शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

नागपुरात व्यापाऱ्यांनी पाळला जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 21:08 IST

महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूच्या घोषणेचे व्यापाऱ्यांनी काटेकोर पालन केले. शनिवारी पहिल्या दिवशी ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून कोरोनाच्या लढाईत आम्हीही सहभागी असल्याचा संदेश दिला.

ठळक मुद्देसर्व बाजारपेठा बंद, कोट्यवधींची उलाढाल ठप्प

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूच्या घोषणेचे व्यापाऱ्यांनी काटेकोर पालन केले. शनिवारी पहिल्या दिवशी ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून कोरोनाच्या लढाईत आम्हीही सहभागी असल्याचा संदेश दिला. केवळ दूध, दही आणि भाज्यांची विक्रीची दुकाने सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होती. शनिवारी दुकाने बंद असल्याने सर्व बाजारपेठांमध्ये कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली.सदर प्रतिनिधीने इतवारी, मस्कासाथ, महाल, सक्करदरा, सीताबर्डी, नागपूर सराफा बाजार (इतवारी), गांधीबाग, सीताबर्डी इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, वर्धमाननगर आदी बाजारपेठांचा फेरफटका मारला असता येथील सर्वच दुकाने बंद होती. शनिवारी शासकीय कार्यालये बंद होती. त्यामुळे कर्मचारी घराबाहेर निघालेच नाहीत. शिवाय पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी गाडीचालक दिसलेच नाहीत.इतवारी किराणा बाजार असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंह म्हणाले, शनिवारी व रविवारी व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवावीत, अशी कुठलीही सूचना व्यापाºयांना केली नव्हती. पण कोरोना लढाईत व्यापाºयांनी एकजुटीचे प्रदर्शन केले. नागपुरातील सराफा व्यापाºयांची दुकाने बंद होती. याकरिता सर्व व्यापारी अभिनंदनास पात्र असल्याचे नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर यांनी सांगितले. किरकोळ किराणा व्यापाºयांनी एकजूट दाखवीत दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य केले, असे नागपूर चिल्लर किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख हे म्हणाले. कपड्यांची दुकाने बंद ठेवून दुकानदारांनी कोरोनाच्या लढाईत शासनाला मदत केल्याचे गांधीबाग होलसेल क्वॉथ व यार्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अजय मदान यांनी सांगितले.अधिकृत बाजार बंदशहरातील अधिकृत भाजीबाजारातसुद्धा जनता कर्फ्यू पाळण्यात आला. तर विस्थापित केलेले बाजार सकाळी भरले, पण पोलिसांनी त्यांना सकाळी ७ नंतर हाकलून लावले. मुख्य रस्त्यावर नागपंचमीच्या पूजेच्या साहित्याची दुकाने सोडल्यास रस्ते सामसूम होते.दरम्यान, किरकोळ भाजीविक्रेत्यांनी कळमना व विस्थापित बाजारातून सकाळी भाजी खरेदी केली. वस्त्या-वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन भाजीही विक्री केली. दक्षिण नागपुरातील बुधवार बाजारात भाजी आणि फळ विक्रेत्यांच्या दुकाने बंद होती. उदयनगर, शताब्दीनगर रस्त्यावर भरणारा बाजार बंद होता. बाजाराच्या परिसरात पोलीस तैनात होते. सक्करदरा चौकात पोलिसांचा मोठा ताफा तैनात असल्याने भाजी व फळ विक्रेत्यांनी दुकाने उघडण्याचे धाडस केले नाही. रस्त्यावर एरवी दिसणारी भाजीची दुकाने लागली नव्हती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर