शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

नागपुरात वादळी पावसात झाडे कोसळली, भिंती पडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 21:11 IST

गुरुवारी दुपारी जोरदार वादळासह आलेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील झाडे उन्मळून पडली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. यात कसलीही जीवितहानी झाली नाही; मात्र अभ्यंकर नगरातील उद्यानाच्या भिंतीचा एक भाग कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी दुपारी जोरदार वादळासह आलेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील झाडे उन्मळून पडली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. यात कसलीही जीवितहानी झाली नाही; मात्र अभ्यंकर नगरातील उद्यानाच्या भिंतीचा एक भाग कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले.गुरुवारी सकाळी कडक उन्ह पडले होते. या दरम्यान काही काळ शहराच्या काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासोबत पाऊस आला. लक्ष्मीनगर झोन कार्यालयासमोरील मार्गावर झाड आडवे पडले. या सोबतच, शंकरनगरमधील हल्दीराम प्रतिष्ठानसमोरील मार्गावर आणि बजाजनगरातील बास्केटबॉल ग्राऊंडजवळील प्रतिबंधित करण्यात आलेल्या परिसराजवळही एक झाड पडले. या घटनांमध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही.

अभ्यंकर नगरात आमदार विकास ठाकरे यांच्या कार्यालयासमोरील उद्यानाची भिंत पडली. या भिंतीला लागूनच एक वाहन पार्क करण्यात आले होते. त्याचेही भिंत पडल्याने बरेच नुकसान झाले. स्वावलंबी नगरात नागोबा मंदिराजवळही एक झाड कोसळले. या घटनेतही कसलेच नुकसान झाले नाही. सुमारे तासभराच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जमा झाले होते. अनेक ठिकाणचे आरयूबीदेखील पाण्याने तुडुंब भरले होते. यामुळे वाहनचालकांना लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागला. यातून जाणारे अनेक आॅटो आणि दुचाकी पाणी गेल्याने बंद पडले होते.
पुढचे तीन दिवस असेच वातावरण?अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत बदललेल्या वातावरणामुळे पुढील तीन दिवस उन्ह, ढगाळी वातावरण आणि पाऊस असे चित्र राहण्याची शक्यता आहे. ६ किंवा ७ जुलैला कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या जोरदार पावसाची सूचना नाही; मात्र सकाळी ऊन तर सायंकाळी पाऊस असे काहीसे संमिश्र वातावरण या काळात अनुभवास येण्याची शक्यता आहे.एम. एल. साहू, डीडीजीएम, नागपूर हवामान केंद्रउप्पलवाडीमध्ये अडथळाकामठी रोडवर उप्पलवाडी येथे सुरू असलेल्या आरयूबीच्या दुसºया भागाचे काम अपूर्ण आहे. तयार करण्यात आलेला नवा आरयूबीदेखिल व्यवस्थित बांधलेला नाही. यामुळे या भागात नेहमीच पावसाचे पाणी साचते. नव्या आरयूबीमध्ये खड्डे पडले असून त्यात पाणी साचते. यातून जाणारे वाहन धोकादायकपणे हेलकावे खाते. या वर्दळीच्या मार्गालगत करण्यात आलेल्या खड्ड्यांमधील वाहून आलेली वाळू आणि माती येथे जमा होते. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. रात्री वाहनचालकांना पाण्याचा अंदाज येत नाही. पावसामुळे वाहने अडकून पडण्याचा अनुभव येथे नवा नाही. या भागात अद्यापही फोरलेनिंगचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे वाहतुकीला बराच अडथळा होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर