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
19
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
20
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 

नागपुरात वादळी पावसात झाडे कोसळली, भिंती पडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 21:11 IST

गुरुवारी दुपारी जोरदार वादळासह आलेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील झाडे उन्मळून पडली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. यात कसलीही जीवितहानी झाली नाही; मात्र अभ्यंकर नगरातील उद्यानाच्या भिंतीचा एक भाग कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी दुपारी जोरदार वादळासह आलेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील झाडे उन्मळून पडली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. यात कसलीही जीवितहानी झाली नाही; मात्र अभ्यंकर नगरातील उद्यानाच्या भिंतीचा एक भाग कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले.गुरुवारी सकाळी कडक उन्ह पडले होते. या दरम्यान काही काळ शहराच्या काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासोबत पाऊस आला. लक्ष्मीनगर झोन कार्यालयासमोरील मार्गावर झाड आडवे पडले. या सोबतच, शंकरनगरमधील हल्दीराम प्रतिष्ठानसमोरील मार्गावर आणि बजाजनगरातील बास्केटबॉल ग्राऊंडजवळील प्रतिबंधित करण्यात आलेल्या परिसराजवळही एक झाड पडले. या घटनांमध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही.

अभ्यंकर नगरात आमदार विकास ठाकरे यांच्या कार्यालयासमोरील उद्यानाची भिंत पडली. या भिंतीला लागूनच एक वाहन पार्क करण्यात आले होते. त्याचेही भिंत पडल्याने बरेच नुकसान झाले. स्वावलंबी नगरात नागोबा मंदिराजवळही एक झाड कोसळले. या घटनेतही कसलेच नुकसान झाले नाही. सुमारे तासभराच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जमा झाले होते. अनेक ठिकाणचे आरयूबीदेखील पाण्याने तुडुंब भरले होते. यामुळे वाहनचालकांना लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागला. यातून जाणारे अनेक आॅटो आणि दुचाकी पाणी गेल्याने बंद पडले होते.
पुढचे तीन दिवस असेच वातावरण?अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत बदललेल्या वातावरणामुळे पुढील तीन दिवस उन्ह, ढगाळी वातावरण आणि पाऊस असे चित्र राहण्याची शक्यता आहे. ६ किंवा ७ जुलैला कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या जोरदार पावसाची सूचना नाही; मात्र सकाळी ऊन तर सायंकाळी पाऊस असे काहीसे संमिश्र वातावरण या काळात अनुभवास येण्याची शक्यता आहे.एम. एल. साहू, डीडीजीएम, नागपूर हवामान केंद्रउप्पलवाडीमध्ये अडथळाकामठी रोडवर उप्पलवाडी येथे सुरू असलेल्या आरयूबीच्या दुसºया भागाचे काम अपूर्ण आहे. तयार करण्यात आलेला नवा आरयूबीदेखिल व्यवस्थित बांधलेला नाही. यामुळे या भागात नेहमीच पावसाचे पाणी साचते. नव्या आरयूबीमध्ये खड्डे पडले असून त्यात पाणी साचते. यातून जाणारे वाहन धोकादायकपणे हेलकावे खाते. या वर्दळीच्या मार्गालगत करण्यात आलेल्या खड्ड्यांमधील वाहून आलेली वाळू आणि माती येथे जमा होते. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. रात्री वाहनचालकांना पाण्याचा अंदाज येत नाही. पावसामुळे वाहने अडकून पडण्याचा अनुभव येथे नवा नाही. या भागात अद्यापही फोरलेनिंगचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे वाहतुकीला बराच अडथळा होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर