शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नागपूर आरटीओ : लायसन्सचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 21:45 IST

नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) संगणकीय यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका पुन्हा एकदा नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरला बसला. गेल्या १५ दिवसांपासून संबंधित प्रणाली संथ गतीने तर कधी अचानक बंद पडत असल्याच्या समस्या वाढल्याचे कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. सोमवारी दुपारी १ वाजता आरटीओमधील शिकाऊ वाहन परवान्यांचे (लर्निंग लायसन्स) कामकाज चालणारी प्रणाली अचानक बंद पडली. परिणामी, तिन्ही कार्यालयामधील सुमारे ३००वर उमेदवारांना ‘ऑनलाईन अपॉईंटमेन्ट’ घेऊनही खाली हात परतावे लागले.

ठळक मुद्दे‘ऑनलाईन अपॉईंटमेन्ट’ घेऊन आलेले रिकाम्या हाताने परतले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) संगणकीय यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका पुन्हा एकदा नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरला बसला. गेल्या १५ दिवसांपासून संबंधित प्रणाली संथ गतीने तर कधी अचानक बंद पडत असल्याच्या समस्या वाढल्याचे कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. सोमवारी दुपारी १ वाजता आरटीओमधील शिकाऊ वाहन परवान्यांचे (लर्निंग लायसन्स) कामकाज चालणारी प्रणाली अचानक बंद पडली. परिणामी, तिन्ही कार्यालयामधील सुमारे ३००वर उमेदवारांना ‘ऑनलाईन अपॉईंटमेन्ट’ घेऊनही खाली हात परतावे लागले.राज्यांतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना ‘सारथी’ व ‘वाहन’ या संगणक प्रणालींद्वारे जोडण्यात आले आहे. या दोन्ही संगणक प्रणाली तयार करण्याचे काम हैदराबाद येथील ‘एनआयसी’ने केले आहे. तसेच या प्रणालींचे नियंत्रण व देखभाल, दुरुस्तीचे कामही ‘एनआयसी’ पाहते. परवाना संदर्भातील सर्व कामे ‘सारथी’ या संगणक प्रणालीद्वारे केली जातात. तर, वाहनांसंदर्भातील सर्व कामे ‘वाहन’ या संगणक प्रणालीद्वारे केली जातात. देशातील कोणत्याही नागरिकाला वाहनचालक परवाना काढण्यासाठी ‘सारथी’ या संगणक प्रणालीवरच ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तसेच सुरुवातीला शिकाऊ परवान्यासाठी अपॉईंटमेन्ट घ्यावी लागते. त्यानंतर अपॉईंटमेन्टच्या दिवशी संबंधित ‘आरटीओ’मध्ये जाऊन ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत असते. मात्र, सोमवारी दुपारी ‘सारथी’ या संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड आला. हा बिघाड लवकरच दूर होईल, असे संबंधित अधिकारी सांगत होते. परंतु सायंकाळचे ५ वाजूनही बिघाड दूर न झाल्याने तिन्ही कार्यालये मिळून साधारण ३००वर उमेदवारांना शिकाऊ परवान्यासाची परीक्षा न देताच खाली हात परतावे लागले. ही समस्या राज्यातील इतरही आरटीओ कार्यालयांना जाणवल्याचे समजते.कधी सुरू होणार? उत्तर कुणाकडेच नाहीप्रणाली ठप्प पडल्याने आरटीओ अधिकाऱ्यांनी ‘एनआयसी’शी संपर्क साधला. संगणकीय यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. परंतु बिघाड कधी दुरुस्त होणार, याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. यामुळे दिवसभर ऑनलाईन परीक्षेच्या प्रतीक्षेत बसलेल्यांसामोर अपॉईंटमेन्ट कधीची घ्यावी, हा प्रश्न कायम होता.बाहेर खासगीत प्रणाली सुरू, कार्यालयात ठप्पआरटीओ कार्यालयाच्या बाहेर खासगीत ऑनलाईन सेंटर चालविणाऱ्यांकडे ही प्रणाली धडाक्यात सुरू होती. परंतु आरटीओ कार्यालयातच ही प्रणाली बंद होती. यामुळे नागरिकांमध्ये शंकेचेही वातावरण निर्माण झाले होते.

 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर