शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नागपूर - सावनेर मार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:09 IST

भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झाला तर कारचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले. हा अपघात सावनेर-नागपूर मार्गावरील पाटणसावंगीजवळील टोलनाक्याजवळ दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देमृतात पती-पत्नीचा समावेशपाटणसावंगीजवळ कारची दुचाकीला धडक, दोघे जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झाला तर कारचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले. हा अपघात सावनेर-नागपूर मार्गावरील पाटणसावंगीजवळील टोलनाक्याजवळ दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास झाला.धनराज रघुनाथ विश्वकर्मा (५०, रा. देवीनगर, वाठोडा, नागपूर) आणि सुनीता धनराज विश्वकर्मा (४४) असे मृत पती-पत्नीचे तर राजेश ऊर्फ राजू तिवारी, रा. होशंगाबाद असे मृत कारचालकाचे नाव आहे. जखमींमध्ये किशोर इंगळे (३४, रा. मूर्तिजापूर) आणि यास्मिन शेख बन्नू (३२, रा. नागपूर) या दोघांचा समावेश आहे.सुनीता यांच्या मोठ्या भावाच्या मुलीचे मुलताई येथे गुरुवारी लग्न होते. त्यासाठी धनराज आणि त्यांची पत्नी सुनीता हे दोघेही एमएच-४९/एएफ -०७८७ क्रमांकाच्या मोटरसायकलने मुलताई येथे बुधवारी गेले होते. लग्न आटोपल्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते दोघेही मुलताई येथून नागपूरला परत येत होते. त्याचवेळी एमपी-०४/टीबी-०९७१ क्रमांकाच्या कारने किशोर इंगळे, यास्मिन हे येत होते. पाटणसावंगी टोलनाक्याजवळ या भरधाव कारने धनराज यांच्या मोटरसायकलला जबर धडक दिली. अपघातामुळे कार अनियंत्रित होऊन पुलाच्या भिंतीवर आदळली. या अपघातात मोटरसायकलवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक राजूसह किशोर आणि यास्मिन असे तिघे जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. कारमधील तिन्ही जखमींना अ‍ॅम्बुलन्सने मेयोकडे रवाना केले. तेथे उपचार सुरू असताना कारचालक राजीवचा मृत्यू झाला. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत.मृत धनराज यांचे नागुपरातील आशीर्वादनगरात इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे. तर यास्मिन ही लग्नसमारंभ, कार्यक्रम घेणे यासारखे इव्हेंट मॅनेजमेंटची कामे करतात. अशाचप्रकारे छिंदवाडा येथे लग्न समारंभाची पूर्ण जबाबदारी पार पाडून ते नागपूरकडे येत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.जखमींवर उपचारया अपघातात जखमी झालेली यास्मिन ही इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते तर किशोर हा मूर्तिजापूर येथेच एका औषध कंपनीत सुपरवायजर म्हणून काम करतो. कंपनीच्या कामाच्या निमित्ताने तो नेहमी बाहेरगावी जात असतो. अशाप्रकारे तो छिंदवाडा येथे गेला. तेथे त्याची मैत्रीण यास्मिनसोबत भेट झाली. दोघांनाही नागपुरात यायचे असल्याने त्यांनी खाजगी कार किरायाने करून नागपूरसाठी यायला निघाले, अशी माहिती त्याने पोलीस बयाणात दिली. दोन्ही जखमींवर नागपुरातील वेगवेगळ्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू