शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

नागपूर आरटीओ : लायसन्सचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 21:45 IST

नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) संगणकीय यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका पुन्हा एकदा नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरला बसला. गेल्या १५ दिवसांपासून संबंधित प्रणाली संथ गतीने तर कधी अचानक बंद पडत असल्याच्या समस्या वाढल्याचे कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. सोमवारी दुपारी १ वाजता आरटीओमधील शिकाऊ वाहन परवान्यांचे (लर्निंग लायसन्स) कामकाज चालणारी प्रणाली अचानक बंद पडली. परिणामी, तिन्ही कार्यालयामधील सुमारे ३००वर उमेदवारांना ‘ऑनलाईन अपॉईंटमेन्ट’ घेऊनही खाली हात परतावे लागले.

ठळक मुद्दे‘ऑनलाईन अपॉईंटमेन्ट’ घेऊन आलेले रिकाम्या हाताने परतले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) संगणकीय यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका पुन्हा एकदा नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरला बसला. गेल्या १५ दिवसांपासून संबंधित प्रणाली संथ गतीने तर कधी अचानक बंद पडत असल्याच्या समस्या वाढल्याचे कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. सोमवारी दुपारी १ वाजता आरटीओमधील शिकाऊ वाहन परवान्यांचे (लर्निंग लायसन्स) कामकाज चालणारी प्रणाली अचानक बंद पडली. परिणामी, तिन्ही कार्यालयामधील सुमारे ३००वर उमेदवारांना ‘ऑनलाईन अपॉईंटमेन्ट’ घेऊनही खाली हात परतावे लागले.राज्यांतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना ‘सारथी’ व ‘वाहन’ या संगणक प्रणालींद्वारे जोडण्यात आले आहे. या दोन्ही संगणक प्रणाली तयार करण्याचे काम हैदराबाद येथील ‘एनआयसी’ने केले आहे. तसेच या प्रणालींचे नियंत्रण व देखभाल, दुरुस्तीचे कामही ‘एनआयसी’ पाहते. परवाना संदर्भातील सर्व कामे ‘सारथी’ या संगणक प्रणालीद्वारे केली जातात. तर, वाहनांसंदर्भातील सर्व कामे ‘वाहन’ या संगणक प्रणालीद्वारे केली जातात. देशातील कोणत्याही नागरिकाला वाहनचालक परवाना काढण्यासाठी ‘सारथी’ या संगणक प्रणालीवरच ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तसेच सुरुवातीला शिकाऊ परवान्यासाठी अपॉईंटमेन्ट घ्यावी लागते. त्यानंतर अपॉईंटमेन्टच्या दिवशी संबंधित ‘आरटीओ’मध्ये जाऊन ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत असते. मात्र, सोमवारी दुपारी ‘सारथी’ या संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड आला. हा बिघाड लवकरच दूर होईल, असे संबंधित अधिकारी सांगत होते. परंतु सायंकाळचे ५ वाजूनही बिघाड दूर न झाल्याने तिन्ही कार्यालये मिळून साधारण ३००वर उमेदवारांना शिकाऊ परवान्यासाची परीक्षा न देताच खाली हात परतावे लागले. ही समस्या राज्यातील इतरही आरटीओ कार्यालयांना जाणवल्याचे समजते.कधी सुरू होणार? उत्तर कुणाकडेच नाहीप्रणाली ठप्प पडल्याने आरटीओ अधिकाऱ्यांनी ‘एनआयसी’शी संपर्क साधला. संगणकीय यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. परंतु बिघाड कधी दुरुस्त होणार, याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. यामुळे दिवसभर ऑनलाईन परीक्षेच्या प्रतीक्षेत बसलेल्यांसामोर अपॉईंटमेन्ट कधीची घ्यावी, हा प्रश्न कायम होता.बाहेर खासगीत प्रणाली सुरू, कार्यालयात ठप्पआरटीओ कार्यालयाच्या बाहेर खासगीत ऑनलाईन सेंटर चालविणाऱ्यांकडे ही प्रणाली धडाक्यात सुरू होती. परंतु आरटीओ कार्यालयातच ही प्रणाली बंद होती. यामुळे नागरिकांमध्ये शंकेचेही वातावरण निर्माण झाले होते.

 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर