शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

नागपुरात वादळी पावसात झाडे कोसळली, भिंती पडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 21:11 IST

गुरुवारी दुपारी जोरदार वादळासह आलेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील झाडे उन्मळून पडली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. यात कसलीही जीवितहानी झाली नाही; मात्र अभ्यंकर नगरातील उद्यानाच्या भिंतीचा एक भाग कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी दुपारी जोरदार वादळासह आलेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील झाडे उन्मळून पडली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. यात कसलीही जीवितहानी झाली नाही; मात्र अभ्यंकर नगरातील उद्यानाच्या भिंतीचा एक भाग कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले.गुरुवारी सकाळी कडक उन्ह पडले होते. या दरम्यान काही काळ शहराच्या काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासोबत पाऊस आला. लक्ष्मीनगर झोन कार्यालयासमोरील मार्गावर झाड आडवे पडले. या सोबतच, शंकरनगरमधील हल्दीराम प्रतिष्ठानसमोरील मार्गावर आणि बजाजनगरातील बास्केटबॉल ग्राऊंडजवळील प्रतिबंधित करण्यात आलेल्या परिसराजवळही एक झाड पडले. या घटनांमध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही.

अभ्यंकर नगरात आमदार विकास ठाकरे यांच्या कार्यालयासमोरील उद्यानाची भिंत पडली. या भिंतीला लागूनच एक वाहन पार्क करण्यात आले होते. त्याचेही भिंत पडल्याने बरेच नुकसान झाले. स्वावलंबी नगरात नागोबा मंदिराजवळही एक झाड कोसळले. या घटनेतही कसलेच नुकसान झाले नाही. सुमारे तासभराच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जमा झाले होते. अनेक ठिकाणचे आरयूबीदेखील पाण्याने तुडुंब भरले होते. यामुळे वाहनचालकांना लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागला. यातून जाणारे अनेक आॅटो आणि दुचाकी पाणी गेल्याने बंद पडले होते.
पुढचे तीन दिवस असेच वातावरण?अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत बदललेल्या वातावरणामुळे पुढील तीन दिवस उन्ह, ढगाळी वातावरण आणि पाऊस असे चित्र राहण्याची शक्यता आहे. ६ किंवा ७ जुलैला कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या जोरदार पावसाची सूचना नाही; मात्र सकाळी ऊन तर सायंकाळी पाऊस असे काहीसे संमिश्र वातावरण या काळात अनुभवास येण्याची शक्यता आहे.एम. एल. साहू, डीडीजीएम, नागपूर हवामान केंद्रउप्पलवाडीमध्ये अडथळाकामठी रोडवर उप्पलवाडी येथे सुरू असलेल्या आरयूबीच्या दुसºया भागाचे काम अपूर्ण आहे. तयार करण्यात आलेला नवा आरयूबीदेखिल व्यवस्थित बांधलेला नाही. यामुळे या भागात नेहमीच पावसाचे पाणी साचते. नव्या आरयूबीमध्ये खड्डे पडले असून त्यात पाणी साचते. यातून जाणारे वाहन धोकादायकपणे हेलकावे खाते. या वर्दळीच्या मार्गालगत करण्यात आलेल्या खड्ड्यांमधील वाहून आलेली वाळू आणि माती येथे जमा होते. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. रात्री वाहनचालकांना पाण्याचा अंदाज येत नाही. पावसामुळे वाहने अडकून पडण्याचा अनुभव येथे नवा नाही. या भागात अद्यापही फोरलेनिंगचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे वाहतुकीला बराच अडथळा होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर