शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Nagpur: धुक्यामुळे गाड्या लेट; ‘फॉग सेफ्टी डिव्हाइस’चा फायदा काय? रेल्वेचा दावा, किती खरा, किती खोटा

By नरेश डोंगरे | Updated: January 15, 2024 22:43 IST

Indian Railway: ‘फॉग सेफ्टी डिव्हाइस’मुळे सिग्नल दृश्यमानता कमी असतानाही लोको पायलटला दाट धुक्यात स्पष्ट दिसेल. त्यामुळे रेल्वेगाड्यांच्या गतीला ब्रेक बसणार नाही अन् प्रवाशांचा खोळंबा होणार नाही, असा दावा तीन आठवड्यांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने केला होता.

- नरेश डोंगरेनागपूर - ‘फॉग सेफ्टी डिव्हाइस’मुळे सिग्नल दृश्यमानता कमी असतानाही लोको पायलटला दाट धुक्यात स्पष्ट दिसेल. त्यामुळे रेल्वेगाड्यांच्या गतीला ब्रेक बसणार नाही अन् प्रवाशांचा खोळंबा होणार नाही, असा दावा तीन आठवड्यांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने केला होता. मात्र, धुक्यामुळे अनेक रेल्वेगाड्या उशिरा धावत असल्याने या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सध्या उत्तर भारतात शितलहर आल्याने उत्तर भारतातून देशाच्या विविध भागांत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांवर त्याचा प्रतिकुल परिणाम झाला आहे. भारताचा मध्यबिंदू असलेल्या नागपुरातून देशाच्या चारही बाजूला रेल्वेगाड्या येतात आणि जातात. अर्थात उत्तर भारताच्या शितलहरीचा आणि धुक्यामुळे प्रभावित झालेल्या रेल्वेगाड्याच्या संचलनाचा परिणाम नागपूरमार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्यांवरही झाला आहे. गेल्या एका आठवड्यापासून धुक्यामुळे रेल्वेगाड्या उशिरा धावत आहेत. आज सोमवारी देखिल २६ गाड्या उशिरा धावत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून पुढे आली आहे आणि त्याचमुळे मध्य रेल्वेने कार्यान्वित केलेल्या ‘फॉग सेफ्टी डिव्हाइस सिस्टम’वरही प्रश्नचिन्ह लागले आहे.

कारण मध्य रेल्वे प्रशासनाने २४ डिसेंबर २०२३ ला जारी केलेल्या माहितीनुसार मुंबई, नागपूर, पुणे, भुसावळ आणि सोलापूर या पाच विभागाला '५०० फॉग सेफ्टी डिव्हाईस' दिलेत. जीपीएस तंत्रज्ञानावर संचालित होणाऱ्या या उपकरण-सिस्टीममुळे रेल्वे इंजिनच्या चालकांना कमी दृश्यमानतेतही चांगले दिसेल. परिणामी धुक्यामुळे ट्रेनची गती जी साधारणत: ३० ते ६० किलोमिटर प्रतितास मंदावते, ती मंदावणार नाही आणि प्रवासी गाड्यांचा खोळंबा होणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र, फॉग सेफ्टी डिव्हाईस कार्यान्वित असतानाही मोठ्या प्रमाणात रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा किती खरा किती खोटा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

गाड्या लेट, दाव्यातील 'फॉग' बाहेर !रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला १२० फॉग सेफ्टी डिव्हाईस, नागपूर विभाग १२०, पुणे विभाग ८०, भुसावळ विभाग १०० उपकरणे आणि सोलापूर विभागाला ८० डिव्हाईस देण्यात आले तरीसुद्धा गाड्या उशिरा धावण्याचे प्रकार सुरूच असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांच्या दाव्यातील 'फॉग' बाहेर आला आहे. या संबंधाने विचारणा केली असता त्यांनी गाड्या उशिरा धावत असल्याचे मान्य केले. मात्र, सर्वच गाड्या धुक्यामुळे लेट नसल्याची पुस्तीही रेल्वे अधिकाऱ्यांनी जोडली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर